शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

वर्धा जिल्ह्यातील डाऊन पटसंख्येच्या शाळा कायमस्वरूपी होणार लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 13:21 IST

वर्धा जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील जवळपास ७३ शाळांमधील पटसंख्या ही दहाच्या आतच असल्याने या शाळा कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७३ शाळांवर येणार गंडांतर दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची यादी धडकली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: इंग्रजी माध्यमांकडे पालकांना कल वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गळती लागली आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळांना गतवैभव प्राप्त करुन देण्याकरिता शासनस्तरावर विविध उपाययोजना राबवून शिक्षकही मेहनत घेत आहे. पण, जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील जवळपास ७३ शाळांमधील पटसंख्या ही दहाच्या आतच असल्याने या शाळा कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अनेक अधिकारी व मोठे व्यक्ती घडले आहे. पण, आता काळानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पेव फुटले. पालकांनीही जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाट धरली. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या चिंतेचा विषय ठरली. गेल्या चार वर्षांपासून शासनाने याकडे लक्ष केंद्रीत करुन कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण स्वीकारले. सरुवातील २० पटसंख्या असलेल्या शाळा समायोजित करण्यात आल्या. आता शालेय शिक्षण विभागाने दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील ७३ शाळांचा समावेश आहे. यातील बहुतांश शाळांमध्ये दहा पेक्षा कमी तर पाच पेक्षा अधिक पटसंख्या आहे. काही शाळांमध्ये बरोबर दहाच विद्यार्थी दाखविल्या जात आहे. आता दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करुन कमी पटाची शाळा कायमचीच ह्यलॉकडाऊनह्ण करण्याच्या हालचाली शासनस्तरावरुन सुरु झाल्या आहे. पण, सध्याच्या कोरोना प्रकोपामुळे हा निर्णय लांबणीवर पडणार की अंमलबजावणी होणार, हे येणारी वेळच सांगणार आहे.शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीतीशालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या दहापेक्षा कमी पटसंख्येच्या यादीमध्ये वर्धा जिल्ह्यातील ७३ शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करुन त्या बंद केल्या तर एका शाळेत किमान दोन शिक्षक, या प्रमाणे विचार केल्यास १४६ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. यासोबतच शाळेची इमारत, शाळेतील इतर साहित्यही बेवारस राहण्याची शक्यता आहे.गुणवत्ता वाढण्याऐवजी घसरलीज्या शाळेत कमी विद्यार्थी असतात त्या शाळेची गुणवत्ता अधिक राहते, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. जिल्हा परिषदेतच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असतानाही गुणवत्ता वाढण्याऐवजी घटल्याचेच दिसून येते. शाळेत बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी असल्यास त्यांना शिकविण्याचीही मानसिकता होत नाही. त्यामुळे कमी पटसंख्याही गुणवत्तेवर परिणामकारक ठरली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र