शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

‘दुष्काळ’ संकट; ५७ विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 8:51 PM

जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५७ विहिरी अधिग्रहित करण्यात आला आहे. तर ६३ विंधन विहिरी आणि ६३ विशेष नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे६३ विंधन विहिरींसह ६३ योजनांची दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५७ विहिरी अधिग्रहित करण्यात आला आहे. तर ६३ विंधन विहिरी आणि ६३ विशेष नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा (घा.) या दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दोन तालुक्यातील गावांची संख्या २५८ इतकी आहे. यापैकी आष्टी तालुक्यात एक टँकर सुरू आहे. आर्वी तालुक्यातही दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाणवत आहे. आर्वी नगरपरिषदेमध्ये एक व आर्वी ग्रामीणमध्ये एक टँकर सुरू आहे. आष्टी आणि कारंजा तालुक्यातील ३८ हजार १२९ शेतकऱ्यांना १० कोटी १० लाख रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ३५ हजार ५९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. त्यापैकी ४० लाख १७ हजार रुपये ६४८ नुकसानग्रस्त व पीक विम्याच्या मोबदल्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना अदा करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत वर्धा जिल्ह्यातील ८१ हजार २९९ लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ४० हजार शेतकºयांना ७ कोटी ८१ लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १ हजार ६१४ कामे सुरू असून त्यावर २ हजार ७६६ मजूर उपस्थित आहेत. २१ हजार २०३ कामे शेल्फवर आहेत.१.५६ कोटींची रक्कम केली महावितरणला अदापिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १ कोटी ५६ लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीला देण्यात आली आहे. परिणामी, सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई