सीईओंच्या बदलीची मागणी

By Admin | Updated: February 21, 2016 01:29 IST2016-02-21T01:29:02+5:302016-02-21T01:29:02+5:30

शहरालगतच्या अकरा ग्रा. पं. मधील बांधकामाच्या मुद्यावरून एका तक्रारीवरून सावंगी (मेघे) येथील ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

Demand for transfer of CEOs | सीईओंच्या बदलीची मागणी

सीईओंच्या बदलीची मागणी

मुख्यमंत्र्यांना निवेदन : ग्रामसेवक युनियनचे साकडे
वर्धा : शहरालगतच्या अकरा ग्रा. पं. मधील बांधकामाच्या मुद्यावरून एका तक्रारीवरून सावंगी (मेघे) येथील ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांत सेवेबाबत असुरक्षितता निर्माण झाली. दाखल गुन्हे रद्द करावे, या मागणीकरिता जि.प. सीईओ संजय मीणा यांची तात्काळ बदली करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वर्धाच्या वतीने करण्यात आली.
वर्धा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतमधील बांधकाम परवानगीसंदर्भात २०११ पूर्वी मंजुरी दिलेल्या प्रकरणाबाबत नियुक्ती प्राधिकरणची परवानगी घेणे आवश्यक होते. ती न घेता खासगी व्यक्तीकडून सावंगी ग्रा. पं. येथील २०१० ते २०१५ या कालावधीतील कार्यरत सरपंच व सचिव यांच्यावर गुन्हे नोंदविले आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी सीईओ संजय मीणा यांच्याकडून गत महिन्यापासून सुरू आहे. पण चौकशी पूर्ण झालेली नसतानाही अकराही ग्रामपंचायती विरूद्ध गुन्हे नोंदविण्याचे सत्र सुरूच आहे. या संदर्भात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची मीणा यांच्या दालनात सुनावणीदरम्यान ग्रामसेवक व अधिकारी यांना मते मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे मीणा यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)

सेलू पं. स. समोर आंदोलन
सेलू : स्थानिक पंचायत समिती समोर सुरू असलेल्या आंदोलनात आंदोलनात विलास नव्हाळे, राजू नागपूरकर, आदिनाथ डमाळे, मनोज माहुरे, गणेश उमाटे, सिर्सीकर, वैरागडे, सपकाळ, कोंटबकर, चिचमलतपुरे, सडमाके, कीर्ती राऊत, डोंगर, श्रीवास्तव, राठोड, के. जे. चव्हाण, विनोद करपाते, लंगडे, गावंडे, शहारे, दासलवार, लोखंडे, गुजरकर, पुसनायके आदीं ग्रामासेवक आंदोलनाला बसले आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Demand for transfer of CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.