शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सायबर ठाण्याच्या कार्याची घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:55 IST

दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यात ४० सायबर लॅब स्थापन केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धेतही सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुंबई दरबारी झाला गौरव : बनावट कॉल सेंटरचा तपास उल्लेखनीय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यात ४० सायबर लॅब स्थापन केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धेतही सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. याच सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने रामनगर व सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा छडा लावत बनावटी कॉल सेंटर उघडकीस आणण्याच्या उल्लेखनिय कार्याची मुंबई दरबारी दखल घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात वर्धा सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) ब्रिजेश सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.१५ आॅगस्ट २०१६ ला स्थापन करण्यात आलेल्या सायबर लॅबला त्यानंतर पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालणे, जनतेमध्ये सायबर गुन्ह्यांसंबधाने जनजागृती करणे, दाखल गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून सायबर गुन्ह्यांचे प्रकटीकरण करणे हा या पोलीस ठाण्याचा उद्देश आहे. वर्धा सायबर पोलीस ठाण्यातर्फे क्रेडीट कार्ड फ्रॉड, मोबाईल टॉवरच्या नावाखाली झालेली फसवणूक, भाग्यवान विजेते सांगून केले जाणारे गुन्हे, बँक खात्यातून परस्पर उडविली जाणारी रक्कम, अशी विविध गुन्हे उघडकीस आणली आहे. याच कार्याची दखल पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन वर्धेच्या पोलीस कर्मचाºयांना गौरविले आहे.मागील तीन वर्षांमध्ये राज्यातील सायबर पो.स्टे. ने केलेल्या उल्लेखनिय कामगीरी, गुन्हे प्रकटीकरण, जनजागृती, राबवीलेले अभीनव उपक्रम या बाबत लेखाजोखा सादर करण्याच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर यांनी ४ मे रोजी मुंबई येथे विशेष बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत वर्धा सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या रामनगर व सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकटीकरणातील मदतीची यावेळी वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली. शिवाय विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) ब्रिजेश सिंग यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम