शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
3
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
4
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
5
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
6
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
7
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
8
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
10
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
11
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
12
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
13
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
14
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
16
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
17
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
18
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
19
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
20
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाच्या फंड वसुलीची चर्चा जोरात; विद्रोहींकडे निधीचा दुष्काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:43 IST

संमेलनाच्या निधी वसुलीची जिल्हाभरात जोरदार चर्चा

वर्धा : ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी रोजी वर्ध्यात होऊ घातले आहे. या संमेलनाच्या निधी उभारणीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. समाजाच्या विविध घटकांतील सदस्यांकडून किमान २१०० रुपये निधी घेण्याबाबत आग्रही भूमिका समिती सदस्यांनी घेतली असल्याने सध्या संमेलनाच्या निधी वसुलीची चर्चा जिल्हाभरात जोरात आहे.

दुसरीकडे वर्ध्यातच ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विद्राेही साहित्य संमेलनाकडे निधीसह विविध सोयींचाही कमालीचा दुष्काळ दिसून येत आहे. वर्धेतील सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते दोन्ही साहित्य संमेलनांच्या आयोजकांशी जुळलेले असल्याने त्यांचीही आता मोठी गोची झाली आहे. कुणाकडे जावे, हा प्रश्न त्यांच्यासमोरही पडला आहे. राज्य शासनाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ५० लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. याशिवाय संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले माजी खा. दत्ता मेघे यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर निधी उभारणीत सहकार्य करण्यात आले आहे.

मेघे परिवाराच्या दातृत्वामुळे संमेलनाच्या कामालाही आतापर्यंत गती आली. राज्य सरकार आणखी निधी देण्याची शक्यता असून जिल्ह्यातील पाच आमदारांनी प्रत्येकी १० लाख रुपये निधीबाबत प्रशासनाला पत्रही दिले आहे. एवढा सर्व निधी असताना संमेलनाच्या ४२ आयोजन समित्यांच्या सदस्यांकडे पावती बुक देण्यात आले आहे. त्या माध्यमातूनही किमान २१०० रुपयांची पावती फाडण्याबाबत सूचना केल्या जात आहेत.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या तसेच खासगी शाळांच्या शिक्षकांकडूनही किमान ५०० रुपये गोळा करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. काही कंपन्यांनीही सामाजिक दायित्व निधीतून संमेलनाला आर्थिक मदत दिली आहे. या सर्व रकमेची गोळाबेरीज केल्यास संमेलनाच्या आयोजनातून मोठा आर्थिक निधी उभा होणार असे सध्या चित्र आहे. या वसुलीची जोरदार चर्चा साहित्य वर्तुळासह वर्धेकरांमध्ये आहे. ज्यांचा साहित्याशी संबंधही नाही, अशांकडूनही साहित्य संमेलनासाठी देणगी घेतली जात आहे.

विद्रोही संमेलनाकडे साऱ्यांचीच पाठ

विद्रोही साहित्य संमेलन ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी रामनगर, सर्कस ग्राऊंडवर होऊ घातले आहे. यासाठी राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून प्रतिनिधी येणार असले तरी त्यांच्या निवासासाठी जागेची टंचाई निर्माण झाली आहे. या संमेलनाला शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची वसुली जोरात असल्याने पुन्हा या संमेलनाला मदत कोण देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी अनेकांनी आयोजकांशी असलेले संबंध म्हणून फूल नाही तर फुलाची पाकळी अशी भूमिका स्वीकारत मदतीचा हात दिला, अशी माहिती आयोजकांपैकी काहींनी दिली.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धा