शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जिल्ह्यात ७ हजार ११९ नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 6:00 AM

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे१२ महिन्यांतील स्थिती : अनेकांना गमवावा लागला जीव

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मागील वर्षभरापासून भटक्या श्वानांनी नागरिकांना वेठीस धरल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेवारस श्वानांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील १२ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७ हजार ११९ जणांना चावा घेतल्याचे शासकीय आकडेवारीतून स्पष्ट होते. हा शासकीय आकडा समस्येचे गांभीर्य दर्शविणारा आहे.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉककरिता जाणाºया विद्यार्थ्यांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा हे मोकाट श्वान पाठलाग करतात. यामुळे अपघात होऊन कित्येकांना अपंगत्वही आले आहे. सोबतच महामार्गावरही भटके श्वान आडवे जात असल्याने गंभीर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यास, त्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यास संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत प्रशासन अयशस्वी ठरले आहे.एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या १२ महिन्यांत ७ हजार ११९ जणांना श्वानदंश झाला. यातील अनेकांना जीवही गमवावा लागला. आर्वी उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशाची ६४२ प्रकरणे दाखल झाली. भिडी ग्रामीण रुग्णालय २४०, पुलगाव ग्रामीण रुग्णालय-६५९, वडनेर ग्रामीण रुग्णालय १३३, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट- ७९४, कारंजा ग्रामीण रुग्णालय ६०३, समुद्रपूर ग्रामीण रुग्णालय-३६६, सेलू ग्रामीण रुग्णालय ९१४ तर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २ हजार ७६८ इतकी प्रकरणे दाखल झाली आहेत. ही संपूर्ण आकडेवारी शासकीय आहेत. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातही उपचार घेतात. त्यामुळे श्वानदंशाचा आकडा ३० हजारांच्या जवळपास असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.बळावताहेत कोरड्या खोकल्याचे आजारजिल्ह्यात गत काही वर्षांपासून श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जाते. श्वानांच्या संख्यावाढीमुळे कोरड्या खोकल्यासह इतर आजार बळावत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.जन्मदर नियंत्रणाला यंत्रणांची बगलनगरपालिका, ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींकडून आकारल्या जाणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याची बाबदेखील समाविष्ट आहे. संबंधित यंत्रणेकडे रीतसर नोंदणी केल्यानंतरच जनावरे पाळता येतात. तसा नियम आहे. मात्र, या नियमाला गोपालक, नागरिकांकडून सर्रास पायदळी तुडविले जाते. याकडे यंत्रणेकडूनही सपशेल दुर्लक्ष केले जाते. स्वच्छता करापोटी रक्कम मात्र वसूल केली जाते. श्वानांच्या जन्मदर नियंत्रणाला पद्धतशीरपणे बगल दिली जात आहे.श्वान व इतर मोकाट जनावरांमुळे अस्वच्छता पसरते. यातूनच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. नागरी वस्तीत जनावरांचा गोठाही बांधता येत नाही. तसा शासनाचा नियमही आहे. ‘स्वच्छ भारत’चा गाजावाजा केला जातो. मात्र, पालिकेकडून श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याविषयी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे ‘स्वच्छ अभियाना’चे तीन-तेराच होत आहेत.आशीष गोस्वामी, सचिव, पीपल फॉर अ‍ॅनिमल्स, वर्धामोकाट श्वानांमुळे रेबीज व इतर संसर्गजन्य आजार बळावतात. कुत्री कुठलेही पाणी पितात, विष्टा करतात. सोबतच विशिष्ट ऋतूमध्ये श्वानांवर गोचिड व इतर कीटक असतात. यामुळे जीवघेणे आजार उद्भवतात. या सर्व बाबींवर जन्मदर नियंत्रण हा एकमेव उपाय आहे.डॉ. सचिन पावडेबालरोगतज्ज्ञ तथा अध्यक्ष, व्हीजेएम, वर्धा

टॅग्स :dogकुत्रा