शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वर्धेत ‘जेंडर टास्क फोर्स’ची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:16 IST

घरातील कर्त्या पुरूषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आत्महत्या शेतकरी कुटुंबीयांना समुपदेशन करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. घरातील कर्त्या पुरूषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ‘जेंडर टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती, मुलांचे शिक्षण, प्राप्त मदत अशा विविध बाबींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ‘जेंडर टास्क फोर्स’ मध्ये जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, महिला किसान अधिकार मंचचे प्रतिनिधी, महिला उपजिल्हाधिकारी, समाज कल्याण संस्था प्रतिनिधी यांचा समावेश राहील, असा निर्णय विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी घेतला आहे. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.बैठकीला वर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त सुधाकर तेलंग, तहसीलदार रवींद्र माने, महिला किसान अधिकार मंचच्या सीमा कुळकर्णी, सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी सुवर्णा दामले, नुतन माळवी, शुभदा देशमुख, आरती बैस आदी उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी बनेल वारसशेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या विधवा पत्नीची वारस म्हणून नोंद होणे अपेक्षित आहे; पण अनेक शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीची वारस म्हणून नोंद न झाल्याने त्या शासकीय योजनांपासून वंचित आहेत.त्यांना त्यांचा हक्क मिळावा या दृष्टीने जिल्हानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीकरिता हेल्पलाईनशेतकरी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या समुपदेशन चमूच्या बळकटीकरणासाठी प्रशिक्षण देण्यासोबतच कार्यशाळादेखील घेण्यात येईल. वर्धा जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन तसेच महिला किसान अधिकार मंचच्या मदतीने या हेल्पलाईन केंद्राचे कामकाज चालेल.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या