शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

बिनधास्त प्या आता गाईचे शुद्ध दूध; ‘लम्पी’चा संकलनावर परिणाम नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 22:31 IST

जिल्ह्यात मागील महिनाभरात दुग्धविकास विभागाकडून वर्धा संघाकडून ९८६ तसेच गोरसभंडारकडून ८.०९१ लिटर दूध संकलन केले आहे. तर तीन खासगी डेअरींमार्फत तब्बल ५८ हजार ४८४ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले आहे. तसेच २२ हजार ४९१ लिटर दुधाचे वितरण करण्यात आल्याची माहिती आहे.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गाईंमध्ये उद्भवलेल्या लम्पी त्वचारोगाचा झपाट्याने फैलाव सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील काही गावे सोडली तर इतर ठिकाणचे पशुधन अद्यापपर्यंत या संकटापासून सुरक्षित आहे. यामुळे येथील दूध संकलनावरही काहीच परिणाम झालेला नाही. लम्पी रोगाची साथ आल्यानंतरही सेवाग्राम येथील जिल्हा दुग्ध विकास कार्यालयात दररोज सरासरी ९८६ लिटर दूध संकलन होत आहे. त्यामुळे लम्पीचा दूध संकलनावर परिणाम नसून नागरिक बिनधास्त शुद्ध गाईचे दूध पिऊ शकतात. जिल्ह्यात मागील महिनाभरात दुग्धविकास विभागाकडून वर्धा संघाकडून ९८६ तसेच गोरसभंडारकडून ८.०९१ लिटर दूध संकलन केले आहे. तर तीन खासगी डेअरींमार्फत तब्बल ५८ हजार ४८४ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले आहे. तसेच २२ हजार ४९१ लिटर दुधाचे वितरण करण्यात आल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यांतील गावांमध्ये पशुधनावर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला असला तरी दूध संकलन आणि वितरणावर याचा परिणाम झाला नसल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी शैलेश नवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. लम्पी विषाणूमुळे गायीच्या मृत्यूदर कमी असला तरी त्याचा थेट परिणाम तिच्या दूध उत्पादनावर आणि गर्भाशयावर होतो. तज्ज्ञांच्या मते हा रोग दुधाच्या उत्पादनावर देखील परिणाम करतो. गायीचे दूध  ५० टक्क्यांनी कमी होते. हा आजार आर्थिक नुकसान करणारा आहे. मात्र, जिल्ह्यात तशी परिस्थिती नसून दूध उत्पादनावर फार काही परिणाम झाला नसून संकलनही व्यवस्थित  सुरु आहे.

संक्रमित जनावरांना पूर्णपणे वेगळे करणे आवश्यक -   लम्पी विषाणूचा संसर्ग रोखण्याबाबत तज्ज्ञांचे असे मत आहे की, संक्रमित प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळे करणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. संसर्गाचा वेग वेगवान असला तरी गुरांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे.-  अशा स्थितीत शेतकरी व गोशाळा कर्मचाऱ्यांनी प्रथम संक्रमित गायीला उर्वरित जनावरांपासून वेगळे करून त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा हा संसर्ग इतर प्राण्यांमध्ये झपाट्याने पसरू शकतो. 

दूध जास्त काळ उकळणे गरजेचे -   गाईच्या दुधात असलेले विषाणूदेखील दूर केले जाऊ शकतात. यासाठी दूध जास्त वेळ उकळणे आवश्यक आहे.-  पाश्चरायझेशनद्वारे वापरले जाणारे दूध कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही. -   परंतु, हे दूध जर गाईच्या बछड्याने पिले तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत बछड्याला गाईपासून दूर ठेवावे. 

जिल्ह्यातील विविध गावांत ‘लम्पी’चा शिरकाव झाला असला तरी याचा दूध संकलन आणि वितरणावर परिणाम झालेला दिसत नाही. दररोज सरासरी ६७ हजार ५६१ लिटर दुधाचे संकलन केले जात असून २२ हजारांवर दुधाचे वितरण केले जात आहे. सध्यातरी दूध संकलनावर लम्पीचा परिणाम झालेला दिसून येत नाही. - शैलेश नवले, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी. वर्धा.

मी दररोज ८०० ते ९०० लिटर दूध विक्री करतो. ‘लम्पी’मुळे पशुधनाचे लसीकरण झाले आहे. शासकीय संस्थांमध्ये दुधाची विक्री होत असल्याने आम्ही काळजी घेतो. दूध विक्रीत कुठलीही घट आलेली नाही.- गोविंद डोळे, दूध विक्रेता, पिपरी मेघे. 

सध्या दूध संकलनात कहीशी घट आली आहे. मात्र, लम्पीचा दूध संकलनावर परिणाम झालेला नाही. आमच्या सहकारी संस्थेतर्फे पशुपालकांना पाच हजारांचे अनुदानही आम्ही दिलेले आहे. दूध संकलनावर लप्मीचा परिणाम नसून दूध अगदी शुद्ध आहे. - उमेश तेलरांधे, अध्यक्ष, गो दुग्ध सह.संस्था, रामनगर.  

 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगmilkदूध