शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

औद्योगिक वसाहतीला जमीन देण्यास शेतकऱ्यांनी दर्शविली संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:49 IST

उद्योगांकरिता येथे मिनी एमआयडीसी कार्यरत आहे. या औद्योगिक वसाहतीचा २३४ हेक्टरमध्ये विस्तार होणार आहे.

शासन देणार रेडिरेकनरच्या दीडपट भाव लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : उद्योगांकरिता येथे मिनी एमआयडीसी कार्यरत आहे. या औद्योगिक वसाहतीचा २३४ हेक्टरमध्ये विस्तार होणार आहे. याबाबतचे नोटीफीकेशनही जाहीर करण्यात आले आहे; पण दर काय देणार, या वादात पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणास शासनाला संमती दिली नव्हती. परिणामी, औद्योगिक वसाहत विस्तारली नव्हती. आता रेडीरेकनरच्या दीडपट भाव देत जमिनी अधिग्रहित करण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. यामुळे एमआयडीसी विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. एमआयडीसीच्या विस्ताराबाबत ‘लोकमत’ पाठपुरावा केला. यापूर्वी दोन सभा झाल्या; पण निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने जमीन अधिग्रहनाचा भाव किती द्यायचा, याबाबत निर्णय होऊ शकला नाही. २१ जुलै रोजी १०० शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात संयुक्त सभा झाली. या सभेला माजी आमदार दादाराव केचे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संगीतराव, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, क्षेत्र व्यवस्थापक भानुदास यादव व तहसीलदार महेश शितोळे उपस्थित होते. चर्चा केल्यानंतर झालेल्या वाटाघाटीत शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत केलेल्या जमिनीला रेडिरेकनरच्या दीडपट भाव देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. तत्सम प्रस्तावही त्वरित शासनाकडे पाठविण्याचे ठरले. काही व्यापारी प्रवृत्तीच्या शेतकऱ्यांनी पाचपट भावाची मागणी केली होती; पण ती अधिकाऱ्यांनी नाकारली. रेडीरेकनरच्या दीडपट भाव जमिनीला देण्याचे शासनाने व घेण्याचे शेतकऱ्यांनी मान्य केल्याने जमीन अधिग्रहण करण्याचा तिढा संपुष्टात आला आहे. यामुळे एमआयडीसीच्या कामाला वेग येणार असून तालुक्याची एक मोठी समस्या निकाली निघेल. तथा विकासाला गती मिळेल, असा समाधानाचा सूर उमटत आहे. औद्योगिक वसाहतीला लागणाऱ्या पाण्याची तरतूद कार प्रकल्पातून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. कित्येक वर्षांपासूनचा तिढा सुटल्याने आता कारंजा एमआयडीसीचा विस्तार झपाट्याने होऊ शकणार आहे. शेतकऱ्यांना प्राधान्य द्या कारंजा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी तालुक्यातील तब्बल १२० शेतकऱ्यांची २३४ हेक्टर मोलाची जमीन जाणार आहे. यामुळे जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना या एमआयडीसीमध्ये व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांतून समोर येत आहे. शिवाय औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या उद्योगांमध्ये जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.