शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:55 IST

परतीच्या पावसाचा तडाखा : अस्मानी, सुलतानी संकटाचे ग्रहण

विनोद घोडे लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामनी): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना बाजार समितीत धान्याची आवक दिसून येत नाही. आता शेतकऱ्यांना नव्या सोयाबीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. यंदा ऑक्टोबर महिना अर्धा उलटून गेला तरी वरुणराजा शांत व्हायचे नाव घेत नसल्याने सोयाबीन उत्पादकांना सोयाबीनचे उत्पादन घरी आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हल्ली जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन सवंगणीला आले आहेत. तर ज्यांचे सोयाबीन मळणीला आले आहे त्यांना वरुणराजा सतावत आहे. 

आता दिवाळी साजरी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरी आले खरे पण सततच्या पावसाने तेही काळवंडले व बारीक झाले आहे. यामुळे उताराही चांगलाच घटला असून हल्ली प्रति एकर २ ते ३ क्विंटलचा उतारा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. 

शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत"यावर्षी अतिप्रमाणात पडलेल्या पावसामुळे खरिपातील उभ्या पिकांची पुरती वाट लागली. यातून बचावलेले पीक वाचवण्यासाठी कर्ज काढून खर्च केला. पण आताही सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन घरी येते की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. आता दिवाळी साजरी कशी करावी, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे." - मनीष येणकर, शेतकरी

"पावसाच्या तावडीतून कसेबसे सोयाबीनची मळणी केली व उत्पादन घरी आणले. पण यामध्ये अधिक प्रमाणात ओलावा असल्याने याला वाळविण्यासाठी नाकात दम आला आहे. दिवाळीच्या पूर्वी हे सोयाबीन विक्री योग्य होते की नाही. याची शास्वती नाही. उत्पादनातही घट आल्याने यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे." - प्रवीण भोयर, शेतकरी

"अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे यंदाच्या सोयाबीनमध्ये अधिक प्रमाणात ओलावा आहेत, हे जरी सत्य असले तरी पण सोयाबीनचे भाव आधीच घसरले होते हेही तितकेच खरे आहे. तसेही शेतमालाच्या दरात चढ-उतार सुरूच असतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाहिजे त्या प्रमाणात आवक नाही."- विक्की उमरे, व्यापारी

व्यापारी काय म्हणतात... "सोयाबीनचे दर आता जरी घसरले असेल तरी पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी गरजेपुरते सोयाबीन विकावे. पूर्ण माल एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने विकणे फायद्याचे ठरू शकतील. शेतकऱ्यांनी बाजारांचाही अंदाज घ्यावा."- प्रमोद ठाकरे, व्यापारी

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र