शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

औद्योगिक वसाहतीला जमीन देण्यास शेतकऱ्यांनी दर्शविली संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:49 IST

उद्योगांकरिता येथे मिनी एमआयडीसी कार्यरत आहे. या औद्योगिक वसाहतीचा २३४ हेक्टरमध्ये विस्तार होणार आहे.

शासन देणार रेडिरेकनरच्या दीडपट भाव लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : उद्योगांकरिता येथे मिनी एमआयडीसी कार्यरत आहे. या औद्योगिक वसाहतीचा २३४ हेक्टरमध्ये विस्तार होणार आहे. याबाबतचे नोटीफीकेशनही जाहीर करण्यात आले आहे; पण दर काय देणार, या वादात पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणास शासनाला संमती दिली नव्हती. परिणामी, औद्योगिक वसाहत विस्तारली नव्हती. आता रेडीरेकनरच्या दीडपट भाव देत जमिनी अधिग्रहित करण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. यामुळे एमआयडीसी विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. एमआयडीसीच्या विस्ताराबाबत ‘लोकमत’ पाठपुरावा केला. यापूर्वी दोन सभा झाल्या; पण निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने जमीन अधिग्रहनाचा भाव किती द्यायचा, याबाबत निर्णय होऊ शकला नाही. २१ जुलै रोजी १०० शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात संयुक्त सभा झाली. या सभेला माजी आमदार दादाराव केचे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संगीतराव, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, क्षेत्र व्यवस्थापक भानुदास यादव व तहसीलदार महेश शितोळे उपस्थित होते. चर्चा केल्यानंतर झालेल्या वाटाघाटीत शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत केलेल्या जमिनीला रेडिरेकनरच्या दीडपट भाव देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. तत्सम प्रस्तावही त्वरित शासनाकडे पाठविण्याचे ठरले. काही व्यापारी प्रवृत्तीच्या शेतकऱ्यांनी पाचपट भावाची मागणी केली होती; पण ती अधिकाऱ्यांनी नाकारली. रेडीरेकनरच्या दीडपट भाव जमिनीला देण्याचे शासनाने व घेण्याचे शेतकऱ्यांनी मान्य केल्याने जमीन अधिग्रहण करण्याचा तिढा संपुष्टात आला आहे. यामुळे एमआयडीसीच्या कामाला वेग येणार असून तालुक्याची एक मोठी समस्या निकाली निघेल. तथा विकासाला गती मिळेल, असा समाधानाचा सूर उमटत आहे. औद्योगिक वसाहतीला लागणाऱ्या पाण्याची तरतूद कार प्रकल्पातून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. कित्येक वर्षांपासूनचा तिढा सुटल्याने आता कारंजा एमआयडीसीचा विस्तार झपाट्याने होऊ शकणार आहे. शेतकऱ्यांना प्राधान्य द्या कारंजा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी तालुक्यातील तब्बल १२० शेतकऱ्यांची २३४ हेक्टर मोलाची जमीन जाणार आहे. यामुळे जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना या एमआयडीसीमध्ये व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांतून समोर येत आहे. शिवाय औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या उद्योगांमध्ये जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.