चण्याचे चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
By Admin | Updated: June 13, 2014 00:25 IST2014-06-13T00:25:49+5:302014-06-13T00:25:49+5:30
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात चण्याला योग्य दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा चणा नाफेडद्वारे खरेदी करण्यात आला.

चण्याचे चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
पुलगाव : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात चण्याला योग्य दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा चणा नाफेडद्वारे खरेदी करण्यात आला. खरेदीला महिन्याचा कालावधी झाला तरी चण्याचा चुकार मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
आधीच नापिकीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेतीची मशागत करून पेरणीसाठी मृग नक्षत्रात आकाशाकडे डोळे लावून पावसाची प्रमीक्षा करीत आहे. गत िहंगामात शेतात पिकलेला शेतमाल विकून सुरू हंगामात शेतीची कामे करावी, या उद्देशाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल चणा राज्य शासनाला (नाफेडला) विकला; परंतु विकलेल्या मालाची राशी शासनाने अद्याप दिली नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
पेरणीपूर्व मशागत व इतर कामासाठी पैसा राहावा या भावनेतून तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात विकलेला चणा राज्य शासनाला विकला. वेळेवर शेतमालाचा पैसा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असताना जवळपास दीड महिना लोटूनही शेतकऱ्यांना शेतमालाचा पैसा मिळाला नाही ३० एप्रील १४ पासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शेतकऱ्यांकडून आलेला २ हजार ७२५ क्विंटल चणा ३१०० रुपये या हमी भावाने राज्य शासनाने खरेदी केला. याचा मोबदला म्हणून राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना ८५ लाख रुपये घेणे असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव खोके यांनी दिली.
सध्या शेतीचा हंगाम आहे. पेरणीपूर्ण मशागतीची कामे आटोपून शेतकरी बी-बियणे खते औषधी घेण्यासाठी धावपळ करीत आहेत; परंतु जवळ पैसा नसल्यामुळे या १०५ शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. या संदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकारी शेख यांना विचारणा केली असता अद्याप शासनाकडून राशी उपलब्ध करून दिली नसून ती उपलब्ध होताच वितरण केल्या जाईल, असे सांगण्यात आले. आपलाच पैसा योग्य वेळी शासन देत नसल्याने तालुक्यातील या शेतकऱ्यांनी शासनकर्त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पैशाकरिता शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.(ताुलका प्रतिनिधी)