शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

वर्धा जिल्ह्यातील डाऊन पटसंख्येच्या शाळा कायमस्वरूपी होणार लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 13:21 IST

वर्धा जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील जवळपास ७३ शाळांमधील पटसंख्या ही दहाच्या आतच असल्याने या शाळा कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७३ शाळांवर येणार गंडांतर दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची यादी धडकली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: इंग्रजी माध्यमांकडे पालकांना कल वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गळती लागली आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळांना गतवैभव प्राप्त करुन देण्याकरिता शासनस्तरावर विविध उपाययोजना राबवून शिक्षकही मेहनत घेत आहे. पण, जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील जवळपास ७३ शाळांमधील पटसंख्या ही दहाच्या आतच असल्याने या शाळा कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अनेक अधिकारी व मोठे व्यक्ती घडले आहे. पण, आता काळानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पेव फुटले. पालकांनीही जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाट धरली. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या चिंतेचा विषय ठरली. गेल्या चार वर्षांपासून शासनाने याकडे लक्ष केंद्रीत करुन कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण स्वीकारले. सरुवातील २० पटसंख्या असलेल्या शाळा समायोजित करण्यात आल्या. आता शालेय शिक्षण विभागाने दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील ७३ शाळांचा समावेश आहे. यातील बहुतांश शाळांमध्ये दहा पेक्षा कमी तर पाच पेक्षा अधिक पटसंख्या आहे. काही शाळांमध्ये बरोबर दहाच विद्यार्थी दाखविल्या जात आहे. आता दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करुन कमी पटाची शाळा कायमचीच ह्यलॉकडाऊनह्ण करण्याच्या हालचाली शासनस्तरावरुन सुरु झाल्या आहे. पण, सध्याच्या कोरोना प्रकोपामुळे हा निर्णय लांबणीवर पडणार की अंमलबजावणी होणार, हे येणारी वेळच सांगणार आहे.शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीतीशालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या दहापेक्षा कमी पटसंख्येच्या यादीमध्ये वर्धा जिल्ह्यातील ७३ शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करुन त्या बंद केल्या तर एका शाळेत किमान दोन शिक्षक, या प्रमाणे विचार केल्यास १४६ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. यासोबतच शाळेची इमारत, शाळेतील इतर साहित्यही बेवारस राहण्याची शक्यता आहे.गुणवत्ता वाढण्याऐवजी घसरलीज्या शाळेत कमी विद्यार्थी असतात त्या शाळेची गुणवत्ता अधिक राहते, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. जिल्हा परिषदेतच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असतानाही गुणवत्ता वाढण्याऐवजी घटल्याचेच दिसून येते. शाळेत बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी असल्यास त्यांना शिकविण्याचीही मानसिकता होत नाही. त्यामुळे कमी पटसंख्याही गुणवत्तेवर परिणामकारक ठरली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र