शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

अनामत भरली, वीज जोडणी बेपत्ताच

By admin | Updated: January 23, 2015 01:55 IST

शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे़ यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला़ शिवाय जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत; ...

वर्धा : शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे़ यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला़ शिवाय जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत; पण त्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे़ जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना अनामत रक्कम अदा करूनही वीज जोडणी देण्यात आली नाही़ यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न भंग पावले आहे़ वर्धा जिल्ह्यात २०११-१२ पासून सुमारे ६ हजार शेतकऱ्यांनी ओलित करण्यासाठी वीज वितरण कंपनीला हजारो रुपयांची अनामत रक्कम अदा केली़ शिवाय रितसर अर्ज व कागदपत्रेही सादर करीत शेतातील विहिरीवर वीज जोडणीची मागणी केली; पण चार वर्षांपासून शेतकऱ्यांना जोडणी देण्यात आली नाही़ शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या; पण वीज पुरवठा देण्यात आला नाही़ यामुळे त्या विहिरी केवळ शोभेच्या ठरल्यात़ या सहा हजार वीज जोडणीला शासनाने मंजुरी दिली आहे़ शिवाय त्यासाठी लागणारा संपूर्ण निधी वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे़ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळावी म्हणून कंत्राटदारही नेमण्यात आले; पण महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वीज जोडणी मिळू शकली नाही़ यामुळे शेतकऱ्यांचे ओलिताची शेती करून कर्ज फेडण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे़ याबाबत महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली़ निवेदनात किमान दुष्काळी वर्षात तरी शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय्य हक्काची शेतातील विहिरीवर वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली़ निवेदन सादर करताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा़ दिवाकर गमे, जिल्हा संगटक विनय डहाके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)