शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

सेवाहक्क कायद्याबाबत जागृकता निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 23:44 IST

नागरिकांचा कमी प्रतिसाद असलेल्या सेवांचा त्या- त्या विभागाने आढावा घेऊन सामान्य नागरिकांपर्यंत उपलब्ध आॅनलाईन सेवांची माहिती पोहचवावी. सेवा हक्क कायद्याच्या मार्फत सामान्य जनतेला आॅनलाईन व्यवस्थेकडे वळवितांना या कायद्याचे फायदे, प्रशासनानातील पारदर्शकता आणि ठराविक कालावधीत मिळणारी सेवा या बाबीची माहिती जनतेला देऊन नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करावी, ,......

ठळक मुद्देस्वाधीन क्षत्रिय : ५९ सेवांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांचा कमी प्रतिसाद असलेल्या सेवांचा त्या- त्या विभागाने आढावा घेऊन सामान्य नागरिकांपर्यंत उपलब्ध आॅनलाईन सेवांची माहिती पोहचवावी. सेवा हक्क कायद्याच्या मार्फत सामान्य जनतेला आॅनलाईन व्यवस्थेकडे वळवितांना या कायद्याचे फायदे, प्रशासनानातील पारदर्शकता आणि ठराविक कालावधीत मिळणारी सेवा या बाबीची माहिती जनतेला देऊन नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करावी, , असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क कायदयाच्या अंमलबजावणी संदर्भात आयोजित विभाग प्रमुखाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, सहायक जिल्हाधिकारी जिंदाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, भूमि अभिलेख अधिक्षक नितीन पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे, यासह सर्व विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांंना मार्गदर्शन करतांना स्वाधीन क्षत्रिय यांनी शासकीय कामकाजात गती, पारदर्शकता आणि ठराविक कालावधीमध्ये नागरिकांना हमखास सेवा मिळावी यासाठी सदर कायदयाची निर्मिती झाल्याचे सांगितले. या कादयाची अंमलबजावणी करतांना अधिकाºयांंनी प्रथम आपल्या विभागाच्या कोणकोणत्या सेवा आॅनलाईन देण्यासाठी अधिसुचित केल्या आहेत याची माहिती करुन घेऊन त्याची माहिती नागरिकांना द्यावी. सर्व सेवा एका छताखाली देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे वेगळी संगणकीय प्रणाली वापरुन आॅनलाईन सेवा देणाºया विभागांनी त्यांच्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत कशा पध्दतीने देता येईल यासाठी पुढाकार घ्यावा. यामुळे नागरिकांना वेगवेगळे संकेतस्थळ आणि पोर्टलवर जाण्याची गरज पडणार नाही. ग्रामपंचायत आणि नगर पालिकांमध्ये असणाºया सेवा केंद्र्रामध्ये सुध्दा शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना आॅनलाईन उपलब्ध करुन दिल्या गेल्या पाहिजेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्यात. या कायदयाची अंमलबजावणी करतांना विविध सेवा केंद्र्राची मदत नागरिक घेत असले तरी उपलब्ध आॅनलाईन सेवा, आपले सरकार पोर्टल व मोबाईल अँप याबाबच्या माहितीचा प्रचार व प्रसार करण्यात यावा, असे आवाहन क्षत्रिय यांनी केले.याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी बाबत सुरूवातीला सादरीकरण केले. यामध्ये जिल्हयात ९१५ केंद्रामार्फत सुरु असलेल्या आॅनलाईन सेवांची माहिती दिली. आतापर्यंत १६ हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच ५९ सेवांसाठी सर्वात जास्त आॅनलाईन प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. या कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांना आॅनलाईन सुविधा देतांना येत असलेल्या अडचणीबाबतही त्यांनी माहिती दिली. महाआॅनलाईनच्या प्रतिक उमाटे यांनी आॅनलाईन सेवासांठी ठरवून दिलेले सेवा शुल्क हे सन २००८ चे आहे, त्यामध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे निर्दशनास आणून दिले. यावेळी बेरोजगारांची नोंदणी आॅनलाईन झाल्यामुळे आणि जिल्हा उद्योग केंद्रात सर्व सेवा आॅनलाईन देत असल्यामुळे कार्यालयात नागरिकांची गर्दी कमी झाली असल्याचे या विभाग प्रमुखांनी सांगितले. जिल्ह्यातील राबविलेले विविध उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी सूचविण्यात येणार असल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाचे केले कौतुकजिल्हा सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मायक्रो ए.टी.एम., बचतगटामार्फत सेतू केंद्र चालविणे, संवाद कक्ष टोल फ्री क्रमांक आणि आपले सरकार सेवा केंद्र आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न या नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद