शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘दुष्काळ’ संकट; ५७ विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:51 IST

जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५७ विहिरी अधिग्रहित करण्यात आला आहे. तर ६३ विंधन विहिरी आणि ६३ विशेष नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे६३ विंधन विहिरींसह ६३ योजनांची दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५७ विहिरी अधिग्रहित करण्यात आला आहे. तर ६३ विंधन विहिरी आणि ६३ विशेष नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा (घा.) या दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दोन तालुक्यातील गावांची संख्या २५८ इतकी आहे. यापैकी आष्टी तालुक्यात एक टँकर सुरू आहे. आर्वी तालुक्यातही दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाणवत आहे. आर्वी नगरपरिषदेमध्ये एक व आर्वी ग्रामीणमध्ये एक टँकर सुरू आहे. आष्टी आणि कारंजा तालुक्यातील ३८ हजार १२९ शेतकऱ्यांना १० कोटी १० लाख रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ३५ हजार ५९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. त्यापैकी ४० लाख १७ हजार रुपये ६४८ नुकसानग्रस्त व पीक विम्याच्या मोबदल्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना अदा करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत वर्धा जिल्ह्यातील ८१ हजार २९९ लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ४० हजार शेतकºयांना ७ कोटी ८१ लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १ हजार ६१४ कामे सुरू असून त्यावर २ हजार ७६६ मजूर उपस्थित आहेत. २१ हजार २०३ कामे शेल्फवर आहेत.१.५६ कोटींची रक्कम केली महावितरणला अदापिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १ कोटी ५६ लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीला देण्यात आली आहे. परिणामी, सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई