शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

वर्धेत ‘जेंडर टास्क फोर्स’ची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:16 IST

घरातील कर्त्या पुरूषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आत्महत्या शेतकरी कुटुंबीयांना समुपदेशन करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. घरातील कर्त्या पुरूषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ‘जेंडर टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती, मुलांचे शिक्षण, प्राप्त मदत अशा विविध बाबींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ‘जेंडर टास्क फोर्स’ मध्ये जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, महिला किसान अधिकार मंचचे प्रतिनिधी, महिला उपजिल्हाधिकारी, समाज कल्याण संस्था प्रतिनिधी यांचा समावेश राहील, असा निर्णय विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी घेतला आहे. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.बैठकीला वर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त सुधाकर तेलंग, तहसीलदार रवींद्र माने, महिला किसान अधिकार मंचच्या सीमा कुळकर्णी, सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी सुवर्णा दामले, नुतन माळवी, शुभदा देशमुख, आरती बैस आदी उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी बनेल वारसशेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या विधवा पत्नीची वारस म्हणून नोंद होणे अपेक्षित आहे; पण अनेक शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीची वारस म्हणून नोंद न झाल्याने त्या शासकीय योजनांपासून वंचित आहेत.त्यांना त्यांचा हक्क मिळावा या दृष्टीने जिल्हानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीकरिता हेल्पलाईनशेतकरी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या समुपदेशन चमूच्या बळकटीकरणासाठी प्रशिक्षण देण्यासोबतच कार्यशाळादेखील घेण्यात येईल. वर्धा जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन तसेच महिला किसान अधिकार मंचच्या मदतीने या हेल्पलाईन केंद्राचे कामकाज चालेल.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या