शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

सदोष पूल बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

सालोड क्षेत्रातील बाळापूर येथील कालव्यावरील पुलामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष मौक्यावर जाऊन पुलाची पाहणी करीत आमदार दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या. पुल बांधताना विभागाने दोन छोटे पाईप टाकले आहे.

ठळक मुद्देनिम्न वर्धा कालवा परिसर : आमदारांनी जाणली शेतकऱ्यांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सालोड- माळेगांव-वडद मार्गावर असलेल्या शेत जमिनीवरून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. परिसरातील नाल्यावरून कालवा गेल्याने निम्न वर्धा कालवे विभागाकडून पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु पुलाची निर्मिती सदोष असल्याने लगतच्या शेतकऱ्यांची शेतजमीन संकटात आली आहे.सालोड क्षेत्रातील बाळापूर येथील कालव्यावरील पुलामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष मौक्यावर जाऊन पुलाची पाहणी करीत आमदार दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या. पुल बांधताना विभागाने दोन छोटे पाईप टाकले आहे. नाल्याची खोली व रूंदी अधिक असल्याने या छोटया पाईप मधून पाण्याचा निचरा होताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. मुसळधार पावसामुळे पाण्यासोबतच काडी कचरा देखील वाहत आला. परंतु पाईप छोटे असल्याने हा कचरा पाईपच्या मुखाशी अडकल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात देखील पाणी जमा झाल्याने त्यांचे नुकसान झाले. गत वर्षी सुद्धा असाच प्रकार घडल्याने अंकुश झाडे यांचे प्रचंड नुकसान झाले होते. कालव्यावरील पुल सदोष असल्याने त्याची दुरूस्ती करून मोठे पाईप टाकण्यात यावे अथवा नव्याने पुल बांधण्यात यावा,अशी मागणी शेतकऱ्यांसह भागोदय पाणी वापर संस्था, बाळापूर कार्यकारी अभियंता निम्न वर्धा कालवे विभाग यांच्याकडे केली होती. यावर संबधित विभागाने पाणी जमा होणार नसल्याचे संबधितांना कळविले होते.परंतु पाणी अडल्याने पीडित शेतकºयांना आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह संबधित विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात शेतकऱ्यांनी व पाणी वाटप संस्थेने पाठपुरावा करून देखील संबधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार डॉ.पंकज भोयर यांना भेटी दरम्यान सांगितले.आमदार भोयर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन शेतकºयांच्या कैफियत ऐकून घेतली. याबाबत संबधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार भोयर यांनी दिले. यावेळी भाजपचे माजी तालुका प्रमुख आशिष कुचेवार,पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष मोतीराम टिपले, बालू सागरे ,मारोतराव वैतागे, संदीप झाडे, विनोद महाकाळकर, माणिक हजारे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी