शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

कर्मचाऱ्यांना कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:53 IST

पिण्याच्या पाण्याची समस्या व विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी माया ठवरी याच्या नेतृत्वात मंगळवारी नगर पंचायत कार्यालयात मोर्चा आणून ठिय्या दिला.

ठळक मुद्देपाण्याकरिता महिला आक्रमक : समुद्रपूर न.पं.तील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : पिण्याच्या पाण्याची समस्या व विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी माया ठवरी याच्या नेतृत्वात मंगळवारी नगर पंचायत कार्यालयात मोर्चा आणून ठिय्या दिला. यावेळी नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी दिलेले आश्वासन लिखित मागितले असता अधिकाºयांनी त्याना विरोध दर्शविला. यामुळे संतप्त नागरिकांनी नगर पंचायतीच्या मुख्य फाटकाला कुलूप ठोकले. यामुळे येथील कर्मचारी आणि अधिकारी सायंकाळपर्यंत आतच होते.भालकर वॉर्ड क्र. २ येथील नागरिकांनी गत २० वर्षांपूर्वी नळ योजनेची मागणी केली होती. असे असताना त्यांना अद्यापही नळ जोडणी मिळाली नाही. या वॉर्डात पिण्याच्या पाण्याची समस्या असून नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. या वॉर्डातील प्रतिष्ठीत नागरिकांनी पैशाच्या जोरावर घर टॅक्स लावून घेतले; पण गोरगरीब मजुरांना इमला कर लावून पावती हातात दिली जाते. आम्हाला इमला कर न लावता घरटॅक्सची पावती देण्यात यावी, मटण मार्केटचे स्थलांतर करण्यात यावे, तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करीत नागरिक नगर पंचायतीवर धडकले.महिला पुरूषांनी नगर पंचायतीत ठिय्या दिल्याने नगर पंचायतच्या मासिक सभेत मागणी करताना डॉ. ना.ना. बेहरे यांच्या दुकानापासून नवीन व्हॉल्व्ह बसवून नवीन पाईप लाईन टाकू, असे एकमताने ठरविले. त्यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष शीला सोनारे, माजी पाणी पुरवठा सभापती गजानन राऊत, नगर सेवक दिनेश निखाडे यांनी पुढाकार घेतला. वृत्त लिहिस्तोवर आंदोलन सुरूच होते. फाटक बंद असल्याने कर्मचाºयांची तारांबळ उडाली होती. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने आंदोलकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीलाही या आंदोलकांनी साथ दिली नसल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.या मोर्चात समाजसेविका मंदा ठवरी, नगरसेवक पंकज बेलेकर, सोनू मेश्राम, अखिल रामटेके, राष्ट्रपाल कांबळे, शिला बेलेकर, उर्मिला सोमकुंवर निर्मला ताकसांडे, मनिषा झुंगरे, करुणा अलोणे, पुष्पा मुरसे, मनीषा मसराम, नानी डुमार, मंदा गजभिये, प्रीती शेंडे, जिजा पाटील, शारदा डोंगरे, कमला कोसे, विजू रामटेके, ललिता लोखंडे, किरण गजभिये इत्यादीसह शंभरावर नागरिक सहभागी होते.२१ आंदोलकांवर गुन्हा दाखल व अटकनगर पंचायतीत आंदोलनादरम्यान मिळालेले आश्वासन लिखित स्वरूपात देण्याच्या मागणीकरिता कार्यालयाच्या फाटकाला कुलूप ठोकण्यात आले. या प्रकरणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरून ठाणेदार मुंढे यांनी २१ आंदोलकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या आंदोलकांवर कार्यवाही झाल्यानंतरच नगर पंचायतीच्या फाटकाचे कुलूप काढण्यात आले. त्यानंतरच येथील कर्मचाºयांना बाहेर पडणे शक्य झाले.