शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:38 IST

Wardha: ११ नोव्हेंबर पासुन सीसीसआय खरेदी केंद्र सुरू झाले होते

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यातील सीसीआय कापूस केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीसीआय खरेदी केंद्र सुरू करा, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

हंगाम २०२४-२५ करिता आधारभूत दराने सीसीआयमार्फत कापसाची खरेदी ११ नोव्हेंबरपासून सुरु झाली. सीसीआयद्वारे सुरुवातीला जास्तीत जास्त ७ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटल या दराने कापसाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर सीसीआयने २३ डिसेंबरपासून कापसाच्या दरात बदल करून बीपी एसपीएल या ग्रेड अंतर्गत जास्तीत जास्त ७ हजार ४७१ रुपये प्रतिक्विंटल या दराने कापसाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सीसीआयद्वारे ६ जानेवारी २०२५ ला कापसाच्या दरात बदल करून एच४-एमओडी या ग्रेड अंतर्गत जास्तीत जास्त ७ हजार ४२१ प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी सुरू होती. परंतु, मध्यंतरी जिनिंगमधील जागेअभावी ३ ते ७फेब्रुवारी २०२५ पर्यंत कापसाची खरेदी बंद ठेवण्यात आली होती. अशातच १० फेब्रुवारी रोजी कापसाची खरेदी सुरू करण्यात आली. परंतु, तांत्रिक कारण देत आजपर्यंत खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व एपीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ सीसीआयची आधारभूत दराने कापूस खरेदी सुरू करण्याबाबत निवेदन दिले.

जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास पाठविले निवेदनहिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केसरीचंद खंगारे, समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिंमत चतुर, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिश वडतकर, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप शिंदे व विलासराव मेघे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

२० लाख ६१ हजार क्विंटल कापसाची झालीय खरेदीहंगाम २०२४-२५ मध्ये वर्धा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १९ फेब्रुवारी ते आजपर्यंत २० लाख ६१ हजार ७८ क्विंटलएवढी कापसाची खरेदी झाली. त्यामध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून १३ लाख ८३ हजार ३५ क्विंटल कापूस खरेदी झाली असून केवळ ६ लाख ७८ हजार ४३ क्विंटल कापूस सीसीआयमार्फत खरेदी करण्यात आला आहे. खुल्या बाजारातील कापसाचे दर आधारभूत दरापेक्षा ३०० ते ४०० रुपयांनी कमी आहेत. तसेच वाढत असलेले तापमान लक्षात घेता अधिक काळ शेतमाल घरी साठवणूक करून ठेवण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नाही. मोठ्या प्रमाणात आजही शेतकऱ्यांनी भाव वाढतील, या उद्देशाने कापसाची विक्री केलेली नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर सीसीआय कापुस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धा