शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:38 IST

Wardha: ११ नोव्हेंबर पासुन सीसीसआय खरेदी केंद्र सुरू झाले होते

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यातील सीसीआय कापूस केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीसीआय खरेदी केंद्र सुरू करा, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

हंगाम २०२४-२५ करिता आधारभूत दराने सीसीआयमार्फत कापसाची खरेदी ११ नोव्हेंबरपासून सुरु झाली. सीसीआयद्वारे सुरुवातीला जास्तीत जास्त ७ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटल या दराने कापसाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर सीसीआयने २३ डिसेंबरपासून कापसाच्या दरात बदल करून बीपी एसपीएल या ग्रेड अंतर्गत जास्तीत जास्त ७ हजार ४७१ रुपये प्रतिक्विंटल या दराने कापसाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सीसीआयद्वारे ६ जानेवारी २०२५ ला कापसाच्या दरात बदल करून एच४-एमओडी या ग्रेड अंतर्गत जास्तीत जास्त ७ हजार ४२१ प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी सुरू होती. परंतु, मध्यंतरी जिनिंगमधील जागेअभावी ३ ते ७फेब्रुवारी २०२५ पर्यंत कापसाची खरेदी बंद ठेवण्यात आली होती. अशातच १० फेब्रुवारी रोजी कापसाची खरेदी सुरू करण्यात आली. परंतु, तांत्रिक कारण देत आजपर्यंत खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व एपीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ सीसीआयची आधारभूत दराने कापूस खरेदी सुरू करण्याबाबत निवेदन दिले.

जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास पाठविले निवेदनहिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केसरीचंद खंगारे, समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिंमत चतुर, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिश वडतकर, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप शिंदे व विलासराव मेघे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

२० लाख ६१ हजार क्विंटल कापसाची झालीय खरेदीहंगाम २०२४-२५ मध्ये वर्धा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १९ फेब्रुवारी ते आजपर्यंत २० लाख ६१ हजार ७८ क्विंटलएवढी कापसाची खरेदी झाली. त्यामध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून १३ लाख ८३ हजार ३५ क्विंटल कापूस खरेदी झाली असून केवळ ६ लाख ७८ हजार ४३ क्विंटल कापूस सीसीआयमार्फत खरेदी करण्यात आला आहे. खुल्या बाजारातील कापसाचे दर आधारभूत दरापेक्षा ३०० ते ४०० रुपयांनी कमी आहेत. तसेच वाढत असलेले तापमान लक्षात घेता अधिक काळ शेतमाल घरी साठवणूक करून ठेवण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नाही. मोठ्या प्रमाणात आजही शेतकऱ्यांनी भाव वाढतील, या उद्देशाने कापसाची विक्री केलेली नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर सीसीआय कापुस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धा