शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गाळमुक्त ‘धाम’ करेल भविष्यातील जलसंकटावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:46 IST

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु, वर्धा शहरासह परिसरील १५ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही.

ठळक मुद्देसाडेतीन दशकांत सर्वाधिक गाठला तळ : गाळाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु, वर्धा शहरासह परिसरील १५ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही. विशेष म्हणजे मागील साडेतीन दशकाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सर्वात जास्त तळ या प्रकल्पाने गाठला आहे. धाम प्रकल्प गाळमुक्त झाल्यास तो भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी फायद्याचाच ठरेल. परिणामी, वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या धाम प्रकल्पात सध्या केवळ ८.३८ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस न झाल्याने तसेच सदर जलाशयही पाहिजे तसा भरला नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. परिणामी, वर्धा शहरासह परिसरातील १५ गावांमध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येते. उल्लेखनिय म्हणजे मागील ३३ वर्षांपासून धाम प्रकल्पाची १.९० मिटरने उंची वाढविण्याचा विषय शासनदरबारी रेंगळत आहे. या प्रकल्पाची उंची वाढीच्या विषयाला वेळीच प्रत्यक्ष कृतीत आणले असते तर सध्या या जलाशयात पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात राहिला असता. परंतु, जलाशयाच्या उंची वाढविण्याचा विषय वेळीच मार्गी न लागण्याला लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षी धोरणच कारणीभूत ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी योजनेच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे होत आहे. इतकेच नव्हे तर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कारही वर्धा जिल्ह्यातील गावांना मिळाला. मात्र, विविध सामाजिक संघटना श्रमदानातून तसेच शासकीय अधिकारी सदर योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला गाळमुक्त करण्याकडे पाठच दाखवित असल्याचे चित्र आहे. धाम जलाशयाने मागील साडे तीन दशकाच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त तळ गाठला आहे. त्यामुळे यंदा या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात गाळही काढणे प्रशासनाला शक्य होऊ शकणार असून प्रत्यक्ष कृती होईल काय याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम प्रकल्प गाळमुक्त होणे गरजेचे आहे. धाम जलाशयातील गाळ काढण्यास सुरूवात झाल्यावर तो गाळ परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून घ्यावा यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊन त्या दिशेने काम करू. इतकेच नव्हे तर धाम गाळमुक्त व्हावा यासाठी आपण पं.स.च्या मासिक सभेत सदर प्रश्न मांडणार आहे.- नीतीन अरबट, पं.स. सदस्य, आर्वी.सध्या वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. जर धामची उंची वेळीच वाढविली असती तर नागरिकांवर ही परिस्थिती ओढावली नसती. धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी तसेच सदर प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी येत्या आठ दिवसात जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल न उचलल्यास युवा परिवर्तन की आवाज संघटना नागरिकांना सोबत घेऊन महाकाळी येथील धाम प्रकल्पातच तीव्र आंदोलन करेल.- निहाल पांडे, संस्थापक अध्यक्ष, युवा परिवर्तन की आवाज संघटना.