शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जागेच्या किमतीची मागणी: कराराची मुदत संपूनही कंपनीची मुजोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 18:39 IST

Wardha : ब्रिटिशांचा अजब दावा; शकुंतला तुमची असली तरी जागा आमची

फणींद्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्करोहणा : ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या स्वार्थासाठी सुरू केलेली नॅरोगेज शकुंतला रेल्वे गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. भारत सरकारने शकुंतलेला ब्रॉडगेजमध्ये बदलून सुरू करण्याच्या हालचाली सुरू करताच ब्रिटिश शासन काळात ज्या कंपनीशी १०० वर्षांचा करार होता, त्या कंपनीने आता जागेच्या मोबदल्याची मागणी केली. कराराची मुदत संपली असली, तरी कंपनीने शकुंतला तुमची असली तरी, त्या रेल्वे ज्या जागेवर आहे, त्या जागा आमच्या मालकीच्या असून त्याची किंमत दिल्याशिवाय तुम्ही रेल्वे सुरू करू शकत नाही, असा अफलातून दावा केल्याची माहिती आहे.

ब्रिटिश काळात विदर्भातील लांब धाग्यांचा कापूस मुंबई व तेथून मँचेस्टरला नेण्यासाठी विदर्भात यवतमाळ-मूर्तिजापूर, मूर्तिजापूर- अचलपूर आणि आर्वी ते पूलगावपर्यंत तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. त्या चालविण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्या देशातील क्लिक निक्सन अँड कंपनीशी १०० वर्षांचा करार केला होता.

कंपनीला रेल्वे लीजवर देण्यात आल्या होत्या. हा करार १९०३ मध्ये करण्यात आला होता. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर बरीच वर्षे भारत सरकारच्या रेल्वे विभागाने त्या सुरू ठेवल्या होत्या. मात्र, १९९९च्या दरम्यान काही कारणाने त्या बंद पडल्या होत्या. 

देशाचा पौराणिक वारसा म्हणून व वाहतुकीची गरज म्हणून या रेल्वे पुन्हा सुरू कराव्यात, असा रेटा वाढल्यानंतर शासनाने त्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यवतमाळ ते मूर्तिजापूर या शकुंतलेचे नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, क्लिक निक्सन अँड कंपनीने त्याला हरकर घेतली. या कंपनीचे नवीन नाव 'सेंट्रल प्रोईनान्सेस रेल्वे कंपनी' असे आहे.

या कंपनीने भारत सरकारकडे विदर्भातील सर्व नॅरोगेज शकुंतला रेल्वे तुमच्या असल्या, तरी त्या जागा आमच्या मालकीच्या आहेत, असा दावा ठोकला. ती कंपनी एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी या जागेचा मोबदला म्हणून एक हजार ८६५ कोटी रुपये कंपनीला द्यावे, असा दावा आंतरराष्ट्रीय लवादाकडे सादर केल्याची माहिती अहे.

सरकारने दबावाला बळी पडू नयेखरे पाहता, २००३ मध्येच कराराची १०० वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांचा करार संपला आहे. त्यामुळे आता त्या कंपनीची कोणतीच मालकी रेल्वे किवा साहित्यावर राहिली नाही. त्या जागा भारतात आहे. मात्र, सुंभ जळला; पण पीळ कायम' अशा चोराच्या उलट्या बोंबा कंपनी मारत आहे. मात्र, भारत सरकारने त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता तिन्ही शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून त्या सुरू कराव्या, अशी विदर्भात जनभावना आहे.

टॅग्स :railwayरेल्वेwardha-acवर्धा