शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अनामत भरली, वीज जोडणी बेपत्ताच

By admin | Updated: January 23, 2015 01:55 IST

शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे़ यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला़ शिवाय जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत; ...

वर्धा : शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे़ यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला़ शिवाय जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत; पण त्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे़ जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना अनामत रक्कम अदा करूनही वीज जोडणी देण्यात आली नाही़ यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न भंग पावले आहे़ वर्धा जिल्ह्यात २०११-१२ पासून सुमारे ६ हजार शेतकऱ्यांनी ओलित करण्यासाठी वीज वितरण कंपनीला हजारो रुपयांची अनामत रक्कम अदा केली़ शिवाय रितसर अर्ज व कागदपत्रेही सादर करीत शेतातील विहिरीवर वीज जोडणीची मागणी केली; पण चार वर्षांपासून शेतकऱ्यांना जोडणी देण्यात आली नाही़ शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या; पण वीज पुरवठा देण्यात आला नाही़ यामुळे त्या विहिरी केवळ शोभेच्या ठरल्यात़ या सहा हजार वीज जोडणीला शासनाने मंजुरी दिली आहे़ शिवाय त्यासाठी लागणारा संपूर्ण निधी वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे़ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळावी म्हणून कंत्राटदारही नेमण्यात आले; पण महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वीज जोडणी मिळू शकली नाही़ यामुळे शेतकऱ्यांचे ओलिताची शेती करून कर्ज फेडण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे़ याबाबत महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली़ निवेदनात किमान दुष्काळी वर्षात तरी शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय्य हक्काची शेतातील विहिरीवर वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली़ निवेदन सादर करताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा़ दिवाकर गमे, जिल्हा संगटक विनय डहाके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)