शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ग्राहक हक्क जागृतीत निधीचा खोडा

By admin | Updated: March 15, 2015 01:56 IST

‘जागो ग्राहक जागो’ ‘जागरूक ग्राहक देशाचा जबाबदार नागरिक’ अशा स्लोगन दरदिवशी कानावर पडतात.

श्रेया केने वर्धा‘जागो ग्राहक जागो’ ‘जागरूक ग्राहक देशाचा जबाबदार नागरिक’ अशा स्लोगन दरदिवशी कानावर पडतात. सार्वजनिक स्थळांवर पोस्टरमधून तर सोशल मिडियावर ही ग्राहक जागृतीचा उदोउदो होतो; मात्र प्रत्यक्षात ग्राहक त्यांच्या हक्काबाबत कितपत जागरूक आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. ग्राहकांना हक्काबाबत जागृत करण्यासाठी केवळ केंद्रस्तरावर यंत्रणा कार्यरत असून जिल्हास्तरावरील यंत्रणेकरिता निधी उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने अडचण येते. वर्षभरात दोन दिवसांचा अपवाद वगळता उर्वरित दिवसात ग्राहक हक्क जागृतीचे कार्य थंडबस्त्यात असते. जागतिक ग्राहक दिन व राष्ट्रीय ग्राहक दिनाकरिताजिल्हा यंत्रणेला निधी मिळतो. शासकीय स्तरावर कार्यक्रम घेवून औपचारिकता पार पाडली जाते. एनजीओच्या माध्यमातून जागृतीचे कार्य होत असले तरी निधीअभावी जागृती कार्यावर त्याचा परिणाम होतो. जिल्हास्तरावर जनजागृतीकरिता असलेली समिती ठरते कुचकामीग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काविषयी जागृती करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अंतर्गत समिती गठीत केली जाते. या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. शिवाय सामाजिक क्षेत्रात कार्यरत, संबंधित विभागाचे अधिकारी विधीज्ञ अशा व्यक्तींचा यात समावेश असतो. या माध्यमातून ग्राहकांच्या संबंधित तक्रारींचा आढावा घेऊन त्यावर चर्चा केली जाते. तसेच तक्रारकर्त्याला न्याय मिळवून देण्याकरिता सदर प्रकरण ग्राहक तक्रार निवारण मंचकडे हस्तांतरीत केले जाते. ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून अर्जदाराला वकीलाशिवाय आपली बाजू मांडता येते. याकरिता मंचाचे सदस्य व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळते. या प्रकरणात ९० दिवसांत निकाल देणे बंधनकारक आहे.शासनाकडून निधीची कमतरता अशासकीय संघटना म्हणजेच समाजसेवा करणाऱ्या एनजीओंच्या माध्यमातून ग्राहक हक्क जागृती मोहीम राबविली जाते. या क्षेत्रात कार्यरत संस्थांना शासनाकडून प्रस्ताव मागवूनही निधीच मिळत नाही. जिल्हास्तरावर अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्यावतीने चार वर्षे सतत कार्य करूनही निधीच आला नाही. अखेर हे कार्य स्थगित करावे लागल्याचे संस्था सदस्यांनी सांगितले.