शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी झाल्याने पीक परिस्थितीही समाधानकारक होती, तर त्यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने, तसेच सध्या ऊनही तापत असल्याने बारा ते पंधरा दिवसांचे अंकुरलेले पीक माना टाकत आहे. 

ठळक मुद्देपाऊस लांबला : शेतकऱ्यांची वाढली चिंता, पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यंतरी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली, तर सध्या जिल्ह्यातील विविध भागांत डवरणीच्या कामाला गती दिली जात आहे. असे असले तरी मागील दहा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने, तसेच पुढील आठ दिवस पाऊस येण्याची शक्यता नसल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी झाल्याने पीक परिस्थितीही समाधानकारक होती, तर त्यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने, तसेच सध्या ऊनही तापत असल्याने बारा ते पंधरा दिवसांचे अंकुरलेले पीक माना टाकत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी रात्रीही शेतात जाऊन उभ्या पिकाला सिंचन करून पीक वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत, तर कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या आहेत. रुसलेला वरुणराजा प्रसन्न होत दमदार बरसावा यासाठी ग्रामीण भागात शेतकरी व ग्रामस्थ सध्या धोंडी काढून देवाला साकडे घालत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवडजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी तब्बल १ लाख १३ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यापैकी बहुतांश शेतजमिनी कोरडवाहू आहेत. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास १ लाख १३ हजार हेक्टरपैकी अर्धेअधिक सोयाबीन पीक पाण्याअभावी करपण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

काय म्हणतात शेतकरी...

मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची परिस्थिती बिकट झाली आहे. दोन ते तीन दिवस पावसाची प्रतीक्षा केली; पण पाऊस न झाल्याने आता स्प्रिंकलरच्या साहाय्याने सिंचन करून उभे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी आठवड्यातून काहीच दिवस दिवसाला महावितरण कृषीपंपाला विद्युत पुरवठा करते.- अंगद गिरधर, शेतकरी, जाम.

माझ्याकडे अकरा एकर शेती आहे. त्यापैकी अडीच एकरात सोयाबीन, सात एकरात कपाशी, तर साडेतीन एकरात तुरीची लागवड केली आहे; पण मागील दहा ते बारा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने अडचणीत भर पडली आहे. शेतातील विहिरीत असलेल्या पाण्याच्या जोरावर सध्या उभे पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.- अतुल देशमुख, शेतकरी, चिकणी.

माझ्याकडे कोरडवाहू शेती असून, यंदा सोयाबीनची पेरणी केली आहे. पंधरा ते वीस दिवसांचे अंकुरलेले पीक सध्या पाण्याअभावी माना टाकत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागेल. - एन. बी. कुसरे, शेतकरी, आर्वी.

माझ्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यापैकी चार एकरांत कपाशी, तर एका एकरात तुरीची लागवड केली आहे; पण मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अंकुरलेल्या पिकांची परिस्थिती बिकट आहे. आज ना उद्या दमदार पाऊस येईल अशी आशा असून सध्या आकाशाकडे नजरा लागल्या आहेत.- गजानन डफरे, शेतकरी, चिकणी.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती