शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाची शेतकऱ्यांत धास्ती

By admin | Updated: March 9, 2017 00:52 IST

रबी हंगामातील गहू, चना पिकाची काढणी सुरू आहे. बहुतांश ठिकाणी चन्याच्या गंज्या लावून ठेवल्या आहे.

तुरी, चण्याच्या गंजीवर ताडपत्री : शेतमालाच्या विक्रीपूर्वीच निसर्गाच्या अवकृपेची शक्यता वर्धा : रबी हंगामातील गहू, चना पिकाची काढणी सुरू आहे. बहुतांश ठिकाणी चन्याच्या गंज्या लावून ठेवल्या आहे. तुरीची काढणी झाली असून शेतात तुरीच्या पेट्या लावल्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप शेतमाल विकला नाही. यातच मंगळवारपासून सर्वत्र ढगाळी वातावरण आहे. जिल्ह्यात काही ठिकणी तुरळक पाऊसही झाला. यामुळे शेतकऱ्यांत धास्ती पसरली आहे. निसर्गाच्या तावडीत सापडून शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून बुधवारी ताडपत्र्यांचा आधार शेतकरी घेत असल्याचे पाहावयास मिळाले. जिल्ह्यात गारपिट झाले नसले तरी मंगळवारी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. समुद्रपूर तालुक्यात नारायणपूर येथे २० मिनीट तर हिंगणघाट, आर्वी तालुक्यात १० मिनीट पावसाच्या सरी कोसळल्या. शिवाय तळेगाव (श्या.पं.), मोझरी (शेकापूर), सेवाग्राम परिसरात तुरळक पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गहू आणि चना पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. शिवाय तुरी नाफेडला विकण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पेट्या लावून ठेवल्या आहेत. बाजार समितीत गर्दी असल्याने शेतकरी प्रतीक्षा करीत होते; पण मंगळवारी आलेल्या पावसामुळे तुरीचे काही प्रमाणात नुकसान झाले. गव्हाच्या काढणीसाठी पावसामुळे शेतकऱ्यांना आणखी एक-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात कुठेही गारपिट झाल्याचे वृत्त नसले तरी ढगाळी वातावरणामुळे शेतकरी धास्तावले आहे. सेलू व आष्टी तालुक्यात पावसाची नोंद नाही; पण शेतकऱ्यांनी दक्षता म्हणून शेतातील चना, तुरीच्या ढिगांना ताडपत्रीचे संरक्षण दिल्याचे दिसून येते.(लोकमत न्यूज नेटवर्क) तूर खरेदी केंद्रांवरही तारांबळ मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी काही भागात अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. परिणामी, बाजार समित्यांमधील तूर खरेदी केंद्रांवरही शेतकऱ्यांची शेतमाल झाकताना तारांबळ उडाली. शिवाय खरेदी करून ठेवलेला मालही झाकण्यासाठीही खरेदीदारांना कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी तुरीचे पोते ओले झाल्याचे सांगण्यात आले. यातही शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. अवकाळी पावसाचे सावट सेवाग्राम : मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापूस, चना, गहू व तुरी ओल्या झाल्या. सकाळी ढगाळी वातावरण व पुन्हा उन्ह तापल्याने शेतकरी निश्चिंत होता. मजूर नसल्याने कापूस वेचणी शिल्लक होती. चन्याची सवंगणी सुरू असून काहींनी गंजी लावून ठेवली तर काहींची कापणी सुरू होती. चना व तुरीच्या गंजी शेतात लावून होत्या. चन्याच्या गंजीला ताडपत्र्यांचे संरक्षण दिले; पण मध्यरात्री आलेल्या पावसाने कापूस, तुरी, चना ओला झाल्याने नुकसान झाले. देवळीतही पाऊस मंगळवारी रात्रीच्या सुमारास देवळी-पुलगाव तालुक्यातही सुमारे १० मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे काढून ठेवलेला शेतमाल झाकताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आहे. शेतमाल भिजल्याने नुकसान केळझर परिसरात मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास २० ते २५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची सवंगून ठेवलेल्या चन्याचे ढिग शेतात रचून होते. अचानक पाऊस आल्याने शेतमाल वाचविण्याकरिता ताडपत्री झाकताना शेतकऱ्यांनी एकच ताराबंळ उडाली. या पावसामुळे गहू, चना, कापूस या पिकांसह फळ, भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.