शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

टिळक पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाºया गोल भाजी बाजारात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा अर्धाकृती पुतळा पालिकेच्या वतीने कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुतळ्यालाच हल्ली घाण, कचऱ्याने विळखा घातलेला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडकी फळे आणि भाजीपाला व अन्य प्रकाराचा कचरा पुतळा परिसरातच आणून टाकला जातो. या परिसरातील इतर व्यावसायिकही गोल बाजाराच्या मागील परिसरात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा आणून टाकतात.

ठळक मुद्देशहरात सर्वत्र स्वच्छतेचे तीन-तेरा : नगरपालिकेचा स्वच्छता विभाग घेतोय डुलक्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षणात केवळ नावालाच स्वच्छता करून क्रमांक मिळविणाऱ्या नगरपालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेने कळस गाठला आहे. गोल भाजी बाजाराला घाणीने विळखा घातल्याने टिळकांच्या पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे ओढले जात आहेत. पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या संवेदना मात्र बोथट झाल्याचे दिसून येत आहे.टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाºया गोल भाजी बाजारात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा अर्धाकृती पुतळा पालिकेच्या वतीने कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुतळ्यालाच हल्ली घाण, कचऱ्याने विळखा घातलेला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडकी फळे आणि भाजीपाला व अन्य प्रकाराचा कचरा पुतळा परिसरातच आणून टाकला जातो. या परिसरातील इतर व्यावसायिकही गोल बाजाराच्या मागील परिसरात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा आणून टाकतात. हा कचरा सडल्यानंतर या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. व्यावसायिकांकडून टाकल्या जाणाºया सडक्या, भाजी फळांवर मोकाट जनावरे उच्छाद घालत असतात. मात्र, पालिकेकडून परिसराची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचे येथील चित्र पाहिल्यावर निदर्शनास येते. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच पालिकेकडून हा परिसर स्वच्छ केला जातो. इतरवेळी स्वच्छतेकडे कानाडोळा केला जातो. येथे टाकल्या जाणाºया कचऱ्यात प्लास्टिकचे मोेठे प्रमाण असल्याने प्लास्टिकबंदीचा फज्जा झालेला पाहायला मिळतो. शहरातील गोल बाजारात भाजी खरेदी करण्याकरिता येणाºया ग्राहकांची मोठी संख्या आहे. या ग्राहकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गोलबाजाराचे मागील लोखंडी प्रवेशद्वार कधीचेच मोडकळीस आले. परिणामी, मागील भागातून जनावरे पुतळा परिसरात शिरतात आणि घाण करतात. मात्र, पालिकेकडून पुतळ्याच्या देखभाल, सुरक्षा आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महादेवपुरा, शहर पोलिस ठाणे परिसर, हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, रामनगर, श्रावणे ले-आउटसह शहरातील इतर वॉर्डातही कचºयाचे डोंगर पाहायला मिळतात. पालिकेचा स्वच्छता विभाग मात्र, डुलक्या घेत असल्याचे चित्र आहे.नागरिकांकडून पुतळा परिसरातच केली जाते लघुशंकापुतळा परिसरातच भाजी, फळ विक्रेत्यांकडून हातगाड्या उभ्या केल्या जातात. सडकी भाजी, फळे आणि अंड्याची टरफले आणून टाकतात. कागद व प्लास्टिक पिशव्यांची जाळून विल्हेवाट लावली जाते. यामुळे प्रदूषणालाही हातभार लागत आहे. शौचालयासाठी पुतळा परिसराचा वापर केला जातो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य येथे पसरले असून पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे ओढले जात आहेत.स्वच्छ सर्वेक्षणाच्या फलक परिसरातच अस्वच्छता!शहरातील विविध भागात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी स्वच्छ सर्वेक्षणाचे फलक लावण्यात आले आहे. कित्येक ठिकाणी या फलकांच्या पायथ्याशी आणि परिसरातच अस्वच्छता पसरलेली असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. त्यामुळे स्वच्छता विभाग करतो तरी काय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :dumpingकचरा