शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

समुद्रपूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन अन् कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीची लागवड केली. त्यानंतर तब्बल २२ दिवसांचा पावसाचा खंड पडला. परिणामी अंकुरलेली विविध पीक करपण्याच्या मार्गावर होती. अशातच मागील दोन आठवड्यापासून थांबून थांबून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पीक पिवळी पडत असून संपूर्ण तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात शेत शिवारांमध्ये पाणी साचून असल्याने सध्या पीक पिवळी पडत आहेत. शेतातील पाण्यामुळे कपाशीचे पान गळत आहेत.यामुळे यंदाही नापिकीला तोंड द्यावे लागले, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. तालुक्यातील कपाशी व सोयाबीन पीक सध्या आॅक्सीजनवर असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी बोनस अशी ओळख असलेले सोयाबीनचे पीक दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांना दगा देणार, असेही वृद्ध शेतकरी सांगतात. सततच्या पावसामुळे तालुक्यावर सध्या ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अनेक शेतकºयांना पावसामुळे मशागतीची कामे करता आली नाही. अशातच ढगाळ वातावरण असल्याने त्याचा परिणामही उभ्या पिकांवर होत आहे. इतकेच नव्हे तर पिकांची वाढही खुंटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. संपूर्ण तालुक्याच्या शेत पिकांची परिस्थिती पाहता समुद्रपूर तालुक्याला ओल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत टाकावे तसेच तालुक्यातील शेतकºयांना भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.कष्टकऱ्याचा रोजगार हिरावलाशेतमजुरीची कामे करून कुटुंबाचा गाढा ओढणाऱ्यांची संख्या तालुक्यात मोठी आहे. परंतु, पावसाने त्यांच्याही अडचणीत भर टाकली आहे. सततच्या मुसळधार पावसाने त्यांचा रोजगारच सध्या हिराव्याचे दिसून येत आहे. सदर कष्टकऱ्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती