शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढली उदासीनता; कापसामागची साडेसाती संपेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 18:22 IST

शेतकऱ्यांचा सवाल : शेतीवरील वाढत्या खर्चाने कंबरडे मोडले

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कपाशीचे मुख्य पीक घेतले जाते; मात्र दरवर्षी लागवड खर्चात मोठी वाढ होऊन कपाशीच्या दरामागची साडेसाती काही संपली नाही. त्यामुळे साहेब जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागला आहे. 

सध्या कापसाचे बाजारभाव हे उलट्या दिशेने सुरू असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मागील वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड केली. पावसाचा फटका बसून उर्वरित कापूस शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चुन वेचून घेतला. कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होते; परंतु कापसाचे भाव कोसळत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले. मागच्या वर्षीचा विचार केला तर कापसाला कधी नव्हे एवढा उच्चांकी दर मिळाला होता. यावर्षी देखील तीच अपेक्षा शेतकरी बंधूंना आहे. मागील वर्षी जो कपाशीला चांगला भाव मिळाला होता, परंतु यंदा ही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. 

कोणी वाली उरला नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कोणी वाली उरला आहे की नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागलाय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कापूस आता घरात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. व्यापारी आणि शासन यांच्या कैचीत शेतकरी मात्र अडकून पडलाय.

बोंडअळी टपलेली, औषधी महाग जनुकिय बदल करून कपाशीचे बियाने बाजारात आले. किडरोग येणार नाही असे सांगितले जात होते; मात्र गेल्या चार-पाच वर्षात बोंडअळी मोठे नुकसान केले. शिवाय कीटकनाशकांचा खर्च वाढला.

उसनवारी नील अन् शेतात कापूसही नील! जिल्ह्यातील बरेच शेतकरी शेतीच्या हंगामात उसनवारीने पैसे काढतात. काही शेतकरी बँकांकडून कर्ज घेण्यासाठी उंबरठे झिजवितात. मात्र, काही उपयोग होत नाही. त्यामुळे उसनवारी व शेतातील कापूसही नील, असे चित्र आहे.

किलोला १० रुपये देऊनही मजूर मिळेना कापूस वेचणीसाठी किलोला १० रुपये मोबदला देऊनही मजूर मिळत नाही. मजुरांअभावी कापूस शेतातच पडून राहतो. काढणी करून विकण्यास विलंब झाल्यास व्यापारी अल्प दर देऊन बोळवण करतात.

कापसाचा भाव अजून वाढणार का? लागवड खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. पुढील हंगामाची व्यवस्था कशी करायची व कुटुंबाचे काय, या दुहेरी प्रश्नात शेतकरी अडकला आहे.

पाच वर्षांत एकदाच १० हजारांपुढे वर्ष                       भाव २०१९                    ५२०० २०२०                    ५८२५ २०२१                   १०,००० २०२२                    ७५००२०२३                    ७०५० २०२४                    ७१००

व्यापारी/उत्पादक म्हणतात..... आमचा नाईलाज कापूस दराचे सरकारी धोरण उत्पादक व व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त असायला हवे. मात्र, सध्या उलट चालले आहे. त्यामुळे आमचाही नाईलाज आहे. असे व्यापाऱ्यांने सांगितले.

"शासनाने हमीभाव जाहीर केले. मात्र कापसाचे हमीभाव दरवर्षी कागदावरच राहते. अन्य वस्तूंचे दर वाढत असताना शेतमालाचे दर पाडले जात आहेत हा प्रकार नेहमीच शेतकऱ्यांसोबत घडतो." - प्रवीण वंजारी, उत्पादक

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती