वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाने पीक भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:55 AM2020-01-09T10:55:58+5:302020-01-09T10:56:22+5:30

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने उभे झालेले पीक भुईसपाट झाले आहे. आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

Crop landslide with return rainfall in Wardha district | वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाने पीक भुईसपाट

वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाने पीक भुईसपाट

Next
ठळक मुद्देपिकांवर रोगांचे आक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने उभे झालेले पीक भुईसपाट झाले आहे. आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.
तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेले कापसाचे पीक पावसाच्या एका फटक्यात ओलेचिंब होऊन गेले आहे. तर धान, तूर, सोयाबीनची पिके भुईसपाट झाली आहेत. यावर हरभरा व गव्हावर गेरवा आणि मर रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊन पिकाची प्रतवारीही घटणार आहे. त्याचा परिणाम शेतकºयाच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. पावसामुळे धानासोबत आता कपासाच्या सरकीलाही अंकुर फुटू लागले आहेत.
ही परिस्थिती पाहता, हेक्टरी २० हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Crop landslide with return rainfall in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती