शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त ‘धाम’ करेल भविष्यातील जलसंकटावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:46 IST

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु, वर्धा शहरासह परिसरील १५ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही.

ठळक मुद्देसाडेतीन दशकांत सर्वाधिक गाठला तळ : गाळाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध तलावांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. परंतु, वर्धा शहरासह परिसरील १५ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही. विशेष म्हणजे मागील साडेतीन दशकाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सर्वात जास्त तळ या प्रकल्पाने गाठला आहे. धाम प्रकल्प गाळमुक्त झाल्यास तो भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी फायद्याचाच ठरेल. परिणामी, वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या धाम प्रकल्पात सध्या केवळ ८.३८ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस न झाल्याने तसेच सदर जलाशयही पाहिजे तसा भरला नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. परिणामी, वर्धा शहरासह परिसरातील १५ गावांमध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येते. उल्लेखनिय म्हणजे मागील ३३ वर्षांपासून धाम प्रकल्पाची १.९० मिटरने उंची वाढविण्याचा विषय शासनदरबारी रेंगळत आहे. या प्रकल्पाची उंची वाढीच्या विषयाला वेळीच प्रत्यक्ष कृतीत आणले असते तर सध्या या जलाशयात पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात राहिला असता. परंतु, जलाशयाच्या उंची वाढविण्याचा विषय वेळीच मार्गी न लागण्याला लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षी धोरणच कारणीभूत ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी योजनेच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामे होत आहे. इतकेच नव्हे तर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कारही वर्धा जिल्ह्यातील गावांना मिळाला. मात्र, विविध सामाजिक संघटना श्रमदानातून तसेच शासकीय अधिकारी सदर योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला गाळमुक्त करण्याकडे पाठच दाखवित असल्याचे चित्र आहे. धाम जलाशयाने मागील साडे तीन दशकाच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त तळ गाठला आहे. त्यामुळे यंदा या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात गाळही काढणे प्रशासनाला शक्य होऊ शकणार असून प्रत्यक्ष कृती होईल काय याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम प्रकल्प गाळमुक्त होणे गरजेचे आहे. धाम जलाशयातील गाळ काढण्यास सुरूवात झाल्यावर तो गाळ परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून घ्यावा यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊन त्या दिशेने काम करू. इतकेच नव्हे तर धाम गाळमुक्त व्हावा यासाठी आपण पं.स.च्या मासिक सभेत सदर प्रश्न मांडणार आहे.- नीतीन अरबट, पं.स. सदस्य, आर्वी.सध्या वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. जर धामची उंची वेळीच वाढविली असती तर नागरिकांवर ही परिस्थिती ओढावली नसती. धाम जलाशयाला गाळमुक्त करण्यासाठी तसेच सदर प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी येत्या आठ दिवसात जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल न उचलल्यास युवा परिवर्तन की आवाज संघटना नागरिकांना सोबत घेऊन महाकाळी येथील धाम प्रकल्पातच तीव्र आंदोलन करेल.- निहाल पांडे, संस्थापक अध्यक्ष, युवा परिवर्तन की आवाज संघटना.