शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३,६५२ व्यक्तींना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोकरीसाठी जिल्ह्यातून २० हजारांवर युवकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी सात हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्मिती, बँकिंग व अकाउंटन्सिग, इलेक्ट्रीकल्स गारमेंट तयार करणे या प्रशिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे.

ठळक मुद्देकौशल्य विकासातून ६५९ युवक वळले स्वयंरोजगाराकडे

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तातडीने नोकरी मिळणे सध्यातरी दुरापास्त झाले आहे. त्यामुळे युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यावर भर दिला आहे. यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या युवकांनाही प्रशिक्षणाचा आधार आहे. माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि निर्मिती, बँकिंग आणि अकाउटिंग, इलेक्ट्रिकल्स, फॅशन डिझायनिंग, गारमेंट तयार करणे याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. यातून आजपर्यंत ३ हजार ६५२ जणांना नोकरी व रोजगाराची संधी मिळाली आहे. तर ६५९ युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोकरीसाठी जिल्ह्यातून २० हजारांवर युवकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी सात हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्मिती, बँकिंग व अकाउंटन्सिग, इलेक्ट्रीकल्स गारमेंट तयार करणे या प्रशिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे.यामध्ये काही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले युवक कौशल्य विकासाकडे वळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता नोकरीच्या संधी वाढणार आहेत. स्थानिक युवकांना स्वत:च्या जिल्ह्यातच रोजगार हवा आहे. त्यामुळे हे युवक कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढे जात आहेत.पदवीधर झाल्यानंतर अनुभव नसल्याने किंवा एखाद्या उद्योगात नोकरी मिळविताना तेथील कौशल्य या युवकांना उपलब्ध नसते. त्यामुळे नोकरीची संधी गमवावी लागते. पण, कौशल्य विकासामुळे नोकरी तसेच व्यवसायाची संधी उपलब्ध होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. त्यापैकी ३ हजार ६५२ युवकांना नोकरीची संधी मिळाली आहे. या माध्यमातून नोकरी मिळण्याचे प्रमाण अधिक आहे.सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवकांना नोकरीची संधी उपलब्ध असली तरी संसर्गाचा धोका असल्यामुळे युवक बाहेरच्या तालुक्यात व जिल्ह्यात जाण्याचे टाळत आहेत. अशा युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगार किंवा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे युवकांनी संधीचे सोने केले पाहिजे.लॉकडाऊन काळात ८६ युवकांना रोजगारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने अनेकजण बेरोजगार झाले असून युवकांच्या हाताला काम नाही. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत १ हजार ७६२ युवकांनी नोंदणी केली असून ८६ युवकांना रोजगार मिळाला आहे. तर ३२ युवकांनी स्वयंरोजगार उभा केला आहे.महाजॉब पोर्टलवर नोंदणीचे आवाहनडीआयसीने महाजॉब पोर्टल सुरू केले असून युवकांनी महास्वयं पोर्टलसह महाजॉब पोर्टलवर सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करावी, तसेच जे एनजीओ, व्यक्ती प्रशिक्षण देण्यास इच्छुक असेल त्यांनी स्कील इंडिया पोर्टल (एनएसडीसी) या वेब पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल विकास विभाग कार्यालयाशी संपर्क करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारी