शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण-तरुणीला आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:01 IST

बाल वयापासूनच मुलामुलींना प्रशिक्षण दिले पाहिजे. आतंकवाद, दहशतवाद, हिंसात्मक वृत्ती हद्दपार करण्यासाठी तरुण-तरुणींना साहसी बनविले पाहिजे. जेणे करुन देशासमोर येणारे कोणतेही संकट सहजपणे टाळता येवू शकते. यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण तरुणींना आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : एक दिवसीय बाल महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाल वयापासूनच मुलामुलींना प्रशिक्षण दिले पाहिजे. आतंकवाद, दहशतवाद, हिंसात्मक वृत्ती हद्दपार करण्यासाठी तरुण-तरुणींना साहसी बनविले पाहिजे. जेणे करुन देशासमोर येणारे कोणतेही संकट सहजपणे टाळता येवू शकते. यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित साहस प्रशिक्षण प्रत्येक तरुण तरुणींना आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.अ‍ॅडव्हेंचर हिलर्स, कब बुलबुल बाल महोत्सव व आपत्ती व्यवस्थापन दलाच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आय. टी. आय. टेकडीवर उभारलेल्या एडव्हेंचर हिल्स येथे स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, स्थानिक प्रहार समाज जागृती संस्था व वर्धा भारत स्काऊट आणि गाईड यांच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार रामदास तडस उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी पुरुषोत्तम दारवणकर, चैताली राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के, महेश मोकळकर, शकुंतला चौधरी, सहा. राज्य आयुक्त आर.आर. जयस्वाल, हरीश इथापे, डॉ. राजेंद्र बोरकर, मुरलीधर बेलखोडे,प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, पोलीस निरीक्षक अशोक चौधरी, प्राचार्य मदन मोहता, प्राचार्य खुशाल मून, राम बाचले, रेणुका भोयर, क्रीडा संकुलचे व्यवस्थापक रवि काकडे, आर्किटेक्ट नयन निस्ताने, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त किरण जंगले, निर्मला नादुरकर, राज्य मंडळ प्रतिनिधी भरतकुमार सोनटक्के, दत्तराज भिष्णूरकर, वडाळकर, मुख्याध्यापक व एडव्हेंचर हिल्स प्रकल्पाचे प्रमुख तथा स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. मुलांना बालपणापासून साहसी उपक्रमांत सहभागी करणे गरजेचे आहे. हा हेतु समोर ठेवून प्रगत राष्ट्रात २ वर्ष सैनिकी प्रशिक्षण आवश्यक केलेले आहे. अशाच प्रकारच्या प्रशिक्षणाची आपल्याही देशात गरज आहे. असे प्रतिपादन अतुल तराळे यांनी केले. तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले युवा पिढीसाठी अडथळा पार प्रशिक्षण आवश्यक केल्यास उंच मनोबल असलेले व सैनिकी मानसिकता असलेले भावी नागरिक देशाला मिळतील असे सांगितले.प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी तर संचालन सतीश इंगोले व विजया व्यवहारे यांनी केले तर आभार वैशाली अवथळे यांनी मानले.वर्धा भारत स्काऊट गाईडच्यावतीने बाल महोत्सवात शहरातील १५ शाळेतील ३५० मुले मुली सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६ नोव्हेंबरच्या शहीदांना देवळीच्या एस.एस. एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. छात्र सैनिकांनी सलामी दिली. यावेळी प्रमुख अतिथींनी शहीद स्मृतिंवर पुष्पचक्र अर्पण केले. स्काऊटचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल व प्रहारचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण घेत असणाऱ्या तरुणांनी २१ प्रकारच्या अडथळा पार साहसी प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक अतिथींसमोर सादर केले.