शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

सीएम वॉररूममुळे निम्न वर्धाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 10:33 PM

वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट आदी तालुक्यासाठी वरदान ठरू पाहत असलेला निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री यांच्या वॉररूममध्ये या प्रकल्पाचा समावेश असून जून २०१९ पर्यंत............

ठळक मुद्देपंतप्रधान कृषी सिंचन योजना : जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट आदी तालुक्यासाठी वरदान ठरू पाहत असलेला निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री यांच्या वॉररूममध्ये या प्रकल्पाचा समावेश असून जून २०१९ पर्यंत सिंचन निर्मितीची कामे व जून २०२० पर्यंत पाटसºयांचीे कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत, अशी माहिती प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता ग. म. घुगल यांनी लोकमतशी बोलताना दिली.जल है तो कल है, पाणी वाचवा पाण्याचा काटकसरीने उपयोग करा, यासारखे कार्यक्रम मागील तीन वर्षांत राबवून या भागातील शेतकºयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संदेश दिला जात आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादनात अडचणी निर्माण होत असल्याने सिंचन निर्मितीच्या उर्वरित निविदा काढता येत नाही. त्यामुळे कामाला गती देण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी कायद्याने जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील मोझरी, शेकापूर, अलमडोह, टाकळी चणा, गंगापूर, टाकळी दरणे, आंजी मोठी आदी गावांतील प्रकल्पाच्या अंत्यभागात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन मागणीनुसार पाण्याचे नियोजन करण्यात आले.त्यामुळे गौळ, कोळोणा, अडेगाव, गंगापूर, पिंपळगाव, दापोरी, गिरोली, अंबोडा, खानगाव, वरूड, पोटी, मोझरी, शेकापूर, कापसी, कोसुर्ला, टाकळी दरणे, अलमडोह आदी गावांतील लोकांना आवश्यकतेनुसार पाणी देणे शक्य झाले. रब्बीचे सिंचन सुरू असताना काही लोकांनी खानगाव वितरिका व नांदगाव वितरिकेचे दरवाजे खराब केल्यामुळे आलेल्या तांत्रिक अडचणी दूर सारून कास्तकारांना पाणी देण्यात आले, अशी माहिती घुगल यांनी दिली.शेतकºयांना पाणी वेळेवर मिळण्याचे दृष्टीने प्रकल्पाअंतर्गत वितरिका व लघुकालव्याच्या दरवाज्यांची कास्तकारांनी उघडझाप करू नये, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या असून सिंचनाच्या या कार्यात सर्वांनी मदत करावी. पाण्यावर सर्वांचा हक्क लक्षात घेता नियोजनाच्या माध्यमातून काटकसरीचे उदाहरण घालून द्यावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता घुगल यांनी केले. यंदा पुर्वीच समाधानकारक पाऊस न झाल्याने जलशय तळ दाखवत आहेत.मागील तीन वर्षांत २० हजार हे.आर. शेतजमीन सिंचनाखालीप्रकल्पाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत २० हजार हे.आर. शेतजमीन सिंचनाखाली आली. याचा प्रत्यक्ष लाभ कास्तकारांना मिळला. धरणात केवळ २८ टक्के जलसाठा उपलब्ध असतानासुध्दा कास्तकारांच्या मागणीनुसार खरीप व रब्बी हंगामात प्रत्येकी एक पाळी याप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन करण्यास अभियंत्यांचे परिश्रम मोलाचे ठरले आहे.प्रकल्पाची सिंचन क्षमता ६३ हजार ३३३ हे. आर असून यामध्ये आर्वी उपसा सिंचन व खर्डा बॅरेज मिळून सिंचन होणार आहे. यावर्षीच्या जून पर्यंत ३४ हजार ८७० हे. आर. क्षेत्रात सिंचन झाले आहे. उर्वरित २८ हजार ४६३ हेक्टर आर. ची कामे प्रगतिपथावर आहेत.आर्वी तालुक्यातील धनोडी येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जात आहे. या प्रकल्पावर ४५ कि.मी. चा डावा कालवा, ३८ कि.मी. चा देवळी शाखा कालवा व २६ कि.मी. च्या गिरोली शाखा कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पांतर्गत पुलगाव येथे पुलगाव बॅरेज तसेच सिंचनासाठी वंचित राहणाºया गावासाठी खर्डा बॅरेज व आर्वी उपसा सिंचनाचा समावेश आहे.- ग. म. घुगल, उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती