‘व्यसनाला बदनाम करा’ मोहीम
By Admin | Updated: January 3, 2015 23:08 IST2015-01-03T23:08:34+5:302015-01-03T23:08:34+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चला व्यसनाला बदनाम करू या ! ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. वर्धा जिल्हा शाखेतर्फे ही मोहीम राबवून समारोपीय कार्यक्रम जय महाकाली शिक्षण

‘व्यसनाला बदनाम करा’ मोहीम
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चला व्यसनाला बदनाम करू या ! ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. वर्धा जिल्हा शाखेतर्फे ही मोहीम राबवून समारोपीय कार्यक्रम जय महाकाली शिक्षण संस्थेच्या सभागृहात घेण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजकिशोर तुगनायत, प्रा. अमर भोयर, गजेंद्र सुरकार उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुरकार म्हणाले, व्यसन करणे आणि अंधश्रद्धा असणे या दोन्ही बाबी सारख्याच आहे. कारण दोन्ही वेळी माणूस आपला विवेक विसरतो. ज्या प्रमाणे अंधश्रद्धा आपला श्रम, वेळ, पैसा यांचा अपव्यय करते त्याचप्रमाणे व्यसन केल्यानेही श्रम, वेळ, पैसा यांचा अपव्यय होत असतो. व्यसन करताना व्यक्ती काहीही विचार न करता दारू, गांजा, ड्रग, तंबाखू, बिडी, सिगारेड व अन्य व्यसन करतो., तो त्याच्या आधीन झाला हे कळत असूनही त्यापासून तो दूर राहू शकत नाही. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारा माणूस किमान १८ लाख रुपयांपर्यंत तर दारू पिणारा ४८ लाखपर्यंत रुपये आपल्या संपूर्ण जीवनात खर्च करतो.
कॅन्सर, लिव्हर खराब होणे, रक्तदाब, हृदयविकार असे अनेक दुर्धर आजार होतात. कुटुंब रस्त्यावर येते. खोटे बोलण्यापासून तर खून, बलात्कार, अपघात, घडतात. असे असतानाही व्यसनाला तरूणांमध्ये मध्ये प्रतिष्ठा लाभत आहे. सिगारेड, दारू पिणे हे मोठ्या व्यक्तीचे लक्षण समजल्या जात आहे. सरकारही दारू पिण्याचे धोरण राबवत आहे. त्यामुळे तरूण दारूडे होत असल्याचे सुरकआर म्हणाले. प्राचार्य राजकिशोर तुगनायत म्हणाले, ३१ डिसेंबर हा भारतीयांनी नवीन वर्ष साजरा करताना दारू पिऊन करावा ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे तरूणांनी ३१ डिसेंबर ऐवजी गुडीपाडवा साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक विशाल हुलके यांनी तर आभार दीपक बारापात्रे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)