शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

सतत बदलत्या वातावरणाचा फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सुमारे साडे सात हजार हेक्टर क्षेत्र फळबागाखाली आहे. आर्वी  उपविभागात सर्वाधिक संत्रा, मोसंबी, लिंबू , केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. पण सध्या जिल्ह्यात दिवसेंदिवस पार घसरत आहे. या थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा  बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे.

ठळक मुद्देसंत्रा, मोसंबी, पपई उत्पादकांच्या अडचणीत भर : कृषीविभाग मात्र सुस्तच

राजेश सोळंकी    लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा वाढत आहे. तर आर्वी उपविभागात काही भागात ढगाळी वातावरण कायम आहे. याचा फटका फळबागांवर दिसून येत असून फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.जिल्ह्यात सुमारे साडे सात हजार हेक्टर क्षेत्र फळबागाखाली आहे. आर्वी  उपविभागात सर्वाधिक संत्रा, मोसंबी, लिंबू , केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. पण सध्या जिल्ह्यात दिवसेंदिवस पार घसरत आहे. या थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा  बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे. तर आर्वी उपविभागातील कारंजा तालुक्यातील जसापूर येथे थंडीमुळे पपई पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहेत. पपईच्या झाडांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. अशातच बुरशी आणि मावाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. आंबीया बहराचा संत्राही यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना विकता आला नाही. तो झाडावरूनच गळून पडला. 

तीन एकरात पपईची लागवड केली. वाढत्या थंडीचा पिकावर परिणाम होत आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.- किशोर बंनगरे, फळ उत्पादक, जसापूर.

सततच्या पावसामुळे फळगळ झाली. तर सध्या थंडीमुळे डिंक्या, कोळशी आदी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.- गौरव ठाकरे, फळ उत्पादक,            हिवरा तांडा. 

सहा महिन्यांपासून फळबागांवर परिणाम मदतीची प्रतीक्षामागील सहा महिन्यांपासून संत्रा पिकावर तपकीरी रॅाट या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. त्यामुळे त्यावेळी संत्रा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. आता  वाढत्या थंडीमुळे पुन्हा डिंक्या रोग आहे.डिक्या रोगापासून बचाव करण्यासाठी चुना आणि मोरचुद यांचे मिश्रण करून झाडाला लावावे कृषी विभागाने केले आहे. थंडीमुळे फळगळती होते. तसेच फुलगळतात. आर्वी उपविभागात संत्रा, मोसंबी आणि पपई या पिकांवर याचा परिणाम दिसून येत आहे.सततच्या रोग प्रार्दुभावामुळे संत्रा उत्पादकांनी लावलेला खर्चही यंदा निघणे कठीण झाले आहे. रोहणा येथील शेतकऱ्याला लागलेले पैसेही मिळालेले नाही, अशी माहिती या हवालदिल शेतकऱ्याने सांगितले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीweatherहवामान