शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अन् गणपतीला निरोप देत शेतकऱ्यानेही घेतला जगाचा निरोप

By चैतन्य जोशी | Updated: September 10, 2022 16:17 IST

अंबोडा येथील घटनेने खळबळ : देवळी पोलिसांनी घेतली नोंद    

वर्धा : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरुन अनेक उपाययोजना सुरु आहेत. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अशीच एक घटना देवळी तालुक्यातील अंबोडा गावात शुक्रवारी ९ रोजी घडली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याने गणपती विसर्जनानंतर स्वत:ही जगाचा निरोप घेतला. या घटनेने अंबोडा गावात एकच खळबळ उडाली. 

गुणवंता अजाब मडावी (६०) रा. अंबोडा असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. गुणवंताकडे दोन एकर शेत आहे. मात्र, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे तो नेहमी विवंचनेत राहत होता. कर्जाची रक्कम फेडावी तरी कशी हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे गुणवंता त्रस्त होता.

शुक्रवारी लहान भाऊ रमेश मडावी याच्याकडील गणपती विसर्जन असल्याने सर्व कुटुंबीय सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका शेतातील शेततळ्यावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. लगतच गुणवंताचे शेत असल्याने तो शेतात होता. बाप्पाला निरोप देऊन सर्व कुटुंबिय घरी परतले. मात्र, गुणवंताने बाप्पाच्या विसर्जनानंतर त्याच शेततळ्यात उडी घेत जगाचा निरोप घेतला. शनिवारी १० रोजी सकाळच्या सुमारास गुणवंताचा मृतदेह तळ्याबाहेर काढण्यात आला. देवळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. चार दिवसांपूर्वी दिली होती नोटीस 

मृतक गुणवंता याच्यावर गिरोली येथील स्टेट बॅंकेचे कृषी कर्ज होते. चार दिवसांपूर्वीच बॅंकेतील कर्मचारी गुणवंताच्या घरी आले होते. त्यांनी नोटीसही बजावली होती. तेव्हापासूनच गुणवंता विवंचनेत होता. त्याच विवंचनेतून त्याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. आकस्मिक मृत्यूची नोंद 

गुणवंता मडावी याच्यावर कृषी कर्ज होते. याच विवंचनेतून त्याने आत्महत्या केली. ९ रोजी दुपारपासून मृतदेह तळ्याबाहेर काढण्याचे काम सुरु होते.  पोलीस अधीक्षक कार्यालयातील रेस्क्यू पथकही बोलाविण्यात आले होते. अखेर १० रोजी सकाळी गुणवंताचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्जagricultureशेती