शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

जागेच्या किमतीची मागणी: कराराची मुदत संपूनही कंपनीची मुजोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 18:39 IST

Wardha : ब्रिटिशांचा अजब दावा; शकुंतला तुमची असली तरी जागा आमची

फणींद्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्करोहणा : ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या स्वार्थासाठी सुरू केलेली नॅरोगेज शकुंतला रेल्वे गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. भारत सरकारने शकुंतलेला ब्रॉडगेजमध्ये बदलून सुरू करण्याच्या हालचाली सुरू करताच ब्रिटिश शासन काळात ज्या कंपनीशी १०० वर्षांचा करार होता, त्या कंपनीने आता जागेच्या मोबदल्याची मागणी केली. कराराची मुदत संपली असली, तरी कंपनीने शकुंतला तुमची असली तरी, त्या रेल्वे ज्या जागेवर आहे, त्या जागा आमच्या मालकीच्या असून त्याची किंमत दिल्याशिवाय तुम्ही रेल्वे सुरू करू शकत नाही, असा अफलातून दावा केल्याची माहिती आहे.

ब्रिटिश काळात विदर्भातील लांब धाग्यांचा कापूस मुंबई व तेथून मँचेस्टरला नेण्यासाठी विदर्भात यवतमाळ-मूर्तिजापूर, मूर्तिजापूर- अचलपूर आणि आर्वी ते पूलगावपर्यंत तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. त्या चालविण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्या देशातील क्लिक निक्सन अँड कंपनीशी १०० वर्षांचा करार केला होता.

कंपनीला रेल्वे लीजवर देण्यात आल्या होत्या. हा करार १९०३ मध्ये करण्यात आला होता. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर बरीच वर्षे भारत सरकारच्या रेल्वे विभागाने त्या सुरू ठेवल्या होत्या. मात्र, १९९९च्या दरम्यान काही कारणाने त्या बंद पडल्या होत्या. 

देशाचा पौराणिक वारसा म्हणून व वाहतुकीची गरज म्हणून या रेल्वे पुन्हा सुरू कराव्यात, असा रेटा वाढल्यानंतर शासनाने त्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यवतमाळ ते मूर्तिजापूर या शकुंतलेचे नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, क्लिक निक्सन अँड कंपनीने त्याला हरकर घेतली. या कंपनीचे नवीन नाव 'सेंट्रल प्रोईनान्सेस रेल्वे कंपनी' असे आहे.

या कंपनीने भारत सरकारकडे विदर्भातील सर्व नॅरोगेज शकुंतला रेल्वे तुमच्या असल्या, तरी त्या जागा आमच्या मालकीच्या आहेत, असा दावा ठोकला. ती कंपनी एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी या जागेचा मोबदला म्हणून एक हजार ८६५ कोटी रुपये कंपनीला द्यावे, असा दावा आंतरराष्ट्रीय लवादाकडे सादर केल्याची माहिती अहे.

सरकारने दबावाला बळी पडू नयेखरे पाहता, २००३ मध्येच कराराची १०० वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांचा करार संपला आहे. त्यामुळे आता त्या कंपनीची कोणतीच मालकी रेल्वे किवा साहित्यावर राहिली नाही. त्या जागा भारतात आहे. मात्र, सुंभ जळला; पण पीळ कायम' अशा चोराच्या उलट्या बोंबा कंपनी मारत आहे. मात्र, भारत सरकारने त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता तिन्ही शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून त्या सुरू कराव्या, अशी विदर्भात जनभावना आहे.

टॅग्स :railwayरेल्वेwardha-acवर्धा