शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:14 IST

वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. प्रशासनाकडून सर्र्वेक्षण करीत तुटपुंजी मदत देत तोंडाला पाने पुसल्या जातात. त्यामुळे शेतकºयांना जगणेही कठीण होते.

ठळक मुद्देत्रस्त शेतकऱ्यांची सभा : विविध प्रश्नांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कखरांगणा : वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. प्रशासनाकडून सर्र्वेक्षण करीत तुटपुंजी मदत देत तोंडाला पाने पुसल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना जगणेही कठीण होते. या अनुषंगााने वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासह मदतीत वाढ करावी, अशी मागणी वन्यप्राण्यांच्या उपद्र्रवाने त्रस्त गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.आर्वी तालुक्यातील पुनर्वसीत महाकाळी मंदिरात वन्यप्राण्यांमुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांची सभा पार पडली. यावेळी माजी आमदार दादाराव केचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हरिदास पाटील, राजू राठी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. वंजारी, पंचायत समिती सदस्य नितीन अरबट आदी उपस्थित होते. सभेत वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विविध समस्यांबाबतही चर्चा केली. सातत्याने होणाऱ्या नुकसानीबाबत शासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. तसेच तत्काळ दखल घेत उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णयही यावेळी शेतकºयांनी जाहीर केला आहे. शेतकरी आणि शेती समस्येवर आधारीत या सभेला आर्वी तालुक्यातील माळेगाव (ठेका), बोरगाव (गोंडी), सुसुंद, सुसुंद (हेटी), सहेली, लादगड, मासोद, महाकाळी, काचनूर, दहेगाव (गोंडी), खरांगणा, मोरांगणा येथील शेतकरी उपस्थित होते. आता शेतकºयांच्या होणाºया नुकसानीबाबत काय निर्णय होते याकडे लक्ष लागले आहे.पत्रव्यवहारानंतरही उपाययोजनांकडे दुर्लक्षया प्रश्नाबाबत २००५-०६ पासून २०१८ पर्यंत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. नागपूर अधिवेशनात तारांकीत प्रश्नही उपस्थित करण्यात आला. पण, त्यावर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिपत्रकानुसार अत्यल्प नुकसानभरपाई मिळते. हातातोंडाशी आलेल्या पिकांचा वन्यप्राणी फडशा पाडतात. जनावरेही फस्त करीत असल्याने शेतकरी डबघाईस आले आहेत. आता तर जागलीला जाणाऱ्या शेतकऱ्यांचेही जीव जायला लागले आहे. वन्यप्राण्यांमुळे दिवसा कष्ट आणि रात्री जागली अशीच दिनचर्चा सुरु आहे. याबाबत विभागाकडे पत्रव्यवहार करूनही उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकºयांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे.शासनाने कुंपण अथवा ९० टक्के अनुदान द्यावेसभेमध्ये वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत चर्चा करीत यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची माण्गाी शासन दरबारी मांडण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सरकारने जंगलव्याप्त भागाला जाळीचे कुंपण करावे किंवा शेतकऱ्यांना शेताकरिता ९० टक्के अनुदान आणि दहा टक्के बँक कर्जावर शेतकरी सहभाग करावा, अशी मागणी करण्यात आली..शासनानेच शेती ठेका पद्धतीने घ्यावीशेतकरी डबघाईस आल्याने शासनानेच शेती ठेका पद्धतीने घ्यावी. पिकांच्या मोबदल्यात कोरडवाहू क्षेत्राकरिता एकरी २५ हजार, ओलित क्षेत्राकरिता ५० हजार रुपयांप्रमाणे दरवर्षी ठेका देण्याची तरतूद करण्याची मागणी सभेत प्रकर्षाने पुढे आली. यावर निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा सभेमध्ये देण्यात आला.