शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

आर्वी-रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी पाच वर्षांपासून प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:40 IST

Wardha : नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे आर्वी रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील आगाराला नवीन दहा 'लालपरी' बस मिळाल्या आहेत. त्यामुळे भाविक भक्तांचा ओढा दर्शनासाठी तसेच पर्यटक व प्रवाशांचीही गर्दी वाढली आहे. यामुळे आर्वी - रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी पर्यटक प्रवासी व भाविकांनी केली आहे.

आर्वी ते नागपूर बससेवा उपलब्ध आहे. रामटेक, खिंडसी, कामठी आदी इतर ठिकाणी जायचे असल्यास नागपूर येथे उतरावे लागते. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक ज्येष्ठ महिला तसेच पर्यटक प्रवासी यांना त्रास सहन करावा लागतो. ही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी मित्र यांनी केली होती. परंतु, ही मागणी पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. बसेस नसल्याचा कांगावा करण्यात आला होता. मात्र, आता नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे आर्वी रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे याची दखल घेत बससेवा सुरु करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. याकडे विभाग नियंत्रकांनी लक्ष देत तत्काळ बससेवा करण्याची नितांत गरज आहे. 

रामटेक भाविकांचे श्रद्धास्थानरामटेक हे निसर्गरम्य प्रदेशात वसलेले अप्रतिम स्थान आहे. विदर्भातील हिंदू धर्मीयांचे पवित्र धार्मिक स्थळ असून, पुराणकथा इतिहास व निसर्ग यांचा अद्वितीय संगम घडवते. रामटेक टेकडीवर भगवान राम यांचे मंदिर आहे. वनवासत असताना श्रीराम या टेकडीवर वास्तव्यास होते. त्यानंतर प्रभू श्रीराम यांनी येथे दोनदा भेट दिल्याचा उल्लेख आहे. रामटेक गड मंदिरासाठी आणि मेघदूत लिहिणाऱ्या कालिदास यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय रमणीय असे खिंडसी तलाव हा पर्यटकांचे आकर्षक आहे. जलक्रीडा व बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आर्वी- रामटेक बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या बाबीकडे खासदार, दोन्ही आमदार व परिवहन महामंडळाने लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटक प्रवासी व भाविकांची आहे.

"आम्ही प्रवासी मित्रांनी आर्वी-रामटेक बससेवा सुरू करण्यासाठी अनेकदा निवेदन दिले. त्यामुळे भाविक भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी आर्वी-रामटेक बससेवा सुरू करावी, अशी आमची मागणी आहे."- सुरेश मोटवानी, प्रवासी मित्र

"कुटुंबासाठी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सहलीला नेण्यासाठी रामटेक, खिंडसी हे अतिशय चांगले ठिकाण आहे. आर्वीवरून त्यासाठी आर्वी-रामटेक बससेवा उपलब्ध करून देण्यात यावी. बसफेरी नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे."- मनोज राऊत, प्राचार्य विस्डन कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी

टॅग्स :wardha-acवर्धा