शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बोंडअळीच्या मदतीच्या घोषणेने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:49 AM

हल्लाबोल यात्रेदरम्यान बोंड अळीच्या हल्ल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांना आवाहन करीत त्यांच्याकडून कपाशीच्या पिकावर नागर फिरवून ही व्यथा शासन दरबारी पोहोचविण्याची विनंती केली.

ठळक मुद्देमागणीची सुरूवात पवनारातून : दोन हेक्टरपर्यंत मिळणार शेतकऱ्यांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : हल्लाबोल यात्रेदरम्यान बोंड अळीच्या हल्ल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांना आवाहन करीत त्यांच्याकडून कपाशीच्या पिकावर नागर फिरवून ही व्यथा शासन दरबारी पोहोचविण्याची विनंती केली. शिवाय शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनेही केली. याची शासनाला दखल घ्यावी लागली. शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकत भरघोस मदत जाहीर केली. यामुळे शेतकरी सुखावला आहे.कृषी सहायक प्रशांत भोयर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार पवनार शिवारात ५३९ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. ४०० हेक्टरचा सर्व्हे आटोपला. काही शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद न केल्याने त्यांचा सर्व्हे करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. २०१७-१८ ची पीक नोंदणी तलाठी कार्यालयात सुरू आहे. पिकांची नोंद न करणाऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकणार नाही, तेव्हा अशा शेतकऱ्यांनी त्वरित नोंद करून घेण्याचे आवाहन तलाठी लवणकर यांनी दवंडीद्वारे केले आहे. यात ठेक्याने, मक्त्याने शेती करणाऱ्यांची मुख्य अडचण आहे. सुमारे २०० हेक्टर हेत्र हे ठेका, बटईने केलेले आहे. ठेकापत्र न केल्याने ही मदत मूळ मालकाला मिळेल. यामुळे ज्याचे नुकसान झाले, तो मात्र मदतीपासून वंचित राहील. मूळ मालक हा ठेक्याने जमीन देताना पूर्ण रक्कम आधीच घेत असतो. यामुळे त्यातून कपात करण्याची सोय नाही. ठेक्याने, बटईने शेती करणाऱ्यांचा वेगळा सर्व्हे करून जमीन कसणाऱ्याला मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता ठेकापत्र करायचे म्हटल्यास मूळ मालक तयार होत नसल्याचे दिसते.बोंडअळीने त्रस्त शेतकऱ्याने शेतात फिरविला नांगरआर्वी - बोंडअळीने शेतकरी त्रस्त आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. परिणामी, बोंडअळीला कंटाळून आर्वी तालुक्यातील जळगाव येथील धनंजय चौबे या शेतकऱ्याने कपाशीच्या शेतात ट्रक्टरद्वारे नांगर फिरविला आहे. उत्पन्नच मिळणार नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. हा प्रकार तालुक्यात अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो.शेतकरी हवालदिलनाचणगाव - गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यात थैमान घातले. देवळी तालुक्यात या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो. या अळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. देवळी तालुक्यात २९,८३४ हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली होती. पैकी २५,३५९ हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले. एकूण ४,३३५ शेतकऱ्यांनी जी फार्म अर्ज कृषी कार्यालय वा कृषी अधिकारी पं.स. देवळी यांना सादर केले. २१ डिसेंबरपर्यंत ९१२९.२४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे शासनामार्फत करण्यात आले आहे. उर्वरित पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे.मदतीबाबत संभ्रमजी फार्म भरलेले शेतकरीच शासनाकडून बोंडअळीच्या मदतीस पात्र ठरतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पॉकीट खरेदीची बिले अनेकांकडे नाही; पण नुकसान सर्वांचेच झाले आहे. बोंडअळीमुळे नुकसानापोटी कापूस उत्पादक शेतकऱ्यास एनडीआरएफ मार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८००० रुपये, कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्याकडून मिळणारी १६ हजार रुपये मदत, अशी साधारणपणे ३० हजार ८०० रुपये मदत मिळणार आहे. बागायती कापूस उत्पादक शेतकºयांना ही मदत अधिक राहणार आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंत राहणार आहे.