शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वर्ध्यात बहरली ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती; युवा शेतकऱ्याची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:39 IST

सेलूतील युवकाने पारंपारिक शेतीला फाटा देत सेंद्रीय पद्धतीने चक्क विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ ची लागवड केली.

ठळक मुद्देकमी पाण्यात येणारे औषधी गुणधर्म असलेले फळ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च याचा वर्षाअंती हिशोब काढला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे कर्जाचा डोंगर उभा होऊन त्यातून सावरताना नाकीनऊ येतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी सेलूतील युवकाने पारंपारिक शेतीला फाटा देत सेंद्रीय पद्धतीने चक्क विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ ची लागवड केली. प्रारंभी त्याला काहींनी वेड्यात काढले पण; वर्षभरानंतरच उत्पादन सुरु झाल्याने या युवकाच्या जिद्दीपुढे टिकाकारांना तोंडावर हात ठेवण्याची वेळ आली.शुभम राजेश्वर दांडेकर, रा. सेलू असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे पवनार शिवारात दोन एकर शेती आहे. येथे त्याने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘ड्रॅगन फ्रुट’ या विदेशी फळझाडांची लागवड केली. एका एजंन्सीच्या माध्यमातून मध्यअमेरिका व वियतनाम या देशातून त्याने २ हजार ८०० रोपटे मागविली. अडीच लाख रुपये खर्चून आणलेल्या या रोपट्यांनी दीड एकरामध्ये १२ बाय ७ अशा अंतरावर लागवड केली. या झाडांच्या वाढीकरिता स्तंभाची (पोल) उभारणी करण्यात आली. एका पोलजवळ चार झाडांची व्यवस्था करुन त्याचे वर्षभर सेंद्रीय पद्धतीने नियोजन केल्याने वर्षभरात फळधारणा होऊन उत्पन्नही सुरु झाले. सध्या कोरोनाकाळात फळाला मोठी मागणी असून नागपूर व वर्धा येथील बाजारपेठेत शेतातूनच विक्री होत आहे.फळाचे गुणधर्म तरी काय?हे ‘ड्रॅगन फ्रुट’ निवडूंग वेल आहे. त्यामुळे कोणत्याही जनावरापासून या पिकाला धोका नाही. याचे उगमस्थान मध्यअमेरीका असून आता उष्ण प्रदेशातही उत्पादन घेतले जाते. झाडीची वेल छत्रीसारखी वाढत असल्याने त्याला द्राक्षासारखा आधार द्यावा लागतो. त्यामुळे शेतामध्ये स्तंभ (पोल) उभारावे लागतात. झाडाचे आयुर्मान २८ ते ३० वर्ष असल्याने दीर्घकालीन उत्पादन मिळते. जुलै ते डिसेंबर या कालावधीत एका झाडाला ५० ते १०० फळ लागतात. यात प्रथिने, स्निग्धपदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्व बी व क असे अन्नघटक असल्याने मधुमेह, कोलेस्टेरॉल, संधिवात, दमा, कर्करोग, डेंग्यू आदी आजारावर गुणकारी आहेत.बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होणार असून शेतीच आपल्यासाठी कायमस्वरुपी पर्याय ठरणार आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ ची लागवड केली आहे. एक वेळा खर्च आणि कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे. काही चुकांमुळे आतापर्यंत १७ लाखांचा खर्च आला पण, वास्तविकत: त्यापेक्षा निम्मे खर्चातच शेती उभी राहू शकते. आजारावर गुणकारी असल्याने आजारी व्यक्तीला ५० रुपयांत तर इतरांना १०० रुपयामध्ये फळविक्री सुरु आहे.

उन्हाळ्यात चिंता नाहीउन्हाळ्यात जलपातळी खोल जात असल्याने सिंचनाचे वांधे होते पण, या पिकांला पाण्याची फारशी गरज नसल्याने उन्हाळ्यात तीन महिने पाण्याशिवाय हे पीक जगू शकतात. उन्हाची तिव्रता वाढल्यास या झाडांवर जाळी टाकवी लागते. या दीड एकरातून पहिल्यावर्षी अडीच लाख, दुसऱ्या वर्षी साडेसहा लाख तर तिसऱ्यावर्षीपासून जवळपास दहा लाखांचे उत्पन्न सहज मिळू शकते, असा विश्वास शुभमने व्यक्त केला आहे.- शुभम दांडेकर, युवा शेतकरी.

टॅग्स :fruitsफळेagricultureशेती