शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढली उदासीनता; कापसामागची साडेसाती संपेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 18:22 IST

शेतकऱ्यांचा सवाल : शेतीवरील वाढत्या खर्चाने कंबरडे मोडले

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कपाशीचे मुख्य पीक घेतले जाते; मात्र दरवर्षी लागवड खर्चात मोठी वाढ होऊन कपाशीच्या दरामागची साडेसाती काही संपली नाही. त्यामुळे साहेब जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागला आहे. 

सध्या कापसाचे बाजारभाव हे उलट्या दिशेने सुरू असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मागील वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली. पावसाचा फटका बसून उर्वरित कापूस शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चुन वेचून घेतला. कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होते; परंतु कापसाचे भाव कोसळत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले. मागच्या वर्षीचा विचार केला तर कापसाला कधी नव्हे एवढा उच्चांकी दर मिळाला होता. यावर्षी देखील तीच अपेक्षा शेतकरी बंधूंना आहे. मागील वर्षी जो कपाशीला चांगला भाव मिळाला होता, परंतु यंदा ही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. 

कोणी वाली उरला नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला आहे की नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागलाय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कापूस आता घरात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. व्यापारी आणि शासन यांच्या कैचीत शेतकरी मात्र अडकून पडलाय.

बोंडअळी टपलेली, औषधी महाग जनुकिय बदल करून कपाशीचे बियाने बाजारात आले. किडरोग येणार नाही असे सांगितले जात होते; मात्र गेल्या चार-पाच वर्षात बोंडअळी मोठे नुकसान केले. शिवाय कीटकनाशकांचा खर्च वाढला.

उसनवारी नील अन् शेतात कापूसही नील! जिल्ह्यातील बरेच शेतकरी शेतीच्या हंगामात उसनवारीने पैसे काढतात. काही शेतकरी बँकांकडून कर्ज घेण्यासाठी उंबरठे झिजवितात. मात्र, काही उपयोग होत नाही. त्यामुळे उसनवारी व शेतातील कापूसही नील, असे चित्र आहे.

किलोला १० रुपये देऊनही मजूर मिळेना कापूस वेचणीसाठी किलोला १० रुपये मोबदला देऊनही मजूर मिळत नाही. मजुरांअभावी कापूस शेतातच पडून राहतो. काढणी करून विकण्यास विलंब झाल्यास व्यापारी अल्प दर देऊन बोळवण करतात.

कापसाचा भाव अजून वाढणार का? लागवड खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. पुढील हंगामाची व्यवस्था कशी करायची व कुटुंबाचे काय, या दुहेरी प्रश्नात शेतकरी अडकला आहे.

पाच वर्षांत एकदाच १० हजारांपुढे वर्ष                       भाव २०१९                    ५२०० २०२०                    ५८२५ २०२१                   १०,००० २०२२                    ७५००२०२३                    ७०५० २०२४                    ७१००

व्यापारी/उत्पादक म्हणतात..... आमचा नाईलाज कापूस दराचे सरकारी धोरण उत्पादक व व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त असायला हवे. मात्र, सध्या उलट चालले आहे. त्यामुळे आमचाही नाईलाज आहे. असे व्यापाऱ्यांने सांगितले.

"शासनाने हमीभाव जाहीर केले. मात्र कापसाचे हमीभाव दरवर्षी कागदावरच राहते. अन्य वस्तूंचे दर वाढत असताना शेतमालाचे दर पाडले जात आहेत हा प्रकार नेहमीच शेतकऱ्यांसोबत घडतो." - प्रवीण वंजारी, उत्पादक

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती