शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सदोष पूल बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

सालोड क्षेत्रातील बाळापूर येथील कालव्यावरील पुलामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष मौक्यावर जाऊन पुलाची पाहणी करीत आमदार दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या. पुल बांधताना विभागाने दोन छोटे पाईप टाकले आहे.

ठळक मुद्देनिम्न वर्धा कालवा परिसर : आमदारांनी जाणली शेतकऱ्यांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सालोड- माळेगांव-वडद मार्गावर असलेल्या शेत जमिनीवरून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. परिसरातील नाल्यावरून कालवा गेल्याने निम्न वर्धा कालवे विभागाकडून पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु पुलाची निर्मिती सदोष असल्याने लगतच्या शेतकऱ्यांची शेतजमीन संकटात आली आहे.सालोड क्षेत्रातील बाळापूर येथील कालव्यावरील पुलामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष मौक्यावर जाऊन पुलाची पाहणी करीत आमदार दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या. पुल बांधताना विभागाने दोन छोटे पाईप टाकले आहे. नाल्याची खोली व रूंदी अधिक असल्याने या छोटया पाईप मधून पाण्याचा निचरा होताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. मुसळधार पावसामुळे पाण्यासोबतच काडी कचरा देखील वाहत आला. परंतु पाईप छोटे असल्याने हा कचरा पाईपच्या मुखाशी अडकल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात देखील पाणी जमा झाल्याने त्यांचे नुकसान झाले. गत वर्षी सुद्धा असाच प्रकार घडल्याने अंकुश झाडे यांचे प्रचंड नुकसान झाले होते. कालव्यावरील पुल सदोष असल्याने त्याची दुरूस्ती करून मोठे पाईप टाकण्यात यावे अथवा नव्याने पुल बांधण्यात यावा,अशी मागणी शेतकऱ्यांसह भागोदय पाणी वापर संस्था, बाळापूर कार्यकारी अभियंता निम्न वर्धा कालवे विभाग यांच्याकडे केली होती. यावर संबधित विभागाने पाणी जमा होणार नसल्याचे संबधितांना कळविले होते.परंतु पाणी अडल्याने पीडित शेतकºयांना आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह संबधित विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात शेतकऱ्यांनी व पाणी वाटप संस्थेने पाठपुरावा करून देखील संबधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार डॉ.पंकज भोयर यांना भेटी दरम्यान सांगितले.आमदार भोयर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन शेतकºयांच्या कैफियत ऐकून घेतली. याबाबत संबधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार भोयर यांनी दिले. यावेळी भाजपचे माजी तालुका प्रमुख आशिष कुचेवार,पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष मोतीराम टिपले, बालू सागरे ,मारोतराव वैतागे, संदीप झाडे, विनोद महाकाळकर, माणिक हजारे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी