शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था

By admin | Updated: February 23, 2015 01:43 IST

शहीद भूमीला शुद्ध पाणी मिळावे म्हणून सुमारे २५ वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली; मात्र देखभाल व दुरूस्ती अभावी या केंदाची दुरवस्था झाली आहे.

लोकमत विशेषअमोल सोटे आष्टी (शहीद)शहीद भूमीला शुद्ध पाणी मिळावे म्हणून सुमारे २५ वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली; मात्र देखभाल व दुरूस्ती अभावी या केंदाची दुरवस्था झाली आहे. यातील यंत्रसामग्री गंजली असून त्यातून होणाऱ्या शुद्धीकरणावरच प्रश्न निर्माण झाला आहे. हेच पाणी नागरिकांच्या पिण्यात जात असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.आष्टी, नवीन आष्टी, पेठअहमदपूर या तिनही गावांना याच जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. ममदापूर तलावातील पाणी शुद्ध करून ते नळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. या केंद्राकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष केले. शुद्धीकरणासाठी अस्तित्त्वात असलेल्या यंत्राचे भाग मोठ्या प्रमाणात गंजले आहेत. याचा विवरीत परिणाम जलशुद्धीकरणावर होत आहे. एका उंच टेकडीवर उभारण्यात आलेल्या या केंद्राजवळ पोहचण्याकरिता रस्ताही नाही. खडतर प्रवास करून टेकडीवर जावे लागत आहे. ईमारतीला जागोजागी तडे गेले असून तिथे लावण्यात आलेल्या टाईल्स फुटल्या आहेत. गोल रिंंगण गंजल्याने कधीही तुटण्याची शक्यता आहे. जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ३.६ दशलक्ष लीटर प्रतिदिन आहे. वाढीव पाणीपुरवठ्याचाही भार यावर देण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरण करण्याकरिता असलेल्या या केंद्रावर पाणी शुद्ध होते वा नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. येथे तुरटी, ब्लिचिंग पावडर याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. शासन राष्ट्रीय पेयजल योजनेमधून पाणीपुरवठ्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करते; परंतु इमारत व यंत्राच्या नवीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. नागरिकांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी अत्यावश्यक बाब झाल्याने शासनाच्या ढिसाळ कारभाराचा त्याला फटका बसत आहे. यामुळे अस्तित्त्वात असलेल्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने या जलशुद्धीकरण केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तलाव व कालव्याचे येणारे पाणी दुर्गंधीयुक्त व दुषित असल्याची नागरिकांकडून ओरड होती. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला नव्याने पाण्याची टाकी बांधणे, यंत्रसामग्री विकत घेण्यासह अप्पर वर्धा धरणातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १९६० पासूनची आष्टी शहरात असलेली पाईपलाईन बदलविण्याकरिता जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती आहे.सात कोटींचा खर्च अपेक्षितजलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीचे बांधकाम, पाईपलाईन बदलविणे आणि यंत्र खरेदी यासाठी एकूण सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामाकरिता सात कोटीपैकी किती निधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमधून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. आष्टी येथील जलशुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती, पाईपलाईन बदलविणे, टाकीचे बांधकाम प्रस्तावाला राष्ट्रीय पेयजल योजनेमधून मंजुरी देण्यात येईल. शासनाच्या योजना ग्रामीण व शहरी भागात यशस्वी करण्याचे काम सुरू आहे.- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, वर्धा जिल्हा.आष्टी शहरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा व जलशुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधी मंजूर होताच कामाला सुरूवात करण्यात येईल.- अशोक विजेकर, उपसरपंच ग्रामपंचायत, आष्टी (शहीद)