शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

देवळीची पाणीपुरवठा योजना अजूनही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:58 IST

शहराला पाणीपुरवठा करणारी ३४ कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मागील सहा वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने खासदार रामदास तडस यांनी नाराजी व्यक्त केली. आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन नांदेड या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस यांनी केली.

ठळक मुद्देप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शहराला पाणीपुरवठा करणारी ३४ कोटी खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना मागील सहा वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने खासदार रामदास तडस यांनी नाराजी व्यक्त केली. आर.जी. सानप कन्स्ट्रक्शन नांदेड या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस यांनी केली. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता या सर्व प्रकाराला कारणीभूत असल्याने त्यांना वेळीच सुधारण्याचा दम देण्यात आला. अंदोरी येथील वर्धा नदीवरून देवळी शहराला पाणी पुरवठा करणाºया योजनेला भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना खासदार तडस बोलत होते.कडक उन्हाळ्याच्या दिवसात देवळीत पाणीबाणी असून कधी दिवसाआड तर कधी दर दोन दिवसांनी नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. सार्वजनिक विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहे. विंधन विहिरींचे पाणी खोल गेल्याने त्या सुद्धा अखेरच्या घटका मोजत आहे. अशा परिस्थितीत शहरात पाणी पुरवठा करणाºया ३४ कोटी खर्चाच्या योजनेचे काम पुढे जात नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. या योजनेत समाविष्ट असलेली काही महत्वाची कामे गेल्या सहा वर्षांपासून थंडबस्त्यात आहे.अंदोरी गावातून वर्धा नदी पात्रातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीपर्यंत रस्त्याचे बांधकाम न केल्याने पावसाळ्याचे दिवसात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठ्याचे ठिकाणी एक्सप्रेस फीडर बसविले नसल्याने कधीकाळी लाईन गेल्यानंतर संपूर्ण पाणी पुरवठा ठप्प पडत आहे. शहरातील मधुसूदन ले आऊट येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. परंतु ले आऊट मध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्यात न आल्याने तसेच या परिसरातील चार पदरी रस्त्याचे बांधकाम ही पाईपलाईनच्या कामात अडकल्याने अडचण निर्माण झाली आहे. शहरातील ले आऊटमध्ये जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु जीवन प्राधिकरणाने वर्षभरापासून घरगुती नळजोडणी न दिल्याने येथील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. शहरातील अंतर्गत पाईप लाईन अजून टाकावयाची आहे.ठरलेल्या अटीनुसार योजनेचे काम सन २०१५ पर्यंत पूर्णत्वास न्यावयाचे होते. मात्र या कालावधीत काम पूर्ण न झाल्यामुळे योजनेला सन २०१८ पर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. असे असले तरी अद्यापही योजनेचे बहुतांश काम थंडबस्त्यात आहे. योजनेनुसार प्रत्येक घरी वॉटर मीटर बसवून २४ तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होते. परंतु योजनेचा संबंधीत ठेकेदार व जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या नियोजन शून्यतेमुळे ही योजना शेवटच्या टप्प्यात रखडली आहे. योजनेला वेळ झाल्याने यावरचा खर्च सुद्धा वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. निधीची व्यवस्था करतो पण कामात कुचराई चालणार नाही असा दम खासदार तडस यांनी अधिकाºयांना दिला. यावेळी नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती नंदु वैद्य, उपविभागीय अभियंता मदनकर, अंकुश जाधव, उल्हास राठोड आदी उपस्थित होते.अठरा कोटींची गरज दीड कोटीच मिळालेनिधीची अडचणी असल्याने योजनेचे काम खोळंबले असल्याचे जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ यांनी सांगितले. यासाठी ३ कोटीची मागणी केली असता फक्त दीड कोटी देण्यात आले.ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी अजून १८ कोटीची आवश्यकता असल्याचे एकट्या एक्स्प्रेस फीडरचा खर्च दीड कोटीच्या घरात असल्याने कार्यकारी अभियंता वाघ यांनी खासदार तडस यांना सांगितले.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई