शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

त्रिनेव्हा कंपनीत स्फोट; तळेगावातील १३ घरांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

वर्धा-आर्वी मार्गाचे रुंदीरकरण व सिमेंटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी तळेगाव (रघुजी) भागातील त्रिनेव्हा कंपनीच्या डेऱ्यातून बांधकाम साहित्याचा पुरवठा केला जातो. याच कंपनीच्या माध्यमातून टेकडी परिसर पोखरला जात आहे. त्यासाठी वेळोवेळी बारूदचा वापर करून ब्लास्ट केले जात आहे. अशातच आज बारुदचा वापर करून ब्लास्ट करण्यात आला.

ठळक मुद्देपरिसरात भीतीचे वातावरण : ग्रामस्थांनी रोखली मालवाहू जड वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कखरांगणा (मो.) : आर्वी-वर्धा मार्गावरील तळेगाव (रघुजी) शिवारात त्रिनेव्हा कंपनीच्या कामगारांनी आपला डेरा टाकला आहे. येथेच उत्खन्न करून बांधकाम साहित्य इतर ठिकाणी नेले जाते. याच कंपनीच्या आवारात मंगळवारी सकाळी ११ वाजता उत्खन्नासाठी बारुदचा वापर करून ब्लास्ट करण्यात आले. याच ब्लास्टच्या हादऱ्यामुळे तळेगाव (रघुजी) गावातील तब्बल १३ घरांना तडे गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर जड वाहने थांबवून आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी मध्यस्ती केल्यावर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. असे असले तरी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वर्धा-आर्वी मार्गाचे रुंदीरकरण व सिमेंटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी तळेगाव (रघुजी) भागातील त्रिनेव्हा कंपनीच्या डेऱ्यातून बांधकाम साहित्याचा पुरवठा केला जातो. याच कंपनीच्या माध्यमातून टेकडी परिसर पोखरला जात आहे. त्यासाठी वेळोवेळी बारूदचा वापर करून ब्लास्ट केले जात आहे. अशातच आज बारुदचा वापर करून ब्लास्ट करण्यात आला. याच ब्लास्टच्या हादऱ्यामुळे तळेगाव (रघुजी) येथील सुमारे तेरा घरांना तडे गेले आहेत. नुकसान झालेल्यांमध्ये प्रफुल सरदार, मधुकर कालोकार, चक्रधर उके, सुनील रुईकर, दशरथ बोरकर, गजू भोयर, आदिनाथ रंगारी आदींचा समावेश आहे. ब्लास्टला हादरा इतका भयावह होता की जनू भुकंपच आल्याचे ग्रामस्थांना जाणवले. त्यानंतर ग्रामस्थांनी स्वत:ला सावरून कंपनीच्या मुख्यद्वाराकडे आपला मोर्चा वळविला. संतप्त ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाच्या विरोधात वाहन रोखून नारेबारी करीत नुकसान भरपाईची व कंपनीचा डेरा हटविण्याची मागणी रेटली. दरम्यान खरांगणा पोलिसांनी आंदोलन स्थळ गाठून चर्चा केली. पोलिसांच्या मध्यस्तीअंती आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.वारंवार तक्रार; पण कारवाई शून्यत्रिनेव्हा कंपनीच्यावतीने ब्लास्ट करून टेकडी पोखरून मुरूम व दगडाची उचल केली जात आहे. इतकेच नव्हे तर काळ्या दगडापासून गिट्टी बनविल्या जात आहे. बारूदचा वापर करून केले जाणारे ब्लास्ट परिसरातील नागरी वसाहतीसाठी धोकादायक ठरत असल्याने हा मनमर्जी कारभार बंद करण्याच्या मागणीचे संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी वेळोवेळी दिले. परंतु, अधिकारीही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.त्रिनेव्हा कंपनीत करण्यात आलेल्या ब्लास्टमुळे गावातील सुमारे १३ घरांना तडे गेले आहे. यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रा.प.ने या कंपनीला केवळ मुक्काम व मुरुम व मातीची उचल करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु, बारुदचा वापर करून ब्लास्ट केले जात असल्याचे लक्षात येताच हा प्रकार बंद करण्याच्या लेखी सूचना या कंपनीला देण्यात आल्या आहेत. परंतु, कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आजच्या प्रकाराने दिसून येते. आठवड्यातून दोन वेळा ही कंपनी रात्री-बेरात्री ब्लास्ट करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेऊन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. शिवाय ब्लास्टींगचा प्रकार थांबवावा.- प्रभा कालोकार, सरपंच, तळेगाव (रघुजी).ग्रा.पं.च्या लेखी सूचनांकडे कंपनीची पाठबारुदचा वापर करून ब्लास्ट करून गौण खनिजाचे उत्खनन हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकत असल्याने ग्रा.प. प्रशासनाने त्रिनेव्हा कंपनी प्रशासनाला बारूदचा वापर करून ब्लास्ट करण्यात येऊ नये अशा लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र, त्रिनेव्हा कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या लेखी सूचनांकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत असल्याचे तळेगाव (रघुजी) येथील उपसरपंच धनराज गळहाट, यशवंत चकाले, रमेश वाढई, कवडू रामटेके यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Blastस्फोट