शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

साहित्य संमेलनाच्या फंड वसुलीची चर्चा जोरात; विद्रोहींकडे निधीचा दुष्काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:43 IST

संमेलनाच्या निधी वसुलीची जिल्हाभरात जोरदार चर्चा

वर्धा : ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी रोजी वर्ध्यात होऊ घातले आहे. या संमेलनाच्या निधी उभारणीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. समाजाच्या विविध घटकांतील सदस्यांकडून किमान २१०० रुपये निधी घेण्याबाबत आग्रही भूमिका समिती सदस्यांनी घेतली असल्याने सध्या संमेलनाच्या निधी वसुलीची चर्चा जिल्हाभरात जोरात आहे.

दुसरीकडे वर्ध्यातच ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विद्राेही साहित्य संमेलनाकडे निधीसह विविध सोयींचाही कमालीचा दुष्काळ दिसून येत आहे. वर्धेतील सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते दोन्ही साहित्य संमेलनांच्या आयोजकांशी जुळलेले असल्याने त्यांचीही आता मोठी गोची झाली आहे. कुणाकडे जावे, हा प्रश्न त्यांच्यासमोरही पडला आहे. राज्य शासनाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ५० लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. याशिवाय संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले माजी खा. दत्ता मेघे यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर निधी उभारणीत सहकार्य करण्यात आले आहे.

मेघे परिवाराच्या दातृत्वामुळे संमेलनाच्या कामालाही आतापर्यंत गती आली. राज्य सरकार आणखी निधी देण्याची शक्यता असून जिल्ह्यातील पाच आमदारांनी प्रत्येकी १० लाख रुपये निधीबाबत प्रशासनाला पत्रही दिले आहे. एवढा सर्व निधी असताना संमेलनाच्या ४२ आयोजन समित्यांच्या सदस्यांकडे पावती बुक देण्यात आले आहे. त्या माध्यमातूनही किमान २१०० रुपयांची पावती फाडण्याबाबत सूचना केल्या जात आहेत.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या तसेच खासगी शाळांच्या शिक्षकांकडूनही किमान ५०० रुपये गोळा करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. काही कंपन्यांनीही सामाजिक दायित्व निधीतून संमेलनाला आर्थिक मदत दिली आहे. या सर्व रकमेची गोळाबेरीज केल्यास संमेलनाच्या आयोजनातून मोठा आर्थिक निधी उभा होणार असे सध्या चित्र आहे. या वसुलीची जोरदार चर्चा साहित्य वर्तुळासह वर्धेकरांमध्ये आहे. ज्यांचा साहित्याशी संबंधही नाही, अशांकडूनही साहित्य संमेलनासाठी देणगी घेतली जात आहे.

विद्रोही संमेलनाकडे साऱ्यांचीच पाठ

विद्रोही साहित्य संमेलन ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी रामनगर, सर्कस ग्राऊंडवर होऊ घातले आहे. यासाठी राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून प्रतिनिधी येणार असले तरी त्यांच्या निवासासाठी जागेची टंचाई निर्माण झाली आहे. या संमेलनाला शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची वसुली जोरात असल्याने पुन्हा या संमेलनाला मदत कोण देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी अनेकांनी आयोजकांशी असलेले संबंध म्हणून फूल नाही तर फुलाची पाकळी अशी भूमिका स्वीकारत मदतीचा हात दिला, अशी माहिती आयोजकांपैकी काहींनी दिली.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धा