शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:38 IST

Wardha: ११ नोव्हेंबर पासुन सीसीसआय खरेदी केंद्र सुरू झाले होते

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यातील सीसीआय कापूस केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीसीआय खरेदी केंद्र सुरू करा, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

हंगाम २०२४-२५ करिता आधारभूत दराने सीसीआयमार्फत कापसाची खरेदी ११ नोव्हेंबरपासून सुरु झाली. सीसीआयद्वारे सुरुवातीला जास्तीत जास्त ७ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटल या दराने कापसाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर सीसीआयने २३ डिसेंबरपासून कापसाच्या दरात बदल करून बीपी एसपीएल या ग्रेड अंतर्गत जास्तीत जास्त ७ हजार ४७१ रुपये प्रतिक्विंटल या दराने कापसाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सीसीआयद्वारे ६ जानेवारी २०२५ ला कापसाच्या दरात बदल करून एच४-एमओडी या ग्रेड अंतर्गत जास्तीत जास्त ७ हजार ४२१ प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी सुरू होती. परंतु, मध्यंतरी जिनिंगमधील जागेअभावी ३ ते ७फेब्रुवारी २०२५ पर्यंत कापसाची खरेदी बंद ठेवण्यात आली होती. अशातच १० फेब्रुवारी रोजी कापसाची खरेदी सुरू करण्यात आली. परंतु, तांत्रिक कारण देत आजपर्यंत खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व एपीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ सीसीआयची आधारभूत दराने कापूस खरेदी सुरू करण्याबाबत निवेदन दिले.

जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास पाठविले निवेदनहिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केसरीचंद खंगारे, समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिंमत चतुर, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिश वडतकर, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप शिंदे व विलासराव मेघे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

२० लाख ६१ हजार क्विंटल कापसाची झालीय खरेदीहंगाम २०२४-२५ मध्ये वर्धा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १९ फेब्रुवारी ते आजपर्यंत २० लाख ६१ हजार ७८ क्विंटलएवढी कापसाची खरेदी झाली. त्यामध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून १३ लाख ८३ हजार ३५ क्विंटल कापूस खरेदी झाली असून केवळ ६ लाख ७८ हजार ४३ क्विंटल कापूस सीसीआयमार्फत खरेदी करण्यात आला आहे. खुल्या बाजारातील कापसाचे दर आधारभूत दरापेक्षा ३०० ते ४०० रुपयांनी कमी आहेत. तसेच वाढत असलेले तापमान लक्षात घेता अधिक काळ शेतमाल घरी साठवणूक करून ठेवण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नाही. मोठ्या प्रमाणात आजही शेतकऱ्यांनी भाव वाढतील, या उद्देशाने कापसाची विक्री केलेली नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर सीसीआय कापुस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धा