शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
2
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
3
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
4
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
5
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
6
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
7
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
8
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
9
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
10
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
11
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
12
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
13
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
14
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
15
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
16
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
17
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
18
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
19
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
20
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल

जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था

By admin | Updated: February 23, 2015 01:43 IST

शहीद भूमीला शुद्ध पाणी मिळावे म्हणून सुमारे २५ वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली; मात्र देखभाल व दुरूस्ती अभावी या केंदाची दुरवस्था झाली आहे.

लोकमत विशेषअमोल सोटे आष्टी (शहीद)शहीद भूमीला शुद्ध पाणी मिळावे म्हणून सुमारे २५ वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली; मात्र देखभाल व दुरूस्ती अभावी या केंदाची दुरवस्था झाली आहे. यातील यंत्रसामग्री गंजली असून त्यातून होणाऱ्या शुद्धीकरणावरच प्रश्न निर्माण झाला आहे. हेच पाणी नागरिकांच्या पिण्यात जात असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.आष्टी, नवीन आष्टी, पेठअहमदपूर या तिनही गावांना याच जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. ममदापूर तलावातील पाणी शुद्ध करून ते नळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. या केंद्राकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष केले. शुद्धीकरणासाठी अस्तित्त्वात असलेल्या यंत्राचे भाग मोठ्या प्रमाणात गंजले आहेत. याचा विवरीत परिणाम जलशुद्धीकरणावर होत आहे. एका उंच टेकडीवर उभारण्यात आलेल्या या केंद्राजवळ पोहचण्याकरिता रस्ताही नाही. खडतर प्रवास करून टेकडीवर जावे लागत आहे. ईमारतीला जागोजागी तडे गेले असून तिथे लावण्यात आलेल्या टाईल्स फुटल्या आहेत. गोल रिंंगण गंजल्याने कधीही तुटण्याची शक्यता आहे. जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ३.६ दशलक्ष लीटर प्रतिदिन आहे. वाढीव पाणीपुरवठ्याचाही भार यावर देण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरण करण्याकरिता असलेल्या या केंद्रावर पाणी शुद्ध होते वा नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. येथे तुरटी, ब्लिचिंग पावडर याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. शासन राष्ट्रीय पेयजल योजनेमधून पाणीपुरवठ्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करते; परंतु इमारत व यंत्राच्या नवीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. नागरिकांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी अत्यावश्यक बाब झाल्याने शासनाच्या ढिसाळ कारभाराचा त्याला फटका बसत आहे. यामुळे अस्तित्त्वात असलेल्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने या जलशुद्धीकरण केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तलाव व कालव्याचे येणारे पाणी दुर्गंधीयुक्त व दुषित असल्याची नागरिकांकडून ओरड होती. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला नव्याने पाण्याची टाकी बांधणे, यंत्रसामग्री विकत घेण्यासह अप्पर वर्धा धरणातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १९६० पासूनची आष्टी शहरात असलेली पाईपलाईन बदलविण्याकरिता जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती आहे.सात कोटींचा खर्च अपेक्षितजलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीचे बांधकाम, पाईपलाईन बदलविणे आणि यंत्र खरेदी यासाठी एकूण सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामाकरिता सात कोटीपैकी किती निधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमधून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. आष्टी येथील जलशुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती, पाईपलाईन बदलविणे, टाकीचे बांधकाम प्रस्तावाला राष्ट्रीय पेयजल योजनेमधून मंजुरी देण्यात येईल. शासनाच्या योजना ग्रामीण व शहरी भागात यशस्वी करण्याचे काम सुरू आहे.- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, वर्धा जिल्हा.आष्टी शहरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा व जलशुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधी मंजूर होताच कामाला सुरूवात करण्यात येईल.- अशोक विजेकर, उपसरपंच ग्रामपंचायत, आष्टी (शहीद)