शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मजुरांच्या मानसिकतेचे कापसावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:04 PM

यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे.

ठळक मुद्देदररोज वाढविले जातात भाव : एक क्विंटल कापूस विकल्यानंतर मजुरी कापून मिळते अर्धीच रक्कम

फणिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे. यामुळे कापूस उत्पादक आर्थिक चिंतेत आहे.आर्थिक निकड भागविण्यासाठी आधीच कापूस विकलेले शेतकरी भाववाढीमुळे कपाळावर हात मारून घेत आहे. शेतकºयांच्या श्रमशक्तीवर गब्बर होण्याची संधी मिळाल्याने खासगी व्यापारी आनंदी आहे. यंदा भरपूर पाऊस येईल, हा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. विदर्भात सरासरीच्या निम्मे पाऊस झाला. विशिष्ट दिवसांनी नियमित पाऊस आल्याने पिकाची चांगली वाढ झाली. यंदा कापसाचे उत्पन्न समाधानकारक होईल, अशी अपेक्षा होती; पण दिवाळीच्या पर्वावर विदर्भात ढगाळी वातावरण व हलक्या पावसामुळे कपाशीचे बुड, बोंडे सडून एकरी २-३ क्विंटलचा फटका बसला. बोंडे परिपक्व होऊन फुटण्याऐवजी दोन कळ्या चांगल्या तर दोन किडग्रस्त फुटत होत्या. शेतकºयांनी हिरवी बोंडे फोडून पाहिली असता प्रत्येक बोंडात शेंदरी बोंडअळी दिसून आली. बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही, हा कंपनीचा दावा खोटा ठरवित विदर्भातील कापूस बोंडअळीने फस्त केला. यामुळे अनेकांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरिवला.काहींनी कापूस वेचण्याचा प्रयत्न केला; पण मजूर १२० रुपये मन प्रमाणे वेचणीस आले. एक दिवस कापूस वेचल्यानंतर मजुरांनी कापूस चिकट आहे, बरोबर निघत नाही व हलका आहे, ही कारणे पूढे करून १५० रुपये भाव द्याल तर उद्या येतो वा येणार नाही, अशी तंबी देणे सुरू केले. शेतकºयांना पर्याय नसल्याने मजुरांना मागेल ती मजुुरी द्यावी लागली. हा कापूस घरी येताच शेतकºयांनी ३५०० ते ४००० रुपयांत खासगी व्यापाºयांना विकला. आता दुसरी व अंतिम वेचणी सुरू आहे. यासाठी मजूर मिळणे कठीण झाले. मजुरांसाठी शेतकरी भटकत आहे; पण मजूर मिळत नाही. कापूस शेतात वाळत आहे. उपलब्ध मजूर २०० रुपये रोज मागत आहे. पूर्वी पायी जाणाºया मजुरांना आता एक किमी अंतरासाठीही वाहनाची व्यवस्था करावी लागते. पूर्वी दलालाशिवाय मजूर येत होते. आता ठेकेदाराशिवाय मजूर मिळत नाही. कामाशिवाय ठेकेदार दररोज शेतकºयांना लुटत आहे. मजूर दररोज भाव वाढविण्याची धमकी देत आहे. मजुरांची चणचण, वेचणीचे न परवडणारे दर व कापसाच्या वजनघटीने शेतकरी त्रस्त आहे. मजुरांची ही मानसिकता शेतकºयांना शेतीपासून परावृत्त करीत आहे. दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असल्याने मजुरांनी शेतकºयांप्रती सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे झाले आहे.वाहन, ठेकेदाराविना मजूर नाहीमजुरीशिवाय दहा मजूर आणण्याचे गाडी भाडे ७०० रुपये व प्रती मजूर २० रुपये ठेकेदाराला हे सर्व पकडून प्रारंभीची कापूस वेचणी प्रती क्विंटल १००० ते १२०० रुपये पडली. आता मजुरांनी दर वाढवित २०० रुपये मागत आहे. यामुळे कापूस वेचणे परवडत नसल्याचे दिसते.

टॅग्स :cottonकापूस