शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

दहा महिन्यात १५७ रुग्णांना डेंग्यूचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:01 IST

जिल्ह्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १५७ च्यावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त असल्याने जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्दे१० रुग्ण दगावले : इतर जिल्ह्यात उपचार घेणारे रुग्ण अधिक

गौरव देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : जिल्ह्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १५७ च्यावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त असल्याने जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.मागील वर्षी ९३ डेंग्यू रक्तजल नमुने घेण्यात आले होते. यात केवळ ९ जणांनाच डेंग्यूची लागण झाल्याने पुढे आले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर यावर्षात जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यांत ७५९ डेंग्य रक्तजल नमुने घेण्यात आले. यात १५७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले. १५७ डेंग्यू रुग्णामधील १० रुग्ण दगावल्याचे पुढे आले आहे. यातील ५ रुग्ण डेंग्यूने दगावल्याचे स्पष्ट झाले असून ५ डेंग्यू रुग्णांच्या मृत्यूबाबत डॉक्टराच्या समितीने अद्यापही कारण स्पष्ट केलेले नाही. सध्या समितीच्या बैठकीची प्रतीक्षा आहे.स्क्रब टायफसच्या रुग्णांतही वाढवातावरणातील बदलामुळे यावर्षी किटकजन्य आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. त्यामुळे स्क्रब टायफस सारख्या नवीन आजारालाही समोरे जावे लागले. शासकीय आकडेवारीनुसार स्क्रब टायफससदर्भात १० रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठविले असता एकाला स्क्रब टायफस झाल्याची निष्पन्न झाले. विशेषत: या आजाराच्या रुग्णांनी शक्यतोवर खाजगी किंवा जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेतल्याने त्याची नोंद नसल्याचे सांगितले जाते.मलेरियाचे रुग्ण घटलेमागील वर्षात मलेरिया तपासणीमध्ये ३ लाख ३५ हजार ७६० तपासणी करण्यात आली होती. त्यात अनेक रुग्ण हे मलेरियाचे आढळले होते. मात्र, या वर्षात २ लाख ८१ हजार ७६१ तपासणी करण्यात आली. त्यात मलेरियाचे फक्त ६ रुग्ण आढळून आले आहेत. किटकजन्य आजार टाळण्यासाठी दक्षता गरजेची आहे.बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्हसध्या हागणदारी मुक्त गाव व स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ व निर्मल करण्याचे हाती घेतले असले तरी ग्रामपंचायत उदासीन धोरणाने योजनेचे तीन तेरा वाजत असून नागरिकांना डेंग्यु, मलेरिया, स्क्रब टायफस सारख्या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. असे आजार नागरिकांना होऊ नये यासाठी प्रत्येक गाव व परिसरासाठी बहुउद्देशिय आरोग्य कर्मचाºयांची नेमणूक केलेली असली तरी यावर प्रतिबंध लागलेला नाही. प्रत्येक गावाची पाहणी करून अहवाल शासनदरबारी ठेवण्याचे काम बहुउद्देशिय आरोग्य कर्मचाºयांचे आहे. त्यानंतर संबंधीत अधिकारी हे त्या गावातील ग्रामपंचायतीला नोटीस देऊन सुधारणा करण्याचे आदेश देतात. परंतु बहुउद्देशिय कर्मचारी अहवाल जागेवर बसून तर लिहित नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वापराच्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळल्यास टाकी खाली करावी व पुसून कोरडे करून स्वच्छ करून वाळू द्यावी, त्यानंतर पाणी भरावे सोबतच परिसरही स्वच्छ ठेवावा. सर्वांनी स्वत:ची व परिसराची काळजी घेतल्यास आरोग्यावर परिणाम होणार नाही.- एस. डी. काळसर्पे, आरोग्य पर्यवेक्षक,वर्धा.

टॅग्स :dengueडेंग्यू