शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

अतिक्रमण उठले जीवावर; अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:03 IST

महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह : नागरिकांमधून व्यक्त होतोय रोष

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. या महामार्गावर येत असलेले मंदिर मोठ्या तातडीने हलविण्यात आले; परंतु इतर अतिक्रमणाकडे महामार्ग प्रशासनाने लक्ष गेले नाही. यातून वाहतूककोंडी नित्याचीच झाली असून अपघात वाढले आहे.

शहरात अतिक्रमाची समस्या नागरिका सोबतच अधिकाऱ्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. अतिक्रमामुळे शहरातील वाहतूक प्रभावित होत असुन नागरिकांना छोट्या मार्गातून वाहन चालवावे लागत आहे. परंतू याकडे वाहतूक पोलिस याकडे लक्ष देण्यास तयार नाही. अतिक्रमामुळे या मार्गावर काहींना जीवही गमवावा लागल्याने या महामार्गाचे काम कधी पूर्णत्वास जाणार? असा प्रश्नही संतप्त आर्वीकर विचारत आहेत. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या काळात या महामार्गाचे काम तातडीने व्हावे, याकरिता संघर्ष समिती गठित करण्यात आली होती. त्यानंतर या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. निवडणूक आटोपली आणि कामही बंद पडले. पुन्हा विधानसभेच्या तोंडावर थातूरमातूर कामे सुरू केली. याही निवडणुकीनंतर कामाची गंती संथ झाल्याने हे काम नियमानुसार पूर्णत्वास जाणार की नाही, त्यामुळे नागरिकांना आणखी काही वाट बघावी लागणार असे संकेत प्रशासनाकडून दिसत आहेत.

नागरिक म्हणतात, आम्ही न्याय मागावा कुणाकडं? या महामार्गाच्या कामामुळे आणखी किती दिवस त्रास सोसावा लागणार आहे. अपघातात निष्पापांचा जीव जात असून आम्ही आता न्याय कुणाकडं मागावा? हा प्रश्नच आहे. लोकप्रतिनिधींच्या गळ्यात विजयाचा हार पडला की, गावाशी प्रेम आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. सात वर्षांपासूनच सुरू असलेला हा त्रास कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कंत्राटदाराला किंवा महामार्ग प्रशासनाला ठणकावून सांगायला नको का, असा प्रश्नही पंकज गोडबोले व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान यांनी उपस्थित केला आहे.

७ वर्षे लोटूनही महामार्गाची परिस्थिती जैसे थेच...या अतिक्रमासंदर्भता गेल्या सात वर्षापासून शहरातील नागरिक संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिल्या जात आहेत. मात्र, यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही

संघर्ष समिती काय करते? शहरातून जाणारा हा एकमेव महत्त्वाचा व मोठा मार्ग आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बसस्थानक व शासकीय कार्यालयात जाण्यासाठी हाच मार्ग असून या मार्गावर चांगलीच वर्दळ असते. त्यामुळे या महामार्गाचे काम तातडीने आणि नियमात पूर्ण होण्यासाठी संघर्ष समिती स्थापित करण्यात आली होती; पण हे काम रेंगाळले असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याने आता ती समिती काय करते? त्यांनी पुढाकार घेऊन काम तडीस न्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुणवंत गुल्हाणे यांनी केली आहे.

"एखाद्या व्यक्तीचा रोडवर अपघात होतो त्या व्यक्तीचे दुःख त्यालाच कळते. जेव्हा अपघातग्रस्त रुग्ण येतात तेव्हा त्यांच्या घरच्यांचा जीव जागेवर राहत नाही. या रुग्णाला वाचविण्यात यश आलं तर त्याला इतर दुखापतींचा सामना करावा लागतो. किंवा अपंगत्व आल्यास आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखं होतं. त्यामुळे हा चारपदरी मार्ग तातडीने व्हावा, हीच अपेक्षा आहे." - डॉ. रोशन जवळेकर, वैद्यकीय तज्ज्ञ

"शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम नियमानुसार होत आहे का? यात शंकाच निर्माण होत आहे. ज्या तत्परतेने धार्मिकस्थळांचे पुनर्वसन केले, त्या तत्परतेने अतिक्रमण काढले त्या तत्परतने या रस्त्याचे काम नियमानुसार होणार का? अतिक्रमणाला हात न लावता रस्त्याची रुंदी तर कमी करणार नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे." - सुधीर जाचक, सामाजिक कार्यकर्ता

"माझा याच मार्गावर अपघात झाल्यानंतर कित्येक महिने अपंगत्व व वेदना सहन कराव्या लागल्या. मी माझ्या बाजूने जात असतानाही एका दुचाकीस्वाराने पायाला धडक दिली होती. हा मार्ग मोठा असता व येणारा-जाणारा मार्ग वेगळा असता तर कदाचित या दुःखातून जाण्याची माझ्यावर वेळ आली नसती."- विद्याताई गणेश मेहरे, नागरिक

 

टॅग्स :wardha-acवर्धाTrafficवाहतूक कोंडी