वर्ध्यात प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:11+5:30
जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ३६३ व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आले आहेत. त्यांच्या तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ८८० व्यक्तांची १४ दिवसाचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला असून अद्याप २ हजार ४८३ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आरोग्य विभागाकडून सुुरुवातीपासून ६७ जणांचे रक्त व स्त्राव नमुने तपासणीकरिता प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.

वर्ध्यात प्रभावी अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कोरोना विषाणू पाय पसरत असतानाच वर्ध्यात जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे त्याला रोखण्यात सध्यातरी यश आले आहे. आज लॉकडाऊनचा अठरावा दिवस असून आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ६७ स्त्राव नमुने चाचणीकरिता पाठविण्यात आले होते. ते सर्वच नमुने आज गिनेटिव्ह आले आल्याने वर्ध्यात एकही रुग्ण अद्याप आढळून आला नाही. त्यामुळे वर्धेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, संकट कायम असल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ३६३ व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आले आहेत. त्यांच्या तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ८८० व्यक्तांची १४ दिवसाचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला असून अद्याप २ हजार ४८३ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आरोग्य विभागाकडून सुुरुवातीपासून ६७ जणांचे रक्त व स्त्राव नमुने तपासणीकरिता प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. आजपर्यंत सर्वच नमुन्यांना अहवाल प्राप्त झाला असून सर्वच निगेटिव्ह आले आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात एकही रुग्ण नसला तरी राज्यातील परिस्थिती लक्षात घेत जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. रस्त्यावर फिरु नका, घरातच सुरक्षीत रहा, अशा आवाहनानंतरही नागरिक रस्त्यावर येत असल्याने आजपासून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्याच दिवशी वर्धा विभागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या २९, मास्क न लावणाºया ५३ तर विनाकारण डबल सीट फिरणाऱ्यांना १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
फिरणाºयांसह मास्क न वापरणाºयांना दंड
सिंदी (रेल्वे): संचारबंदीच्या काळात विनाकारण दुचाकीने फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता वावरणाºयांवर सिंदी (रेल्वे) येथील मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी कारवाईचा बडगा उगारत दंड ठोठावला. पहिल्याच दिवशी त्यांनी ५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी काढलेल्या आदेशानुसार मुख्याधिकाºयांनी कारवाईला सुुरुवात केली आहे. विनाकार दुचाकीने डबल सीट फिरणाºया ८ जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ४ हजार रुपये तर मास्क न वापरता फिरणाºया सहा जणांकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे १ हजार २०० असा एकूण ५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील बाजार चौक व कांढळी मार्गावर ही कारवाई केली असून आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षीत रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी केले आहे. या ठिकाणी शासनाच्या निर्देशाचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्याकरिता उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी शहरातीला भेट दिली.