शहरं
Join us  
Trending Stories
1
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
2
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
3
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
4
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
5
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
6
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
7
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
8
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
9
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
10
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
11
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
12
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
13
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
14
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
15
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
16
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
17
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
18
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
19
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी-रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी पाच वर्षांपासून प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:40 IST

Wardha : नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे आर्वी रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील आगाराला नवीन दहा 'लालपरी' बस मिळाल्या आहेत. त्यामुळे भाविक भक्तांचा ओढा दर्शनासाठी तसेच पर्यटक व प्रवाशांचीही गर्दी वाढली आहे. यामुळे आर्वी - रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी पर्यटक प्रवासी व भाविकांनी केली आहे.

आर्वी ते नागपूर बससेवा उपलब्ध आहे. रामटेक, खिंडसी, कामठी आदी इतर ठिकाणी जायचे असल्यास नागपूर येथे उतरावे लागते. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक ज्येष्ठ महिला तसेच पर्यटक प्रवासी यांना त्रास सहन करावा लागतो. ही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी मित्र यांनी केली होती. परंतु, ही मागणी पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. बसेस नसल्याचा कांगावा करण्यात आला होता. मात्र, आता नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे आर्वी रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे याची दखल घेत बससेवा सुरु करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. याकडे विभाग नियंत्रकांनी लक्ष देत तत्काळ बससेवा करण्याची नितांत गरज आहे. 

रामटेक भाविकांचे श्रद्धास्थानरामटेक हे निसर्गरम्य प्रदेशात वसलेले अप्रतिम स्थान आहे. विदर्भातील हिंदू धर्मीयांचे पवित्र धार्मिक स्थळ असून, पुराणकथा इतिहास व निसर्ग यांचा अद्वितीय संगम घडवते. रामटेक टेकडीवर भगवान राम यांचे मंदिर आहे. वनवासत असताना श्रीराम या टेकडीवर वास्तव्यास होते. त्यानंतर प्रभू श्रीराम यांनी येथे दोनदा भेट दिल्याचा उल्लेख आहे. रामटेक गड मंदिरासाठी आणि मेघदूत लिहिणाऱ्या कालिदास यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय रमणीय असे खिंडसी तलाव हा पर्यटकांचे आकर्षक आहे. जलक्रीडा व बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आर्वी- रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या बाबीकडे खासदार, दोन्ही आमदार व परिवहन महामंडळाने लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटक प्रवासी व भाविकांची आहे.

"आम्ही प्रवासी मित्रांनी आर्वी-रामटेक बससेवा सुरू करण्यासाठी अनेकदा निवेदन दिले. त्यामुळे भाविक भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी आर्वी-रामटेक बससेवा सुरू करावी, अशी आमची मागणी आहे."- सुरेश मोटवानी, प्रवासी मित्र

"कुटुंबासाठी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सहलीला नेण्यासाठी रामटेक, खिंडसी हे अतिशय चांगले ठिकाण आहे. आर्वीवरून त्यासाठी आर्वी-रामटेक बससेवा उपलब्ध करून देण्यात यावी. बसफेरी नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे."- मनोज राऊत, प्राचार्य विस्डन कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी

टॅग्स :wardha-acवर्धा