शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविली ॲपवर पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 5:00 AM

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची नोंद सात-बारावर स्वतः करून घेता यावी, यासाठी शासनाने ‘ई-पीक पाहणी ॲप’ सुरू केला आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी मोबाइलच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद कशी करावी, याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्वतः बरबडी येथे जावून शेतकऱ्यांना करून दाखवले. जिल्हाधिकारी थेट शेतापर्यंत आल्याने बरबडी येथील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्यच संचारल्याचे बघावयास मिळाले.जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथील शेतशिवारात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय ॲपमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत आश्वस्त केले. शेतकऱ्यांच्या सात-बारावर पिकाची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. १३ ऑगस्टला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे ॲप कार्यान्वित करण्यात आले असून, ॲपबाबत शेतकऱ्यांना नेटवर्क आणि सर्व्हर डाऊनच्या समस्या जाणवत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बरबडी येथे सोनोबा गुरनुले या शेतकऱ्याच्या शेतात जात शेतातील पिकाची नोंद ई-पीक पाहणी ॲपमध्ये करून दाखवली. शेतात टमाटर, वांगी आणि दोडके या पिकाची नोंद घेण्यासोबतच त्यांच्या शेतातील सिंचन सुविधेचीसुद्धा नोंद ॲप मध्ये करून दिली. तसेच प्रभाकर लेंडे या शेतकऱ्याच्या शेताचीही पाहणी करून ॲपमध्ये उभ्या पिकाची नोंद करण्यात आली. यावेळी बरबडीच्या सरपंच संगीता शिंदे, उपविभागीय महसूल  अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत आदींची उपस्थिती होती.ॲप शेतकऱ्यांकरिता अतिशय सोपेचई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना वापरण्यासाठी अतिशय सोपे असून, यामध्ये शेतकरी कधीही त्यांच्या खरीप, रबी व उन्हाळी पिकाची नोंद घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

एका मोबाईलद्वारे २० शेतकऱ्यांच्या पिकाची घेता येते नोंदएका मोबाईलवरून २० शेतकऱ्यांची पिकाची  नोंद घेता येते. त्यामुळे ॲण्ड्रॉईड मोबाईल असलेल्या तरुण शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइलवरून  इतर शेतकऱ्यांच्या पिकाची  नोंद करून देण्यासाठी पुढाकार घेण्यासोबतच तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक नोंद करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिल्यात.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती