शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

भूयारी पांदण मार्गासाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:00 AM

चार पदरी राष्ट्रीय महामार्गचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले जात आहे. परंतु, रस्ता बांधकामादरम्यान इंदिरानगर ते एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न देण्यात आल्याचा आरोप करीत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

ठळक मुद्देरोखली वाहने : दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कार्यप्रणालीवर ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चार पदरी राष्ट्रीय महामार्गचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले जात आहे. परंतु, रस्ता बांधकामादरम्यान इंदिरानगर ते एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न देण्यात आल्याचा आरोप करीत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. सदर आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले, हे विशेष.आंदोलनकर्त्यांचा रोष लक्षात घेवून रस्त्याचे काम थांबविण्यात आले होते. शिवाय आंदोलनकर्त्यांनी बिल्डकॉन कंपनीचे मालवाहू अडविण्यात आले होते. शासकीय दस्ताऐवजानुसार स्थानिक इंदिरानगर ते एकपाळा या १०० फुट रूंदीच्या पांदण रस्त्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे. या पांदण रस्त्यावर अनेक कास्तकारांच्या शेती आहे. त्यामुळे परंपरागत शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच एकपाळा देवस्थान व इतर गावांना जोडणारा रस्ता असून सदर मार्गावर भुयारी मार्ग न देता रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. याबाबत अनेकदा खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देत योग्य कार्यवाहीची मागणी करण्यात आली. परंतु, समस्या निकाली काढण्यात आली नाही. बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी मनमर्जी धोरण राबवित सदर काम करीत आहेत. शिवाय ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न दिल्यास परिसरातील शेतकऱ्यांना ५ कि.मी. अंतराचा फेरा घेवून शेती करावी लागणार आहे. त्यातच भुयारी मार्ग न झाल्यास १०० फुट रूंदीच्या या पांदण रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण होवून हा रस्ताच संपुष्टात येण्याचे चित्र निर्माण झाले आहे. आपआपल्या शेतातून पांदण रस्त्यावर आल्यानंतर शेतमालाची वाहतूक करावी लागत असल्याने हा मार्ग महत्वपूर्ण ठरला आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून वेळ काढू धोरण अवलंबले जात आहे. प्रशासनाने हेकेखोरीची भूमिका सोडून तोडगा काढावा अन्यथा भुयारी मार्गासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा यावेळी देण्यात आला.आंदोलनात माजी नगराध्यक्ष अब्दुल जब्बार, शिवसेना शहर प्रमुख महेश जोशी, रवी कारोटकर, छोटू देशमुख, गणेश गिरडे, मोहन ढाकरे, महादेव पाटील, अशोक डाखोरे, मोहन ढाकुलकर, प्रमोद कारोटकर, गंगाधर कारोटकर, सचिन वैद्य, रूपेश ठाकरे, राजेश इंगोले, गणेश सुरकार, हबीब खान पठाण, सुरेश कामडी, सुभाष जयपुरकर, गजानन कारोटकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. सदर प्रकरणी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाºयांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप