शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळला: पाणंद रस्ता न मिळाल्यास रेल्वे रोखणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:44 IST

वर्धा-नांदेड रेल्वेमुळे अडकले शेतकरी : संतप्त शेतकऱ्यांचा रेल रोकोचा इशारा!

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामात सालोड (हिरापूर) येथून नागठाणाकडे जाणारा पाणंद रस्ता रेल्वेकामात बंद झाला. शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंगलगत पाणंद रस्ता देत खडीकरणाचे आश्वासन दिले होते. मात्र, याला दोन वर्षांचा कार्यकाळ लोटला, तरी खडीकणाच्या कामासाठी साधी खडीही पडली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचेकळंबपर्यंत काम पूर्ण झाले. या मार्गावर रेल्वेगाडीही सुरू झाली आहे. या मार्गावर सालोड (हिरापूर)-पुलगाव मार्गावर रेल्वे क्रॉसिंग आहे. या क्रॉसिंगपासून नागठाणा येथे रस्ता जातो. या कामात हा पाणंद रस्ता बंद केला होता. वहिवाटीचा प्रश्न उ‌द्भवल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीला अर्ज, निवेदन देऊन पाणंद रस्ता देण्याची मागणी केली होती. मात्र, रेल्वे प्रशासन निवेदनाला गंभीरतेने घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. रेल्वे क्रॉसिंगपासून शेतकऱ्यांना रस्ता देत नागठाण्यापर्यंत या नव्या पाणंद रस्त्याचे खडीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण, या गोष्टीला आता दोन वर्षाचा काळ लोटून सुद्धा कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. आता खरीप हंगाम तोंडावर असून, मार्गाने जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून तसा इशाराही रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

...तर रेल रोको आंदोलनपाणंद रस्त्याच्या खडीकरणासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून रस्ता खडीकरणासाठी कोणतीही हालचाल होताना दिसून येत नाही. त्यामुळे संतापलेल्या सालोड, भैव्यापूर, श्यामपूर या शिवारातील शेतकऱ्यांनी वर्धा ते कळबपर्यंत सुरू असलेली रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच शेतकरीही संतप्त झाले आहे. 

दोनशे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न बिकट, हंगामाला सुरुवात

  • या पाणंद रस्त्यावर भैयापूर, शामपूर या शेतशिवारात सालोड हिरापूर येथील किमान २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेती आहे.
  • शेतकऱ्यांनी अडवणूक केली, तेव्हा आश्वासन दिले होते. मात्र, गत दोन वर्षांत कामासाठी साधी घडीही पडली नाही. 
  • गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी या रस्त्याची पाहणी करून गेले. पुन्हा तेच आश्वासन देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आली, मात्र पावसाळा तोंडावर असून, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. शेतात बी बियाणे न्यावी कशी, पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
टॅग्स :wardha-acवर्धाFarmerशेतकरी