शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

समुद्रपूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन अन् कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीची लागवड केली. त्यानंतर तब्बल २२ दिवसांचा पावसाचा खंड पडला. परिणामी अंकुरलेली विविध पीक करपण्याच्या मार्गावर होती. अशातच मागील दोन आठवड्यापासून थांबून थांबून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पीक पिवळी पडत असून संपूर्ण तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात शेत शिवारांमध्ये पाणी साचून असल्याने सध्या पीक पिवळी पडत आहेत. शेतातील पाण्यामुळे कपाशीचे पान गळत आहेत.यामुळे यंदाही नापिकीला तोंड द्यावे लागले, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. तालुक्यातील कपाशी व सोयाबीन पीक सध्या आॅक्सीजनवर असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी बोनस अशी ओळख असलेले सोयाबीनचे पीक दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांना दगा देणार, असेही वृद्ध शेतकरी सांगतात. सततच्या पावसामुळे तालुक्यावर सध्या ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अनेक शेतकºयांना पावसामुळे मशागतीची कामे करता आली नाही. अशातच ढगाळ वातावरण असल्याने त्याचा परिणामही उभ्या पिकांवर होत आहे. इतकेच नव्हे तर पिकांची वाढही खुंटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. संपूर्ण तालुक्याच्या शेत पिकांची परिस्थिती पाहता समुद्रपूर तालुक्याला ओल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत टाकावे तसेच तालुक्यातील शेतकºयांना भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.कष्टकऱ्याचा रोजगार हिरावलाशेतमजुरीची कामे करून कुटुंबाचा गाढा ओढणाऱ्यांची संख्या तालुक्यात मोठी आहे. परंतु, पावसाने त्यांच्याही अडचणीत भर टाकली आहे. सततच्या मुसळधार पावसाने त्यांचा रोजगारच सध्या हिराव्याचे दिसून येत आहे. सदर कष्टकऱ्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती