शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढली उदासीनता; कापसामागची साडेसाती संपेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 18:22 IST

शेतकऱ्यांचा सवाल : शेतीवरील वाढत्या खर्चाने कंबरडे मोडले

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कपाशीचे मुख्य पीक घेतले जाते; मात्र दरवर्षी लागवड खर्चात मोठी वाढ होऊन कपाशीच्या दरामागची साडेसाती काही संपली नाही. त्यामुळे साहेब जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागला आहे. 

सध्या कापसाचे बाजारभाव हे उलट्या दिशेने सुरू असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मागील वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली. पावसाचा फटका बसून उर्वरित कापूस शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चुन वेचून घेतला. कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होते; परंतु कापसाचे भाव कोसळत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले. मागच्या वर्षीचा विचार केला तर कापसाला कधी नव्हे एवढा उच्चांकी दर मिळाला होता. यावर्षी देखील तीच अपेक्षा शेतकरी बंधूंना आहे. मागील वर्षी जो कपाशीला चांगला भाव मिळाला होता, परंतु यंदा ही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. 

कोणी वाली उरला नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला आहे की नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागलाय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कापूस आता घरात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. व्यापारी आणि शासन यांच्या कैचीत शेतकरी मात्र अडकून पडलाय.

बोंडअळी टपलेली, औषधी महाग जनुकिय बदल करून कपाशीचे बियाने बाजारात आले. किडरोग येणार नाही असे सांगितले जात होते; मात्र गेल्या चार-पाच वर्षात बोंडअळी मोठे नुकसान केले. शिवाय कीटकनाशकांचा खर्च वाढला.

उसनवारी नील अन् शेतात कापूसही नील! जिल्ह्यातील बरेच शेतकरी शेतीच्या हंगामात उसनवारीने पैसे काढतात. काही शेतकरी बँकांकडून कर्ज घेण्यासाठी उंबरठे झिजवितात. मात्र, काही उपयोग होत नाही. त्यामुळे उसनवारी व शेतातील कापूसही नील, असे चित्र आहे.

किलोला १० रुपये देऊनही मजूर मिळेना कापूस वेचणीसाठी किलोला १० रुपये मोबदला देऊनही मजूर मिळत नाही. मजुरांअभावी कापूस शेतातच पडून राहतो. काढणी करून विकण्यास विलंब झाल्यास व्यापारी अल्प दर देऊन बोळवण करतात.

कापसाचा भाव अजून वाढणार का? लागवड खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. पुढील हंगामाची व्यवस्था कशी करायची व कुटुंबाचे काय, या दुहेरी प्रश्नात शेतकरी अडकला आहे.

पाच वर्षांत एकदाच १० हजारांपुढे वर्ष                       भाव २०१९                    ५२०० २०२०                    ५८२५ २०२१                   १०,००० २०२२                    ७५००२०२३                    ७०५० २०२४                    ७१००

व्यापारी/उत्पादक म्हणतात..... आमचा नाईलाज कापूस दराचे सरकारी धोरण उत्पादक व व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त असायला हवे. मात्र, सध्या उलट चालले आहे. त्यामुळे आमचाही नाईलाज आहे. असे व्यापाऱ्यांने सांगितले.

"शासनाने हमीभाव जाहीर केले. मात्र कापसाचे हमीभाव दरवर्षी कागदावरच राहते. अन्य वस्तूंचे दर वाढत असताना शेतमालाचे दर पाडले जात आहेत हा प्रकार नेहमीच शेतकऱ्यांसोबत घडतो." - प्रवीण वंजारी, उत्पादक

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती