शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

जागेच्या किमतीची मागणी: कराराची मुदत संपूनही कंपनीची मुजोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 18:39 IST

Wardha : ब्रिटिशांचा अजब दावा; शकुंतला तुमची असली तरी जागा आमची

फणींद्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्करोहणा : ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या स्वार्थासाठी सुरू केलेली नॅरोगेज शकुंतला रेल्वे गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. भारत सरकारने शकुंतलेला ब्रॉडगेजमध्ये बदलून सुरू करण्याच्या हालचाली सुरू करताच ब्रिटिश शासन काळात ज्या कंपनीशी १०० वर्षांचा करार होता, त्या कंपनीने आता जागेच्या मोबदल्याची मागणी केली. कराराची मुदत संपली असली, तरी कंपनीने शकुंतला तुमची असली तरी, त्या रेल्वे ज्या जागेवर आहे, त्या जागा आमच्या मालकीच्या असून त्याची किंमत दिल्याशिवाय तुम्ही रेल्वे सुरू करू शकत नाही, असा अफलातून दावा केल्याची माहिती आहे.

ब्रिटिश काळात विदर्भातील लांब धाग्यांचा कापूस मुंबई व तेथून मँचेस्टरला नेण्यासाठी विदर्भात यवतमाळ-मूर्तिजापूर, मूर्तिजापूर- अचलपूर आणि आर्वी ते पूलगावपर्यंत तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. त्या चालविण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्या देशातील क्लिक निक्सन अँड कंपनीशी १०० वर्षांचा करार केला होता.

कंपनीला रेल्वे लीजवर देण्यात आल्या होत्या. हा करार १९०३ मध्ये करण्यात आला होता. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर बरीच वर्षे भारत सरकारच्या रेल्वे विभागाने त्या सुरू ठेवल्या होत्या. मात्र, १९९९च्या दरम्यान काही कारणाने त्या बंद पडल्या होत्या. 

देशाचा पौराणिक वारसा म्हणून व वाहतुकीची गरज म्हणून या रेल्वे पुन्हा सुरू कराव्यात, असा रेटा वाढल्यानंतर शासनाने त्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यवतमाळ ते मूर्तिजापूर या शकुंतलेचे नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, क्लिक निक्सन अँड कंपनीने त्याला हरकर घेतली. या कंपनीचे नवीन नाव 'सेंट्रल प्रोईनान्सेस रेल्वे कंपनी' असे आहे.

या कंपनीने भारत सरकारकडे विदर्भातील सर्व नॅरोगेज शकुंतला रेल्वे तुमच्या असल्या, तरी त्या जागा आमच्या मालकीच्या आहेत, असा दावा ठोकला. ती कंपनी एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी या जागेचा मोबदला म्हणून एक हजार ८६५ कोटी रुपये कंपनीला द्यावे, असा दावा आंतरराष्ट्रीय लवादाकडे सादर केल्याची माहिती अहे.

सरकारने दबावाला बळी पडू नयेखरे पाहता, २००३ मध्येच कराराची १०० वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांचा करार संपला आहे. त्यामुळे आता त्या कंपनीची कोणतीच मालकी रेल्वे किवा साहित्यावर राहिली नाही. त्या जागा भारतात आहे. मात्र, सुंभ जळला; पण पीळ कायम' अशा चोराच्या उलट्या बोंबा कंपनी मारत आहे. मात्र, भारत सरकारने त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता तिन्ही शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून त्या सुरू कराव्या, अशी विदर्भात जनभावना आहे.

टॅग्स :railwayरेल्वेwardha-acवर्धा