शेतजमीन वाळल्याशिवाय मळणी नाही
By Admin | Updated: March 7, 2016 02:00 IST2016-03-07T02:00:05+5:302016-03-07T02:00:05+5:30
सतत सुरू असलेल्या पावसामुळे जमिनी ओल्या आहेत. यामुळे पाऊस थांबून आठ ते दहा दिवस झाल्याशिवाय गहू पिकाची मळणी शक्य नाही.

शेतजमीन वाळल्याशिवाय मळणी नाही
सेलू : सतत सुरू असलेल्या पावसामुळे जमिनी ओल्या आहेत. यामुळे पाऊस थांबून आठ ते दहा दिवस झाल्याशिवाय गहू पिकाची मळणी शक्य नाही. त्यातही गारपिटाने गव्हाच्या उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. गहू जमीनदोस्त झाल्याने मळणीच्या वेळी गहू उपटून येतील त्यावेळी गव्हात माती होण्याची भीती शेतकऱ्याच्या मनात आहे. गव्हाचा रंग सततचा पाऊस हिरावून नेणार आहे.
सततच्या नापिकीमुळे आर्थिकदृष्ट्या हतबल झालेला शेतकरी दरवर्षी खरीप व रबी हंगाम घेण्यास पुढाकार घेत असून यावर्षी तरी चांगले उत्पन्न येईल ही आशा ठेवून शेती करीत आहे. पण अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना त्याला करावा लागत आहे. पिकाचे नुकसान झाले असताना शासनाच्यावतीने अद्याप सर्वेक्षणाला प्रारंभ झाला नसल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाच्यावतीने सर्व्हे करणे सुरू झाले असले तरी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे कर्मचारी अद्यापही शेताच्या धुऱ्यावर पोहोचले नाही. यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळेल अथवा नाही याची शाश्वती नसल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)