शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सतत बदलत्या वातावरणाचा फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सुमारे साडे सात हजार हेक्टर क्षेत्र फळबागाखाली आहे. आर्वी  उपविभागात सर्वाधिक संत्रा, मोसंबी, लिंबू , केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. पण सध्या जिल्ह्यात दिवसेंदिवस पार घसरत आहे. या थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा  बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे.

ठळक मुद्देसंत्रा, मोसंबी, पपई उत्पादकांच्या अडचणीत भर : कृषीविभाग मात्र सुस्तच

राजेश सोळंकी    लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा वाढत आहे. तर आर्वी उपविभागात काही भागात ढगाळी वातावरण कायम आहे. याचा फटका फळबागांवर दिसून येत असून फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.जिल्ह्यात सुमारे साडे सात हजार हेक्टर क्षेत्र फळबागाखाली आहे. आर्वी  उपविभागात सर्वाधिक संत्रा, मोसंबी, लिंबू , केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. पण सध्या जिल्ह्यात दिवसेंदिवस पार घसरत आहे. या थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा  बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे. तर आर्वी उपविभागातील कारंजा तालुक्यातील जसापूर येथे थंडीमुळे पपई पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहेत. पपईच्या झाडांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. अशातच बुरशी आणि मावाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. आंबीया बहराचा संत्राही यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना विकता आला नाही. तो झाडावरूनच गळून पडला. 

तीन एकरात पपईची लागवड केली. वाढत्या थंडीचा पिकावर परिणाम होत आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.- किशोर बंनगरे, फळ उत्पादक, जसापूर.

सततच्या पावसामुळे फळगळ झाली. तर सध्या थंडीमुळे डिंक्या, कोळशी आदी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.- गौरव ठाकरे, फळ उत्पादक,            हिवरा तांडा. 

सहा महिन्यांपासून फळबागांवर परिणाम मदतीची प्रतीक्षामागील सहा महिन्यांपासून संत्रा पिकावर तपकीरी रॅाट या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. त्यामुळे त्यावेळी संत्रा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. आता  वाढत्या थंडीमुळे पुन्हा डिंक्या रोग आहे.डिक्या रोगापासून बचाव करण्यासाठी चुना आणि मोरचुद यांचे मिश्रण करून झाडाला लावावे कृषी विभागाने केले आहे. थंडीमुळे फळगळती होते. तसेच फुलगळतात. आर्वी उपविभागात संत्रा, मोसंबी आणि पपई या पिकांवर याचा परिणाम दिसून येत आहे.सततच्या रोग प्रार्दुभावामुळे संत्रा उत्पादकांनी लावलेला खर्चही यंदा निघणे कठीण झाले आहे. रोहणा येथील शेतकऱ्याला लागलेले पैसेही मिळालेले नाही, अशी माहिती या हवालदिल शेतकऱ्याने सांगितले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीweatherहवामान