शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

देवळीची पाणीपुरवठा योजना अजूनही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:58 IST

शहराला पाणीपुरवठा करणारी ३४ कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मागील सहा वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने खासदार रामदास तडस यांनी नाराजी व्यक्त केली. आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन नांदेड या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस यांनी केली.

ठळक मुद्देप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शहराला पाणीपुरवठा करणारी ३४ कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मागील सहा वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने खासदार रामदास तडस यांनी नाराजी व्यक्त केली. आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन नांदेड या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस यांनी केली. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता या सर्व प्रकाराला कारणीभूत असल्याने त्यांना वेळीच सुधारण्याचा दम देण्यात आला. अंदोरी येथील वर्धा नदीवरून देवळी शहराला पाणी पुरवठा करणाºया योजनेला भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना खासदार तडस बोलत होते.कडक उन्हाळ्याच्या दिवसात देवळीत पाणीबाणी असून कधी दिवसाआड तर कधी दर दोन दिवसांनी नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. सार्वजनिक विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहे. विंधन विहिरींचे पाणी खोल गेल्याने त्या सुद्धा अखेरच्या घटका मोजत आहे. अशा परिस्थितीत शहरात पाणी पुरवठा करणाºया ३४ कोटी खर्चाच्या योजनेचे काम पुढे जात नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. या योजनेत समाविष्ट असलेली काही महत्वाची कामे गेल्या सहा वर्षांपासून थंडबस्त्यात आहे.अंदोरी गावातून वर्धा नदी पात्रातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीपर्यंत रस्त्याचे बांधकाम न केल्याने पावसाळ्याचे दिवसात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठ्याचे ठिकाणी एक्सप्रेस फीडर बसविले नसल्याने कधीकाळी लाईन गेल्यानंतर संपूर्ण पाणी पुरवठा ठप्प पडत आहे. शहरातील मधुसूदन ले आऊट येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. परंतु ले आऊट मध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्यात न आल्याने तसेच या परिसरातील चार पदरी रस्त्याचे बांधकाम ही पाईपलाईनच्या कामात अडकल्याने अडचण निर्माण झाली आहे. शहरातील ले आऊटमध्ये जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु जीवन प्राधिकरणाने वर्षभरापासून घरगुती नळजोडणी न दिल्याने येथील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. शहरातील अंतर्गत पाईप लाईन अजून टाकावयाची आहे.ठरलेल्या अटीनुसार योजनेचे काम सन २०१५ पर्यंत पूर्णत्वास न्यावयाचे होते. मात्र या कालावधीत काम पूर्ण न झाल्यामुळे योजनेला सन २०१८ पर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. असे असले तरी अद्यापही योजनेचे बहुतांश काम थंडबस्त्यात आहे. योजनेनुसार प्रत्येक घरी वॉटर मीटर बसवून २४ तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होते. परंतु योजनेचा संबंधीत ठेकेदार व जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या नियोजन शून्यतेमुळे ही योजना शेवटच्या टप्प्यात रखडली आहे. योजनेला वेळ झाल्याने यावरचा खर्च सुद्धा वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. निधीची व्यवस्था करतो पण कामात कुचराई चालणार नाही असा दम खासदार तडस यांनी अधिकाºयांना दिला. यावेळी नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती नंदु वैद्य, उपविभागीय अभियंता मदनकर, अंकुश जाधव, उल्हास राठोड आदी उपस्थित होते.अठरा कोटींची गरज दीड कोटीच मिळालेनिधीची अडचणी असल्याने योजनेचे काम खोळंबले असल्याचे जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ यांनी सांगितले. यासाठी ३ कोटीची मागणी केली असता फक्त दीड कोटी देण्यात आले.ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी अजून १८ कोटीची आवश्यकता असल्याचे एकट्या एक्स्प्रेस फीडरचा खर्च दीड कोटीच्या घरात असल्याने कार्यकारी अभियंता वाघ यांनी खासदार तडस यांना सांगितले.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई