शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

'धामकुंड'तून झाली 'धाम'च्या संवाद यात्रेची सुरुवात; ४५ गावांची होणार परिक्रमा

By महेश सायखेडे | Updated: March 20, 2023 17:22 IST

सुजातपुरला होणार समारोप

वर्धा : चला जाणूया नदीला अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश आहे. त्यातील धाम नदीच्या संवाद यात्रेस सोमवारी नदीचा उगम स्थळ असलेल्या कारंजा तालुक्यातील धामकुंड येथून सुरुवात झाली. धाम नदीकाठावरील तब्बल ४५ गावांची परिक्रमा पूर्ण होत या यात्रेचा समाराेप समुद्रपूर तालुक्यातील सुजातपूर येथे ८ मे रोजीला होणार आहे.

धाम नदी संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच शरद भड, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, कारंजाचे सहा. गटविकास अधिकारी मंगेश पंधरे, नदी समन्वयक सुनील रहाणे, मुरलीधर बेलखोडे, भाऊसाहेब थुटे, माजी जिल्हा परिषद सभापती गोपाळ कालोकर, उमाकांत तायवाडे आदींची उपस्थिती होती. धाम नदीचे उगमस्थळ असलेल्या गायमुख व धामकुंड याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील जैवविविधता, जलस्त्रोत, प्राणी, पक्षी, नदीची स्थिती आदींची गावकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. त्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात नद्या स्वच्छ, सुंदर व अमृतवाहिनी होण्यासाठी गावकऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे मंगेश वरकड यांनी सांगितले.

लोक सहभाग शिवाय हे अभियान यशस्वी होऊ शकणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले. ज्याला ज्याला पिण्यासाठी पाणी पाहिजे आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने या अभियानात सहभागी होणे आवश्यक असल्याचे किर्तनकार भाऊसाहेब थुटे यांनी सांगितले. याप्रसंगी मुरलीधर बेलखोडे व सुनील रहाणे यांनीही मनोगतातून अभियानाचे महत्त्व पटवून दिले.सरपंचांनी दाखविली हिरवी झेंडी

धाम नदी संवाद यात्रेची सुरूवात सरपंच शरद भड यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. या यात्रेत मंगेश पंधरे, मंडळ अधिकारी सिद्धार्थ लभाने, वनरक्षक शफी पठाण, ग्रामसेवक नामदेव ढोबाळे, तलाठी मंजूषा दाळवणकर, युवा स्वयंसेवक काजल रोकडे, अजय रोकडे, शेजल पोहणकर, विजय अढाव यांच्यासह मोठ्या संख्येने निसर्ग व नदी प्रेमी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :riverनदीSocialसामाजिकwardha-acवर्धा