शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रपूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन अन् कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीची लागवड केली. त्यानंतर तब्बल २२ दिवसांचा पावसाचा खंड पडला. परिणामी अंकुरलेली विविध पीक करपण्याच्या मार्गावर होती. अशातच मागील दोन आठवड्यापासून थांबून थांबून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पीक पिवळी पडत असून संपूर्ण तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात शेत शिवारांमध्ये पाणी साचून असल्याने सध्या पीक पिवळी पडत आहेत. शेतातील पाण्यामुळे कपाशीचे पान गळत आहेत.यामुळे यंदाही नापिकीला तोंड द्यावे लागले, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. तालुक्यातील कपाशी व सोयाबीन पीक सध्या आॅक्सीजनवर असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी बोनस अशी ओळख असलेले सोयाबीनचे पीक दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांना दगा देणार, असेही वृद्ध शेतकरी सांगतात. सततच्या पावसामुळे तालुक्यावर सध्या ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अनेक शेतकºयांना पावसामुळे मशागतीची कामे करता आली नाही. अशातच ढगाळ वातावरण असल्याने त्याचा परिणामही उभ्या पिकांवर होत आहे. इतकेच नव्हे तर पिकांची वाढही खुंटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. संपूर्ण तालुक्याच्या शेत पिकांची परिस्थिती पाहता समुद्रपूर तालुक्याला ओल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत टाकावे तसेच तालुक्यातील शेतकºयांना भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.कष्टकऱ्याचा रोजगार हिरावलाशेतमजुरीची कामे करून कुटुंबाचा गाढा ओढणाऱ्यांची संख्या तालुक्यात मोठी आहे. परंतु, पावसाने त्यांच्याही अडचणीत भर टाकली आहे. सततच्या मुसळधार पावसाने त्यांचा रोजगारच सध्या हिराव्याचे दिसून येत आहे. सदर कष्टकऱ्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती