शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

प्रकल्पाच्या पाण्याने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 11, 2015 01:27 IST

परिसरात पोथरा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था केली आहे.

पाटसऱ्यांची दुरवस्था : पाणी रस्त्यावर येत असल्याने वहीवाटीत अडथळानारायणपूर : परिसरात पोथरा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था केली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. मुख्य कालव्यावरून खांबाडा वितरिका क्रमांक २ चे पाणी पाटसऱ्या साफ नसल्याने व मार्गावरील पूल खचल्याने येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे पाटसऱ्या स्वच्छ करून रस्त्यावर येत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील बाधित शेतकरी करीत आहे.येथील शेतकरी दिनेश वैद्य, प्रमोद मानकर यांनी याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले.वास्तविक पाहाता सिंचन विभागातील अभियंत्यांद्वारे व उपवितरका, पाटसऱ्या साफ करुनच पाणी सोडणे अनिवार्य असते. पण कोणत्याही प्रकारची स्वच्छता न करता धरणातील पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. पाटसऱ्यांतील पाणी रस्त्यावर जमा होऊन तळे साचत आहे. त्यामुळे वहीवाटीस अडथळा निर्माण होऊन शेतीतील कामे खोळंबली आहे. पाण्यामुळे शेतमाल घरी आणनेही कठीण झाले आहे. याबाबत शेतकरी तक्रार करीत असल्याने शाखाधिकारी पानवटकर यांनी सदर प्रभावित जागेची पाहणी केली. पण निधी नसल्यामुळे काम करणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले. शासन सिंचनाकरिता कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. पण सिंचन विभागाकडे तरीही निधी प्राप्त होत नसल्याचे अधिकारी सांगतात. परंतु शेतकरी सदर बाबा अमान्य करीत सिंचन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.तसेच विभागाच्या उदासीन धोरणामुळे संताप व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)