शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकरी संघटनेचे जिल्हा कचेरीसमोर धरणे

By admin | Updated: March 15, 2017 01:40 IST

आधारभूत किमतीनुसार तूर खरेदी करावी यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेद्वारे

आधारभूत किमतीनुसार तूर खरेदीसाठी निवेदनातून साकडे वर्धा : आधारभूत किमतीनुसार तूर खरेदी करावी यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी १ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. राज्यात तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शासनाने आयात केलेल्या डाळी व कडधान्यामुळे तुरीचे दर आधारभूत किमतीपेक्षा खाली कोसळले आहेत. शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रांची संख्या कमी आहे. साठवणुकीसाठी गोदाम व बारदाना उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी सध्या खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या चुकाऱ्याचे धनादेश महिना-महिना वटत नाहीत. पयार्याने शेतकऱ्यांना व्यापारी देईल त्या भावात आपली तूर विकावी लागत आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तूर उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात तूर उत्पादक पट्ट्यात सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या व मोठ्या बाजारपेठेच्या गावात तूर खरेदी केंद्र सुरू करून पुरेसे वजन काटे लावावेत. केंद्रावर आलेल्या तुरीचे २४ तासात वजन झाले पाहिजे व ४८ तासात धनादेश वटून शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळण्याची व्यवस्था करावी. एफएक्यूच्या नियमांत सुधारणा करून तुरीचे व इतर शेतमालाचे चार प्रकारात (प्रतीत) वर्गीकरण करून चार दर निश्चित करावे. प्रतवारीबाबत शेकऱ्यांची तक्रार असल्यास वांधा कमिटी स्थापन करून २४ तासांत निर्णय द्यावा. खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी सातबारा उताऱ्याची अट रद्द करावी. तूर खरेदीबाबत शेतकरी संघटनेने केलेल्या सूचनांवर त्वरित व गांभीर्याने विचार व्हावा. रबी हंगामातील गहू व हरभरा या महत्त्वाच्या पिकांबाबतही अशीच स्थिती निर्माण होणार आहे. हे दोन्ही शेतमाल आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकली जाणार आहे. केंद्र शासनाने केलेल्या अनावश्यक आयातीमुळे या शेतमालाचे दर कोसळले आहे. हा माल आधारभूत किमतीनुसार खरेदी करणे शासनाला शक्य नसल्यास आधारभूत किमती जाहीर करण्याचे नाटक शासनाने बंद करावे, असेही निवेदनात नमूद केले. कच्च्या मालाची लूट थांबावी म्हणून म. गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले; पण स्वातंत्र्योत्तर काळातही शेतमाल व शेतीतील श्रमाची लूट अव्याहतपणे सुरु राहिल्याने गावगाडा भकास झाला. शेतीसोबतच घरसंसार सांभाळताना सर्वाधिक कुचंबना गावातील महिलेची होत आहे. ग्रामीण महिलेच्या आर्थिक असहायतेचा फायदा उचलून महिला बचट गटाच्या माध्यमातून अनेक फायनान्स कंपन्या अवाजवी व्याजदराने कर्ज पुरवठा करून स्त्रियांचे शोषण करीत आहे. कर्जवसुलीच्या सक्तीच्या व अपमानास्पद पद्धतीने महिलांवर आत्महत्येची वेळ आली. ही वसुली अनैतिक असल्याने महिला बचत गटावरील सर्व कर्जे रद्दबातल करावी, अशी मागणीही केली. आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, माजी आमदार सरोज काशीकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्या राऊत, सचिन डाफे, सतीश दाणी, प्रा. पांडुरंग भालशंकर, शांताराम भालेराव, बापू ठाकरे, रवींद्र सावरकर, प्रकाश ढाके, निळकंठ खोडे, दिलीप राऊत, किसना बोरकर, प्रमोद तलमले आदी सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या लुटीच्या धोरणाचा केला निषेध केंद्र शासनाने शेती शोषणाच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. या लुटीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी तथा तूर, हरभरा, गहू या शेतमालाच्या आधारभूत किमतीनुसार खरेदीची प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक धरणे आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत अविलंब कार्यवाहीची मागणी करण्यात आली.