शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

त्रिनेव्हा कंपनीत स्फोट; तळेगावातील १३ घरांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

वर्धा-आर्वी मार्गाचे रुंदीरकरण व सिमेंटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी तळेगाव (रघुजी) भागातील त्रिनेव्हा कंपनीच्या डेऱ्यातून बांधकाम साहित्याचा पुरवठा केला जातो. याच कंपनीच्या माध्यमातून टेकडी परिसर पोखरला जात आहे. त्यासाठी वेळोवेळी बारूदचा वापर करून ब्लास्ट केले जात आहे. अशातच आज बारुदचा वापर करून ब्लास्ट करण्यात आला.

ठळक मुद्देपरिसरात भीतीचे वातावरण : ग्रामस्थांनी रोखली मालवाहू जड वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कखरांगणा (मो.) : आर्वी-वर्धा मार्गावरील तळेगाव (रघुजी) शिवारात त्रिनेव्हा कंपनीच्या कामगारांनी आपला डेरा टाकला आहे. येथेच उत्खन्न करून बांधकाम साहित्य इतर ठिकाणी नेले जाते. याच कंपनीच्या आवारात मंगळवारी सकाळी ११ वाजता उत्खन्नासाठी बारुदचा वापर करून ब्लास्ट करण्यात आले. याच ब्लास्टच्या हादऱ्यामुळे तळेगाव (रघुजी) गावातील तब्बल १३ घरांना तडे गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर जड वाहने थांबवून आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी मध्यस्ती केल्यावर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. असे असले तरी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वर्धा-आर्वी मार्गाचे रुंदीरकरण व सिमेंटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी तळेगाव (रघुजी) भागातील त्रिनेव्हा कंपनीच्या डेऱ्यातून बांधकाम साहित्याचा पुरवठा केला जातो. याच कंपनीच्या माध्यमातून टेकडी परिसर पोखरला जात आहे. त्यासाठी वेळोवेळी बारूदचा वापर करून ब्लास्ट केले जात आहे. अशातच आज बारुदचा वापर करून ब्लास्ट करण्यात आला. याच ब्लास्टच्या हादऱ्यामुळे तळेगाव (रघुजी) येथील सुमारे तेरा घरांना तडे गेले आहेत. नुकसान झालेल्यांमध्ये प्रफुल सरदार, मधुकर कालोकार, चक्रधर उके, सुनील रुईकर, दशरथ बोरकर, गजू भोयर, आदिनाथ रंगारी आदींचा समावेश आहे. ब्लास्टला हादरा इतका भयावह होता की जनू भुकंपच आल्याचे ग्रामस्थांना जाणवले. त्यानंतर ग्रामस्थांनी स्वत:ला सावरून कंपनीच्या मुख्यद्वाराकडे आपला मोर्चा वळविला. संतप्त ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाच्या विरोधात वाहन रोखून नारेबारी करीत नुकसान भरपाईची व कंपनीचा डेरा हटविण्याची मागणी रेटली. दरम्यान खरांगणा पोलिसांनी आंदोलन स्थळ गाठून चर्चा केली. पोलिसांच्या मध्यस्तीअंती आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.वारंवार तक्रार; पण कारवाई शून्यत्रिनेव्हा कंपनीच्यावतीने ब्लास्ट करून टेकडी पोखरून मुरूम व दगडाची उचल केली जात आहे. इतकेच नव्हे तर काळ्या दगडापासून गिट्टी बनविल्या जात आहे. बारूदचा वापर करून केले जाणारे ब्लास्ट परिसरातील नागरी वसाहतीसाठी धोकादायक ठरत असल्याने हा मनमर्जी कारभार बंद करण्याच्या मागणीचे संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी वेळोवेळी दिले. परंतु, अधिकारीही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.त्रिनेव्हा कंपनीत करण्यात आलेल्या ब्लास्टमुळे गावातील सुमारे १३ घरांना तडे गेले आहे. यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रा.प.ने या कंपनीला केवळ मुक्काम व मुरुम व मातीची उचल करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु, बारुदचा वापर करून ब्लास्ट केले जात असल्याचे लक्षात येताच हा प्रकार बंद करण्याच्या लेखी सूचना या कंपनीला देण्यात आल्या आहेत. परंतु, कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आजच्या प्रकाराने दिसून येते. आठवड्यातून दोन वेळा ही कंपनी रात्री-बेरात्री ब्लास्ट करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेऊन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. शिवाय ब्लास्टींगचा प्रकार थांबवावा.- प्रभा कालोकार, सरपंच, तळेगाव (रघुजी).ग्रा.पं.च्या लेखी सूचनांकडे कंपनीची पाठबारुदचा वापर करून ब्लास्ट करून गौण खनिजाचे उत्खनन हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकत असल्याने ग्रा.प. प्रशासनाने त्रिनेव्हा कंपनी प्रशासनाला बारूदचा वापर करून ब्लास्ट करण्यात येऊ नये अशा लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र, त्रिनेव्हा कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या लेखी सूचनांकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत असल्याचे तळेगाव (रघुजी) येथील उपसरपंच धनराज गळहाट, यशवंत चकाले, रमेश वाढई, कवडू रामटेके यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Blastस्फोट