शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

टिळक पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाºया गोल भाजी बाजारात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा अर्धाकृती पुतळा पालिकेच्या वतीने कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुतळ्यालाच हल्ली घाण, कचऱ्याने विळखा घातलेला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडकी फळे आणि भाजीपाला व अन्य प्रकाराचा कचरा पुतळा परिसरातच आणून टाकला जातो. या परिसरातील इतर व्यावसायिकही गोल बाजाराच्या मागील परिसरात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा आणून टाकतात.

ठळक मुद्देशहरात सर्वत्र स्वच्छतेचे तीन-तेरा : नगरपालिकेचा स्वच्छता विभाग घेतोय डुलक्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षणात केवळ नावालाच स्वच्छता करून क्रमांक मिळविणाऱ्या नगरपालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेने कळस गाठला आहे. गोल भाजी बाजाराला घाणीने विळखा घातल्याने टिळकांच्या पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे ओढले जात आहेत. पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या संवेदना मात्र बोथट झाल्याचे दिसून येत आहे.टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाºया गोल भाजी बाजारात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा अर्धाकृती पुतळा पालिकेच्या वतीने कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुतळ्यालाच हल्ली घाण, कचऱ्याने विळखा घातलेला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडकी फळे आणि भाजीपाला व अन्य प्रकाराचा कचरा पुतळा परिसरातच आणून टाकला जातो. या परिसरातील इतर व्यावसायिकही गोल बाजाराच्या मागील परिसरात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा आणून टाकतात. हा कचरा सडल्यानंतर या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. व्यावसायिकांकडून टाकल्या जाणाºया सडक्या, भाजी फळांवर मोकाट जनावरे उच्छाद घालत असतात. मात्र, पालिकेकडून परिसराची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचे येथील चित्र पाहिल्यावर निदर्शनास येते. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच पालिकेकडून हा परिसर स्वच्छ केला जातो. इतरवेळी स्वच्छतेकडे कानाडोळा केला जातो. येथे टाकल्या जाणाºया कचऱ्यात प्लास्टिकचे मोेठे प्रमाण असल्याने प्लास्टिकबंदीचा फज्जा झालेला पाहायला मिळतो. शहरातील गोल बाजारात भाजी खरेदी करण्याकरिता येणाºया ग्राहकांची मोठी संख्या आहे. या ग्राहकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गोलबाजाराचे मागील लोखंडी प्रवेशद्वार कधीचेच मोडकळीस आले. परिणामी, मागील भागातून जनावरे पुतळा परिसरात शिरतात आणि घाण करतात. मात्र, पालिकेकडून पुतळ्याच्या देखभाल, सुरक्षा आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महादेवपुरा, शहर पोलिस ठाणे परिसर, हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, रामनगर, श्रावणे ले-आउटसह शहरातील इतर वॉर्डातही कचºयाचे डोंगर पाहायला मिळतात. पालिकेचा स्वच्छता विभाग मात्र, डुलक्या घेत असल्याचे चित्र आहे.नागरिकांकडून पुतळा परिसरातच केली जाते लघुशंकापुतळा परिसरातच भाजी, फळ विक्रेत्यांकडून हातगाड्या उभ्या केल्या जातात. सडकी भाजी, फळे आणि अंड्याची टरफले आणून टाकतात. कागद व प्लास्टिक पिशव्यांची जाळून विल्हेवाट लावली जाते. यामुळे प्रदूषणालाही हातभार लागत आहे. शौचालयासाठी पुतळा परिसराचा वापर केला जातो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य येथे पसरले असून पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे ओढले जात आहेत.स्वच्छ सर्वेक्षणाच्या फलक परिसरातच अस्वच्छता!शहरातील विविध भागात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी स्वच्छ सर्वेक्षणाचे फलक लावण्यात आले आहे. कित्येक ठिकाणी या फलकांच्या पायथ्याशी आणि परिसरातच अस्वच्छता पसरलेली असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. त्यामुळे स्वच्छता विभाग करतो तरी काय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :dumpingकचरा