शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:55 IST

परतीच्या पावसाचा तडाखा : अस्मानी, सुलतानी संकटाचे ग्रहण

विनोद घोडे लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामनी): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना बाजार समितीत धान्याची आवक दिसून येत नाही. आता शेतकऱ्यांना नव्या सोयाबीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. यंदा ऑक्टोबर महिना अर्धा उलटून गेला तरी वरुणराजा शांत व्हायचे नाव घेत नसल्याने सोयाबीन उत्पादकांना सोयाबीनचे उत्पादन घरी आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हल्ली जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन सवंगणीला आले आहेत. तर ज्यांचे सोयाबीन मळणीला आले आहे त्यांना वरुणराजा सतावत आहे. 

आता दिवाळी साजरी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरी आले खरे पण सततच्या पावसाने तेही काळवंडले व बारीक झाले आहे. यामुळे उताराही चांगलाच घटला असून हल्ली प्रति एकर २ ते ३ क्विंटलचा उतारा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. 

शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत"यावर्षी अतिप्रमाणात पडलेल्या पावसामुळे खरिपातील उभ्या पिकांची पुरती वाट लागली. यातून बचावलेले पीक वाचवण्यासाठी कर्ज काढून खर्च केला. पण आताही सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन घरी येते की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. आता दिवाळी साजरी कशी करावी, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे." - मनीष येणकर, शेतकरी

"पावसाच्या तावडीतून कसेबसे सोयाबीनची मळणी केली व उत्पादन घरी आणले. पण यामध्ये अधिक प्रमाणात ओलावा असल्याने याला वाळविण्यासाठी नाकात दम आला आहे. दिवाळीच्या पूर्वी हे सोयाबीन विक्री योग्य होते की नाही. याची शास्वती नाही. उत्पादनातही घट आल्याने यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे." - प्रवीण भोयर, शेतकरी

"अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे यंदाच्या सोयाबीनमध्ये अधिक प्रमाणात ओलावा आहेत, हे जरी सत्य असले तरी पण सोयाबीनचे भाव आधीच घसरले होते हेही तितकेच खरे आहे. तसेही शेतमालाच्या दरात चढ-उतार सुरूच असतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाहिजे त्या प्रमाणात आवक नाही."- विक्की उमरे, व्यापारी

व्यापारी काय म्हणतात... "सोयाबीनचे दर आता जरी घसरले असेल तरी पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी गरजेपुरते सोयाबीन विकावे. पूर्ण माल एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने विकणे फायद्याचे ठरू शकतील. शेतकऱ्यांनी बाजारांचाही अंदाज घ्यावा."- प्रमोद ठाकरे, व्यापारी

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र